शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

महाराष्ट्राने राबवावा दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’

By admin | Updated: October 9, 2016 02:21 IST

राज्यासह देशातील गुन्हेगारी घटनांना दारू हे मुख्य कारण असते. तरीदेखील महसुलाचा आकडा लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यावर बंदी लावण्यात येत नाही.

मेधा पाटकर : नशामुक्त भारत आंदोलन राष्ट्रीय यात्रा नागपुरातनागपूर : राज्यासह देशातील गुन्हेगारी घटनांना दारू हे मुख्य कारण असते. तरीदेखील महसुलाचा आकडा लक्षात घेऊन राज्य शासनातर्फे त्यावर बंदी लावण्यात येत नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी यासंदर्भात पावले उचलली आहेत व तेथे दारुऐवजी दूधविक्री सुरू झाली आहे. राज्यानेदेखील दारुबंदीचा ‘बिहार पॅटर्न’ राबविला पाहिजे, असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ‘नशामुक्त भारत आंदोलन’च्या राष्ट्रीय संयोजक मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. देश नशामुक्त झाला पाहिजे यासाठी नशामुक्त भारत आंदोलनाअंतर्गत राष्ट्रीय यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा शनिवारी नागपुरात आली, त्यावेळी त्या बोलत होत्या.अमरावती मार्गावरील विनोबा भावे विचार केंद्रात दारुबंदी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेनंतर पत्रपरिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली. दारूपासून मिळणारा महसूल वाढावा यासाठी शासनातील मंत्री, अधिकारी प्रयत्नरत असतात. अधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात येतात. मात्र यामुळे समाजाचे नुकसान होते. दारुबंदीच्या मुद्यावर शासन संवेदनशील नाही, असा आरोप त्यांनी केला. राज्यात बिहारसारखा दारुबंदीवर सशक्त कायदा आणला पाहिजे. यासाठी समाजात जनजागृती करण्याचीदेखील गरज आहे, असे त्या म्हणाल्या. रविवारी ही यात्रा यवतमाळ व तेथून पुसद येथे पोहोचणार आहे़ पत्रपरिषदेला लीलाताई चितळे, मुलताईचे माजी आ़ डॉ़ सुनीलम्, विलास भोंगाडे, भुपेंद्र रावत, राघवेंद्र बालीया, आनंदी अम्मा, इनामूल, शिवाजी मुथ्थूकुमार, बलवंतसिंह यादव, माया चवरे, रजनीकांत, दीपक चौधरी प्रामुख्याने उपस्थित होते़ (प्रतिनिधी)पाकविरोधातील ‘सर्जिकल स्ट्राईक’ समर्थनीय नाहीचउरी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पाकिस्तानवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे पाऊल उचलण्यात आले. परंतु याचे समर्थन करता येणार नाही. हिंसेचे उत्तर हिंसेने देणे योग्य नाही. भारत-पाकिस्तानमधील समस्यांचे उत्तर युद्धातून मिळणार नाही, या शब्दांत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केंद्र सरकारच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या निर्णयावर टीका केली. नशामुक्त भारत आंदोलनांतर्गत काढण्यात आलेली राष्ट्रीय यात्रा शनिवारी नागपुरात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील वक्तव्य केले.गांधी विचारांवर चालणारा आपला देश आहे. शेजारी राष्ट्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध असले पाहिजे. चर्चेतूनच सौहार्द निर्माण होते. आत्मसुरक्षेचा सर्वांना अधिकार आहे. परंतु युद्ध हा अंतिम पर्याय असू शकत नाही. देशात ‘सर्जिकल स्ट्राईक’च्या माध्यमातून युद्धज्वर पसरविणे अयोग्य आहे. जी कृती पाकिस्तानने केली, तीच भारताने केली तर त्यांच्यात व आपल्यात काहीच फरक राहणार नाही, असे प्रतिपादन पाटकर यांनी केले.कुठे गेले ‘गुजरात मॉडेल’?भाजपाकडून ‘गुजरात मॉडेल’चे खूप कौतुक करण्यात येते. भाजपाशासित राज्यांकडून याचे अनुसरण करण्याचा दावा करण्यात येतो. परंतु या ‘मॉडेल’मध्ये दारुबंदीचा समावेश आहे. याचे अनुकरण करण्यात का येत नाही, असा प्रश्न मेधा पाटकर यांनी उपस्थित केला.