शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

महावितरणची सौर ऊर्जा निर्मितीत घोडदौड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 20:58 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेला आणि शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ६६५ कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील ९०० कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ बुटीबोरी येथील या प्रकल्पाची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

ठळक मुद्देखापानंतर बुटीबोरी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणीही यशस्वी : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी असलेला आणि शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील ६६५ कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी शुक्रवारी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. महावितरणने नागपूर जिल्ह्यातील खापा येथील ९०० कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पापाठोपाठ बुटीबोरी येथील या प्रकल्पाची चाचणीही यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.महावितरणच्या बुटीबोरी येथील ३३ केव्ही उपकेंद्र्रातील सुमारे अडीच एकर मोकळ्या जागेत या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारणी करण्यात आली असून या प्रकल्पाच्या चाचणीच्या वेळी येथून तब्बल ३०१ के.वॅ. ऊर्जा निर्मिती करण्यात आली. या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते लवकरच करण्यात येणार असून या प्रकल्पांतून परिसरातील शेतकऱ्यांना सौर वीज वाहिनीतून वीजपुरवठा करण्यात येईल.मुख्यमंत्री फडणवीस आणि ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी राज्यभरातील विविध ठिकाणी असलेल्या महावितरणच्या वीज उपकेंद्रातील उपलब्ध मोकळ्या जागेवर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत योजना तयार केली असून या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील उपकेंद्रात ९०० कि.वॅ. तर बुटीबोरी येथील उपकेंद्रातील ६६५ कि.वॅ. क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरीत्या सुरू करण्यात आले आहेत. खापा येथील सौर ऊर्जा प्रकल्पातूनही तब्बल ५०० कि.वॅ. पर्यंत ऊर्जा निर्मितीची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील सुमारे १५० ठिकाणी विविध क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पातून २०० मे. वॅ. वीज निर्मिती करण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी महावितरणने प्रकल्प उभारणी आणि वीज खरेदीसाठीचे करारही केले असून. या प्रकल्पासाठी आवश्यक जागा महावितरणची आहे तर प्रकल्प उभारणीचे काम ईईएसएल या कंपनीतर्फे करण्यात येत आहे. बुटीबोरी येथील प्रकल्पातून सुमारे ३०० शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार असून शेतकऱ्यांना दिवसा १० ते १२ तास दर्जेदार आणि स्वस्त वीज मिळावी याकरिता राज्य शासनातर्फे ही योजना राबविल्या जात आहे.