शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 20:54 IST

डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देविरोधकांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याची टीका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संपुआ शासनकाळात शासकीय प्रणालीतून ‘फोनबँकिंग’ची वेगळीच व्यवस्था सुरू झाली. फोनवरच अनेकांची मोठमोठाली कर्ज मंजूर झाली. यातून बँकांच्या विविध घोटाळ्यांना सुरुवात झाली. डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश प्रवक्ता अर्चना डेहनकर, संजय भेंडे, शहर प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांत एक नवा इतिहास रचला जाणार आहे. महायुतीला २२१ हून अधिक जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहेच. शिवाय काँग्रेस व विरोधकांची वैचारिक दिवाळखोरीदेखील सर्वांसमोर आली आहे. विविध मुद्यांवर विरोधकांचा गोंधळ आहे व ते नेमके कुठल्या बाजूला आहे हेच त्यांना सांगता येत नाही. ‘एनआरसी’संबंधात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच पुढाकार घेतला होता व आता काँग्रेसचेच नेते ‘एनआरसी’ला विरोध करत आहेत. ‘जीएसटी कॉन्सिल’मध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत व ते बैठकीत एकमताने काम करतात. बाहेर जाऊन मात्र ‘गब्बर सिंह टॅक्स’ असे म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक पक्ष सांभाळतात असे एकेकाळी म्हटले जायचे. आज त्यांना स्वत:चा पक्षदेखील सांभाळता येत नाही अशी स्थिती आहे, असे जावडेकर म्हणाले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावरदेखील आरोप केले. ‘पीएमसी’ बँक भ्रष्टाचारात पटेल यांच्या सहभागाचीदेखील चौकशी झाली पाहिजे. विदेशी विमान कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी ‘एअर इंडिया’ला त्यांनीच रसातळाला नेले, असे ते म्हणाले. विदर्भाला मागील पाच वर्षांपासून न्याय मिळत असून विकासाची गंगा वाहते आहे. अशा स्थितीत वेगळ््या विदर्भाचा विषय मागे पडला आहे. मात्र विदर्भाबाबत जनसंघापासून आमची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.राष्ट्रवाद हा निवडणुकांचा मुद्दा असेलचराष्ट्रवादाचा मुद्दा हा निवडणुकांत अगोदरही होता व पुढेदेखील असेलच. सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेस नेते विनाकारण वक्तव्य देत आहेत. सावरकर यांच्यासंबंधात काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्याच पक्षाचा इतिहास तपासावा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले होते. तर सी.राजगोपालाचारी यांनी पुस्तक लिहीले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Javadekarप्रकाश जावडेकरMediaमाध्यमे