शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानावर बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
2
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
3
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
6
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
7
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
8
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
9
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
10
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
11
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
12
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
13
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
14
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
15
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
16
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
17
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
18
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
19
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
20
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?

भाजपच्या दबावतंत्रापुढे महाविकास आघाडी झुकणार नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:04 IST

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. पण या एक वर्षात भाजपने आपली आडमुठी भूमिका बदलली नाही. ...

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडीला एक वर्ष पूर्ण झाले. पण या एक वर्षात भाजपने आपली आडमुठी भूमिका बदलली नाही. सरकार पाडण्यासाठी वेळोवेळी कट रचण्यात धन्यता मांडली. केंद्रीय यंत्रणाचा वापर राजकीय विरोधकांना दाबण्यासाठी करण्यात आला. मात्र, असे कितीही कट रचले तरी काँग्रेस खचणार नाही. उलट ताकदीने लढणार, असे मत अ.भा. काँग्रेस समितीचे सचिव विदर्भ प्रभारी आशिष दुआ यांनी व्यक्त केले.

पदवीधर मतदारसंघ निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी दुआ नागपुरात आले आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत. पहिल्यांदाच भाजप विरोधात सांघिक शक्ती उभी करण्यात आली आहे. त्याचा नक्कीच फायदा होईल. कोरोनाच्या काळात राजकारण बाजूला ठेवून भाजप नेत्यांनी राज्य सरकारला मदत करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता हेतूपुरस्सर पीएम फंड मध्ये स्वत:चा निधी दिला. केंद्राने महाराष्ट्राच्या वाट्याचे जीएसटीचे कोट्यवधी रुपये दिले नाही. उलट सरकारला बदनाम करण्याचा व अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी भाजप कोणत्याही पातळीवर जाऊ शकतो, हे वर्षभरात पहायला मिळाले, अशी टीका त्यांनी केली.

युवक, शेतकरी, महिलांच्या उद्धारासाठी केंद्राकडे कुठलीही योजना नाही. केंद्र सरकारचे कृषी विरोधी कायदे शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारे आहे. वित्तमंत्र्यांनी कृषी पॅकेज जाहीर केले. मात्र, प्रत्यक्षात त्याचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. युवकांना रोजगार देण्याऐवजी बेरोजगारी वाढली. आता शिक्षित युवकांना भाजपच्या फसव्या धोरणांची जाणीव झाली आहे. त्यामुळे आता कितीही ‌‘व्हॅक्सीन टुरीझम’ केले तरी काहीच साध्य होणार नाही, असा चिमटाही दुआ यांनी काढला.