शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

महात्मा गांधींनी राष्ट्रीय चेतना जागविली

By admin | Updated: January 2, 2015 00:52 IST

महात्मा गांधी हे धर्म, भाषा, क्षेत्र, लिंग अशा स्वरूपाचा भेदभाव नाकारून राष्ट्रीय चेतना जागविली, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.राम पुनियानी (आयआयटी पवई) यांनी व्यक्त केले.

राम पुनियानी : ‘महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरचा भारत’ यावर परिसंवाद नागपूर : महात्मा गांधी हे धर्म, भाषा, क्षेत्र, लिंग अशा स्वरूपाचा भेदभाव नाकारून राष्ट्रीय चेतना जागविली, असे मत मुंबई येथील प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ.राम पुनियानी (आयआयटी पवई) यांनी व्यक्त केले. नागपूर जिल्हा सर्वोदय मंडळतर्फे गुरुवारी झाशी राणी चौकातील हिंदी मोर भवन येथे ‘महात्मा गांधी यांच्या हत्येनंतरचा भारत’ विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. याप्रसंगी पुनियानी यांनी महात्मा गांधी यांचे विचार आणि देशाच्या ऐतिहासिक व वर्तमान परिस्थितीवर सखोल मार्गदर्शन केले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक दत्तात्रय बरगी व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू हरिभाऊ केदार व्यासपीठावर उपस्थित होते. देशात इंग्रजांसोबत सामाजिक बदल, तर महात्मा गांधी यांच्यासोबत राष्ट्रवादाचे आगमन झाले. इंग्रजकाळात उद्योजक, कामगार व सुशिक्षित वर्ग उदयास येऊन राजा, जमीनदार आदींची शक्ती कमी व्हायला सुरुवात झाली. १८८५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर राजे-जमीनदारांनी स्वत:चे अस्तित्व वाचविण्यासाठी धर्माचा प्रचार सुरू केला. त्यावेळी हिंदू व मुस्लीम राजे सोबत होते. इंग्रजांनी त्यांच्यात दुही निर्माण केल्यानंतर धार्मिक संघटना तयार झाल्या. महात्मा गांधी, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याही संघटना होत्या, पण त्यात राष्ट्रीयत्वाची भावना होती. राजा हिंदू असो वा मुस्लीम शोषण, जाती व्यवस्था व लिंगाच्या आधारावर भेदभाव कायम होता. अशा परिस्थितीत महात्मा गांधी यांनी राष्ट्रीय चेतना जागविण्याचे कार्य केले, असे पुनियानी यांनी सांगितले.१९२० पर्यंत भारतीय स्वातंत्र्याचा लढा उच्चवर्गापर्यंत सीमित होता. महात्मा गांधी यांनी हा लढा तळागाळापर्यंत पोहोचविला. महात्मा गांधींवर मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचा आरोप केला जातो. परंतु, राष्ट्रीयत्वाच्या विचारापुढे धार्मिक बंधनांना कधीच महत्त्व नसते. महात्मा गांधी, मौलाना अबुल कलाम आझाद, साने गुरुजी आदी महापुरुष धर्माच्या नाही, तर धार्मिक मूल्यांच्या आधारावर जगत होते. मौलाना अबुल कलाम आझाद यांनी इस्लाम जोडणे शिकवितो तोडणे नाही, असे सांगून ठेवले आहे. साने गुरुजी यांनी ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ म्हटले आहे, अशी माहिती पुनियानी यांनी दिली. मंडळाचे सचिव रवी गुडधे यांनी संचालन केले.नथुराम गोडसेचा उदोउदो थांबवामहात्मा गांधी यांची शरीराने हत्या झाली आहे, पण त्यांच्या विचारांची हत्या होऊ नये यासाठी नथुराम गोडसेचा उदोउदो थांबला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदू महासभेत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून बाहेर पडलो, असे गोडसेने न्यायालयात सांगितले होते. परंतु, महात्मा गांधी यांच्या हत्येच्या काळातही तो संघात सक्रिय होता याचे पुरावे आहेत.(प्रतिनिधी)