शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 20:54 IST

डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देविरोधकांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याची टीका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संपुआ शासनकाळात शासकीय प्रणालीतून ‘फोनबँकिंग’ची वेगळीच व्यवस्था सुरू झाली. फोनवरच अनेकांची मोठमोठाली कर्ज मंजूर झाली. यातून बँकांच्या विविध घोटाळ्यांना सुरुवात झाली. डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश प्रवक्ता अर्चना डेहनकर, संजय भेंडे, शहर प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांत एक नवा इतिहास रचला जाणार आहे. महायुतीला २२१ हून अधिक जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहेच. शिवाय काँग्रेस व विरोधकांची वैचारिक दिवाळखोरीदेखील सर्वांसमोर आली आहे. विविध मुद्यांवर विरोधकांचा गोंधळ आहे व ते नेमके कुठल्या बाजूला आहे हेच त्यांना सांगता येत नाही. ‘एनआरसी’संबंधात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच पुढाकार घेतला होता व आता काँग्रेसचेच नेते ‘एनआरसी’ला विरोध करत आहेत. ‘जीएसटी कॉन्सिल’मध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत व ते बैठकीत एकमताने काम करतात. बाहेर जाऊन मात्र ‘गब्बर सिंह टॅक्स’ असे म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक पक्ष सांभाळतात असे एकेकाळी म्हटले जायचे. आज त्यांना स्वत:चा पक्षदेखील सांभाळता येत नाही अशी स्थिती आहे, असे जावडेकर म्हणाले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावरदेखील आरोप केले. ‘पीएमसी’ बँक भ्रष्टाचारात पटेल यांच्या सहभागाचीदेखील चौकशी झाली पाहिजे. विदेशी विमान कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी ‘एअर इंडिया’ला त्यांनीच रसातळाला नेले, असे ते म्हणाले. विदर्भाला मागील पाच वर्षांपासून न्याय मिळत असून विकासाची गंगा वाहते आहे. अशा स्थितीत वेगळ््या विदर्भाचा विषय मागे पडला आहे. मात्र विदर्भाबाबत जनसंघापासून आमची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.राष्ट्रवाद हा निवडणुकांचा मुद्दा असेलचराष्ट्रवादाचा मुद्दा हा निवडणुकांत अगोदरही होता व पुढेदेखील असेलच. सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेस नेते विनाकारण वक्तव्य देत आहेत. सावरकर यांच्यासंबंधात काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्याच पक्षाचा इतिहास तपासावा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले होते. तर सी.राजगोपालाचारी यांनी पुस्तक लिहीले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Javadekarप्रकाश जावडेकरMediaमाध्यमे