शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

महात्मा फुले समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार

By admin | Updated: December 30, 2014 00:57 IST

समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले.

स्मृती व्याख्यानमाला : नागनाथ कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन नागपूर : समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले. त्यापैकी अनेकांनी त्यादृष्टीने कामेही केली. परंतु समाजातील वास्तव ताकदीने मांडून प्रबोधनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. त्यामुळे ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते देशातील समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सोमवारी सायंकाळी दीक्षांत सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ‘भारतीय समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार : महात्मा ज्योतिबा फुले’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर प्रमुख अतिथी होते. डॉ. कोत्तापल्ले यांनी सुरुवातीलाच तत्कालीन इंग्रजांच्या काळापूर्वीची परिस्थिती आणि इंग्रज भारतात आल्यावर देशात होत असलेल्या वैचारिक परिवर्तनाचा आढावा सादर केला. नवीन विचार समाजात रुजू होत होते. अनेक महापुरुष संत-महात्मे आपापल्यापरीने समाज सुधारणाबाबत भाष्य करीत होते. महात्मा फुले यांनी मात्र आपले विचार ताकदीने मांडले. धर्माची समीक्षा केली. अंधश्रद्धेचा निषेध केला. कुठल्याही ग्रहांचा, कुंडलीचा परिणाम होत नाही. दैव, भविष्य यांना नाकारले. धर्माची समीक्षा करताना धर्मातील थोतांड त्यांनी ताकदीने मांडले. स्त्रीमुक्ती आणि अस्पृश्यतेबाबत ते केवळ बोलले नाही तर ते नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा उघडली. अस्पृश्य, शेतकरी आणि कामगार यांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी सर्वप्रथम मांडला. अस्पृश्य, मजूर व शेतकरी यांचे शोषण कसे व कोणकोणत्या माध्यमातून होते, ते त्यांनी उलगडून सांगितले. यातूनच पुढे नारायण मेधाजी लोखंडे यांनी कामगारांची चळवळ उभी केली. ही चळवळ जगातील पहिली चळवळ होती. नारायण लोखंडे हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते, हे विशेष, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या समस्यांनी आज उग्र रूप धारण केले आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला महात्मा फुलेंच्याच ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो, असे डॉ. विनायक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले. संचालन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. सहायक उपकुलसचिव अशोक साळवे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)