शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

महाराष्ट्रदिनी विदर्भवाद्यांची ‘रक्ताक्षरी’

By admin | Updated: April 28, 2017 03:03 IST

वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी यासाठी विदर्भवाद्यांनी गेल्या काही काळापासून कंबर कसली आहे.

रक्ताने पत्र लिहून वेधणार पंतप्रधानांचे लक्ष : ५२ तालुक्यांत फडकणार विदर्भाचा झेंडा योगेश पांडे नागपूर वेगळ््या विदर्भ राज्याच्या मागणीची हाक संपूर्ण देशात जावी यासाठी विदर्भवाद्यांनी गेल्या काही काळापासून कंबर कसली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील १ मे रोजी महाराष्ट्रदिनी संपूर्ण विदर्भात विदर्भवादी संघटनांतर्फे काळा दिवस पाळण्यात येणार आहे. सोबतच पंतप्रधानांचे लक्ष वेधण्यासाठी विदर्भवाद्यांतर्फे ‘रक्ताक्षरी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. भाजपाने वेगळ््या विदर्भाबाबत केलेल्या ठरावाची आठवण करून देण्यासाठी या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन पाठविण्यात येणार आहे. दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. यंदादेखील प्रशासनाकडून त्याची तयारी करण्यात येत आहे. दुसरीकडे विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिन काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे. मागील वर्षी या मुद्यावरून राजकारण बरेच तापले होते. काळ््या दिवसाची ही परंपरा पुढे ठेवत यंदादेखील १ मे रोजी सर्व ११ जिल्ह्यांतील मुख्यालयी विदर्भाचा झेंडादेखील फडकविण्यात येणार आहे. मागील वर्षी ३० तालुक्यांमध्ये झेंडावंदन झाले होते. यंदा या संख्येत वाढ होणार असून ५२ तालुक्यांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरात विदर्भ राज्य आघाडीतर्फे ‘रक्ताक्षरी’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे अ‍ॅड.श्रीहरी अणे यांच्या रक्तांकित स्वाक्षरीचे पत्र पाठविण्यात येणार आहे. या निवेदनाला विदर्भवाद्यांच्या रक्ताने केलेल्या स्वाक्षऱ्या जोडण्यात येणार आहे. वेगळ््या विदर्भ राज्याची निर्मिती करण्यासंदर्भातील भाजपाच्या प्रस्तावाची आठवण या मोहिमेच्या माध्यमातून करून देण्यात येणार आहे. याच दिवशी ‘विदर्भ कनेक्ट’तर्फे सकाळच्या सुमारास काळा झेंडा फडकविण्यात येणार आहे. यात विविध विदर्भवादी संघटना सहभागी होतील. यासंदर्भात विदर्भ राज्य आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड.रवी संन्याल यांना विचारणा केली असता त्यांनी वृत्ताला दुजोरा दिला. १ मे रोजी आघाडीच्या कार्यालयात ‘रक्ताक्षरी’ मोहीम राबविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चौकाचौकात लावणार झेंडे १ मे रोजी विदर्भातील सर्व जिल्ह्यातील गावांमधील घराघरांवर, चौकात, वेशीवर विदर्भाचे झेंडे लावण्यात येणार आहेत. शिवाय विविध ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या समर्थनार्थ विविध उपक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. विविध जिल्ह्यांमध्ये विदर्भवादी संघटनांचे पदाधिकारी जनतेत जाऊन मार्गदर्शन करतील व आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडतील. कशी जुळणार जनता? विदर्भाची चळवळ जनसामान्यांपर्यंत नेण्याची आवश्यकता असताना १ मे संदर्भात प्रचार-प्रसार दिसून आलेला नाही. अद्यापपर्यंत संघटनांतर्फे वातावरणनिर्मिती करण्यात आलेली नाही. अगदी विदर्भवाद्यांनी आतापर्यंत प्रभावीपणे वापरलेल्या ‘सोशल मीडिया’त देखील फारसा प्रचार-प्रसार झालेला नाही. अशा स्थितीत जनता आंदोलन व उपक्रमांशी कशी जुळणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. यासंदर्भात ‘विरा’चे संस्थापक अ‍ॅड.श्रीहरी अणे यांना विचारणा केली असता त्यांनी नागरिकांना जोडण्यासाठी जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मात्र तळागाळात विदर्भवाद्यांचे समाधानकारक काम सुरू असून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.