शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
3
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
4
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
5
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
6
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
7
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
8
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
10
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
11
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
12
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
13
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
14
"अजित पवार उपमुख्यमंत्री; मुख्यमंत्री फडणवीस, त्यामुळे त्यांनाच मतदान करा", चंद्रकांत पाटलांचं विधान
15
पंकजा मुंडे यांच्या पीएच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू; कुटुंबीयांकडून हत्येचा गंभीर आरोप, वरळी पोलीस ठाण्यात आक्रोश
16
शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे सोन्याला पुन्हा भाव! मात्र, चांदी घसरली; आजचे दर काय?
17
Delhi Blast : दहशतवादी डॉक्टरांमध्ये मतभेद; आदिलच्या लग्नाला का गेला नाही उमर? दिल्ली स्फोटात मोठा खुलासा
18
IND vs SA : कोण आहे Senuran Muthusamy? कसोटी पदार्पणात 'विराट' विकेट; भारताशी खास कनेक्शन अन् बरंच काही
19
४०व्या वर्षी दुसऱ्या बाळाला जन्म देणार सोनम कपूर, हटके मॅटर्निटी फोटोशूटने वेधलं लक्ष
20
कर्मचारीहिताचा मोठा निर्णय! 'गिग वर्कर्स'नाही मिळणार PF-ग्रॅच्युइटी; नवीन लेबर कोडचे ३ महत्त्वाचे फायदे!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : ईडी-सीडीचा आधार घेऊन भाजपाकडून मुस्कटदाबी : उदित राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 23:36 IST

विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विरोधकांचे तोंड दाबण्यासाठी या देशात सीडी आणि ईडीचा वापर भाजपाने सुरू केला आहे. त्याचा आधार घेऊन हे सरकार आजही राजकारण करीत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी खासदार उदित राज यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेतून केला. उदित राज म्हणाले, सध्या देशाची आर्थिक स्थिती सर्वच क्षेत्रात प्रचंड खालावली आहे. ईडी, सीडी, भारत-पाकिस्तान संबंधांच्या चर्चेवरच भाजपा निवडणुकीत उतरली आहे. पी. चिदंबरम यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात फक्त एक मौखिक आरोप आहे. त्याव्यतिरिक्त काहीच नाही. विपक्षातील सर्व नेत्यांच्या विरोधात ईडी आणि सीडीचा वापर होत आहे. मध्य प्रदेशात संपूर्ण नेटवर्क उघड झाले,ज्यात आमदार सरकारच्या विरोधात असतील त्यांना फसविण्याचा डाव होता. एकप्रकारे हे ब्लॅकमेलिंगच आहे.सावरकर यांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू आहे. हे सरकार त्यांना भारतरत्न देईलही. मात्र याच सावरकरांनी १३ ते १४ वेळा इंग्रजांकडे माफी मागितली होती, याचाही विचार व्हावा. इंग्रजांकडे माफी मागणाऱ्यांना भारतरत्न देण्याचा आग्रह होत असेल तर असा आग्रह करणारे खरे देशभक्त आहेत का, याचाही विचार व्हावा. भाजपाची मंडळी गांधींचे नाव घ्यायला लागली आहेत. मात्र त्यांना गोडसेही तेवढाच प्रिय आहे. ही दुहेरी नीती जनतेने ओळखावी, असे आवाहन त्यांनी केले. देशातील परिस्थितीबद्दल ते म्हणाले, आदिवासी आणि दलितांना मुख्य प्रवाहापासून दूर ठेवणे, या सरकारने सुरू केले आहे. आज देशात मोठ्या प्रमाणावर बेकारी वाढत आहे. सरकारी कंपन्या विकायला काढल्या आहेत. आरक्षण संपविण्याची तयारी सुरू आहे. दलितांना खासकरून प्रभावित केले जात आहे. खासगीकरण वाढविले जात आहे. रेल्वेसारखा विभाग विकायला काढला आहे. जी संसाधने काँग्रेसने उभी करून देश बळकट केला ती विकून भाजप हा देश चालवायला निघाली आहे. विकून असे किती दिवस काम चालविणार? भारताची अर्थव्यवस्था रसातळाला चालली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसा नाही. जीओ आणून बीएसएनएलची परिस्थिती घसरविली, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी माजी आमदार भगवतीप्रसाद चौधरी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ता संजय दुबे उपस्थित होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Mediaमाध्यमे