शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

महात्मा फुले समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार

By admin | Updated: December 30, 2014 00:57 IST

समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले.

स्मृती व्याख्यानमाला : नागनाथ कोत्तापल्ले यांचे प्रतिपादन नागपूर : समाजातील अनैतिक रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात. सर्वांना समान वागणूक असावी, कुणावरही अन्याय-अत्याचार होऊ नयेत, असे विचार मांडणारे अनेक जण आधुनिक भारतात होऊन गेले. त्यापैकी अनेकांनी त्यादृष्टीने कामेही केली. परंतु समाजातील वास्तव ताकदीने मांडून प्रबोधनाची चळवळ प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याचे कार्य महात्मा फुले यांनी केले. त्यामुळे ते केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून ते देशातील समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार ठरतात, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आज येथे केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातर्फे सोमवारी सायंकाळी दीक्षांत सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. ‘भारतीय समाज परिवर्तनाचे आद्य शिल्पकार : महात्मा ज्योतिबा फुले’ या विषयावर ते व्याख्यान देत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे होते. प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर प्रमुख अतिथी होते. डॉ. कोत्तापल्ले यांनी सुरुवातीलाच तत्कालीन इंग्रजांच्या काळापूर्वीची परिस्थिती आणि इंग्रज भारतात आल्यावर देशात होत असलेल्या वैचारिक परिवर्तनाचा आढावा सादर केला. नवीन विचार समाजात रुजू होत होते. अनेक महापुरुष संत-महात्मे आपापल्यापरीने समाज सुधारणाबाबत भाष्य करीत होते. महात्मा फुले यांनी मात्र आपले विचार ताकदीने मांडले. धर्माची समीक्षा केली. अंधश्रद्धेचा निषेध केला. कुठल्याही ग्रहांचा, कुंडलीचा परिणाम होत नाही. दैव, भविष्य यांना नाकारले. धर्माची समीक्षा करताना धर्मातील थोतांड त्यांनी ताकदीने मांडले. स्त्रीमुक्ती आणि अस्पृश्यतेबाबत ते केवळ बोलले नाही तर ते नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी शाळा उघडली. अस्पृश्य, शेतकरी आणि कामगार यांच्या शोषणाचा प्रश्न त्यांनी सर्वप्रथम मांडला. अस्पृश्य, मजूर व शेतकरी यांचे शोषण कसे व कोणकोणत्या माध्यमातून होते, ते त्यांनी उलगडून सांगितले. यातूनच पुढे नारायण मेधाजी लोखंडे यांनी कामगारांची चळवळ उभी केली. ही चळवळ जगातील पहिली चळवळ होती. नारायण लोखंडे हे महात्मा फुले यांचे अनुयायी होते, हे विशेष, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या समस्यांनी आज उग्र रूप धारण केले आहे. या समस्या सोडविण्यासाठी आपल्याला महात्मा फुलेंच्याच ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो, असे डॉ. विनायक देशपांडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात स्पष्ट केले. संचालन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. सहायक उपकुलसचिव अशोक साळवे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)