शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
5
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
6
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
7
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
8
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
9
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
10
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
11
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
12
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
13
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
14
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
15
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
16
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
17
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
18
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग
19
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
20
Social Viral: बीडच्या ZP शाळेचा पॅटर्न: मधल्या सुट्टीत सुलेखन आणि रंगोळीचे प्रशिक्षण, सरपंचांचेही पाठबळ!

महाराष्ट्राने राबवावा दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’

By admin | Updated: October 9, 2016 02:21 IST

राज्यासह देशातील गुन्हेगारी घटनांना दारू हे मुख्य कारण असते. तरीदेखील महसुलाचा आकडा लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यावर बंदी लावण्यात येत नाही.

मेधा पाटकर : नशामुक्त भारत आंदोलन राष्ट्रीय यात्रा नागपुरातनागपूर : राज्यासह देशातील गुन्हेगारी घटनांना दारू हे मुख्य कारण असते. तरीदेखील महसुलाचा आकडा लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यावर बंदी लावण्यात येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंदर्भात पावले उचलली आहेत व तेथे दारुऐवजी दूधविक्री सुरू झाली आहे. राज्यानेदेखील दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’ राबविला पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ‘नशामुक्त भारत आंदोलन’च्या राष्ट्रीय संयोजक मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. देश नशामुक्त झाला पाहिजे यासाठी नशामुक्त भारत आंदोलनाअंतर्गत राष्ट्रीय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा शनिवारी नागपुरात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.अमरावती मार्गावरील विनोबा भावे विचार केंद्रात दारुबंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर पत्रपरिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. दारूपासून मिळणारा महसूल वाढावा यासाठी शासनातील मंत्री, अधिकारी प्रयत्नरत असतात. अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात येतात. मात्र यामुळे समाजाचे नुकसान होते. दारुबंदीच्या मुद्यावर शासन संवेदनशील नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यात बिहारसारखा दारुबंदीवर सशक्त कायदा आणला पाहिजे. यासाठी समाजात जनजागृती करण्याचीदेखील गरज आहे, असे त्या म्हणाल्या. रविवारी ही यात्रा यवतमाळ व तेथून पुसद येथे पोहोचणार आहे़ पत्रपरिषदेला लीलाताई चितळे, मुलताईचे माजी आ़ डॉ़ सुनीलम्, विलास भोंगाडे, भुपेंद्र रावत, राघवेंद्र बालीया, आनंदी अम्मा, इनामूल, शिवाजी मुथ्थूकुमार, बलवंतसिंह यादव, माया चवरे, रजनीकांत, दीपक चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)पाकविरोधातील ‘सर्जिकल स्ट्राईक’ समर्थनीय नाहीचउरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पाऊल उचलण्यात आले. परंतु याचे समर्थन करता येणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसेने देणे योग्य नाही. भारत-पाकिस्तानमधील समस्यांचे उत्तर युद्धातून मिळणार नाही, या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या निर्णयावर टीका केली. नशामुक्त भारत आंदोलनांतर्गत काढण्यात आलेली राष्ट्रीय यात्रा शनिवारी नागपुरात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.गांधी विचारांवर चालणारा आपला देश आहे. शेजारी राष्ट्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध असले पाहिजे. चर्चेतूनच सौहार्द निर्माण होते. आत्मसुरक्षेचा सर्वांना अधिकार आहे. परंतु युद्ध हा अंतिम पर्याय असू शकत नाही. देशात ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून युद्धज्वर पसरविणे अयोग्य आहे. जी कृती पाकिस्तानने केली, तीच भारताने केली तर त्यांच्यात व आपल्यात काहीच फरक राहणार नाही, असे प्रतिपादन पाटकर यांनी केले.कुठे गेले ‘गुजरात मॉडेल’?भाजपाकडून ‘गुजरात मॉडेल’चे खूप कौतुक करण्यात येते. भाजपाशासित राज्यांकडून याचे अनुसरण करण्याचा दावा करण्यात येतो. परंतु या ‘मॉडेल’मध्ये दारुबंदीचा समावेश आहे. याचे अनुकरण करण्यात का येत नाही, असा प्रश्न मेधा पाटकर यांनी उपस्थित केला.