शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

भाजपच्या दबावतंत्रापुढे महाविकास आघाडी झुकणार नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. पण या एक वर्षात भाजपने आपली आडमुठी भूमिका बदलली नाही. ...

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. पण या एक वर्षात भाजपने आपली आडमुठी भूमिका बदलली नाही. सरकार पाडण्यासाठी वेळोवेळी कट रचण्यात धन्यता मांडली. केंद्रीय यंत्रणाचा वापर राजकीय विरोधकांना दाबण्यासाठी करण्यात आला. मात्र, असे कितीही कट रचले तरी काँग्रेस खचणार नाही. उलट ताकदीने लढणार, असे मत अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव विदर्भ प्रभारी आशिष दुआ यांनी व्यक्त केले.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी दुआ नागपुरात आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत. पहिल्यांदाच भाजप विरोधात सांघिक शक्ती उभी करण्यात आली आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. कोरोनाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून भाजप नेत्यांनी राज्य सरकारला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता हेतूपुरस्सर पीएम फंड मध्ये स्वत:चा निधी दिला. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे कोट्यवधी रुपये दिले नाही. उलट सरकारला बदनाम करण्याचा व अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो, हे वर्षभरात पहायला मिळाले, अशी टीका त्यांनी केली.

युवक, शेतकरी, महिलांच्या उद्धारासाठी केंद्राकडे कुठलीही योजना नाही. केंद्र सरकारचे कृषी विरोधी कायदे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे आहे. वित्तमंत्र्यांनी कृषी पॅकेज जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. युवकांना रोजगार देण्याऐवजी बेरोजगारी वाढली. आता शिक्षित युवकांना भाजपच्या फसव्या धोरणांची जाणीव झाली आहे. त्यामुळे आता कितीही ‌‘व्हॅक्सीन टुरीझम’ केले तरी काहीच साध्य होणार नाही, असा चिमटाही दुआ यांनी काढला.