शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

महात्मा फुले समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार

By admin | Updated: December 30, 2014 00:57 IST

समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले.

स्मृती व्याख्यानमाला : नागनाथ कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन नागपूर : समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले. त्यापैकी अनेकांनी त्यादृष्टीने कामेही केली. परंतु समाजातील वास्तव ताकदीने मांडून प्रबोधनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. त्यामुळे ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते देशातील समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सोमवारी सायंकाळी दीक्षांत सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ‘भारतीय समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार : महात्मा ज्योतिबा फुले’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर प्रमुख अतिथी होते. डॉ. कोत्तापल्ले यांनी सुरुवातीलाच तत्कालीन इंग्रजांच्या काळापूर्वीची परिस्थिती आणि इंग्रज भारतात आल्यावर देशात होत असलेल्या वैचारिक परिवर्तनाचा आढावा सादर केला. नवीन विचार समाजात रुजू होत होते. अनेक महापुरुष संत-महात्मे आपापल्यापरीने समाज सुधारणाबाबत भाष्य करीत होते. महात्मा फुले यांनी मात्र आपले विचार ताकदीने मांडले. धर्माची समीक्षा केली. अंधश्रद्धेचा निषेध केला. कुठल्याही ग्रहांचा, कुंडलीचा परिणाम होत नाही. दैव, भविष्य यांना नाकारले. धर्माची समीक्षा करताना धर्मातील थोतांड त्यांनी ताकदीने मांडले. स्त्रीमुक्ती आणि अस्पृश्यतेबाबत ते केवळ बोलले नाही तर ते नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा उघडली. अस्पृश्य, शेतकरी आणि कामगार यांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी सर्वप्रथम मांडला. अस्पृश्य, मजूर व शेतकरी यांचे शोषण कसे व कोणकोणत्या माध्यमातून होते, ते त्यांनी उलगडून सांगितले. यातूनच पुढे नारायण मेधाजी लोखंडे यांनी कामगारांची चळवळ उभी केली. ही चळवळ जगातील पहिली चळवळ होती. नारायण लोखंडे हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते, हे विशेष, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या समस्यांनी आज उग्र रूप धारण केले आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला महात्मा फुलेंच्याच ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो, असे डॉ. विनायक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले. संचालन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. सहायक उपकुलसचिव अशोक साळवे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)