शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Assembly Election 2019 : मनमोहनसिंह यांच्या कार्यकाळात बँकांची व्यवस्था कोलमडली  : प्रकाश जावडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 20:54 IST

डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.

ठळक मुद्देविरोधकांमध्ये वैचारिक गोंधळ असल्याची टीका

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : संपुआ शासनकाळात शासकीय प्रणालीतून ‘फोनबँकिंग’ची वेगळीच व्यवस्था सुरू झाली. फोनवरच अनेकांची मोठमोठाली कर्ज मंजूर झाली. यातून बँकांच्या विविध घोटाळ्यांना सुरुवात झाली. डॉ.मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळातील भूमिकांमुळे बँकांची व्यवस्था कोलमडली, असा आरोप केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. नागपुरात शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान ते बोलत होते.या पत्रपरिषदेला माजी खासदार अजय संचेती, आ.गिरीश व्यास, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके, प्रदेश प्रवक्ता अर्चना डेहनकर, संजय भेंडे, शहर प्रचारप्रमुख चंदन गोस्वामी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकांत एक नवा इतिहास रचला जाणार आहे. महायुतीला २२१ हून अधिक जागा मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास आहेच. शिवाय काँग्रेस व विरोधकांची वैचारिक दिवाळखोरीदेखील सर्वांसमोर आली आहे. विविध मुद्यांवर विरोधकांचा गोंधळ आहे व ते नेमके कुठल्या बाजूला आहे हेच त्यांना सांगता येत नाही. ‘एनआरसी’संबंधात माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनीच पुढाकार घेतला होता व आता काँग्रेसचेच नेते ‘एनआरसी’ला विरोध करत आहेत. ‘जीएसटी कॉन्सिल’मध्ये काँग्रेसचे अनेक नेते आहेत व ते बैठकीत एकमताने काम करतात. बाहेर जाऊन मात्र ‘गब्बर सिंह टॅक्स’ असे म्हणतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अनेक पक्ष सांभाळतात असे एकेकाळी म्हटले जायचे. आज त्यांना स्वत:चा पक्षदेखील सांभाळता येत नाही अशी स्थिती आहे, असे जावडेकर म्हणाले. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्यावरदेखील आरोप केले. ‘पीएमसी’ बँक भ्रष्टाचारात पटेल यांच्या सहभागाचीदेखील चौकशी झाली पाहिजे. विदेशी विमान कंपन्यांना फायदा पोहोचविण्यासाठी ‘एअर इंडिया’ला त्यांनीच रसातळाला नेले, असे ते म्हणाले. विदर्भाला मागील पाच वर्षांपासून न्याय मिळत असून विकासाची गंगा वाहते आहे. अशा स्थितीत वेगळ््या विदर्भाचा विषय मागे पडला आहे. मात्र विदर्भाबाबत जनसंघापासून आमची भूमिका स्पष्ट आहे, असे प्रतिपादनदेखील त्यांनी केले.राष्ट्रवाद हा निवडणुकांचा मुद्दा असेलचराष्ट्रवादाचा मुद्दा हा निवडणुकांत अगोदरही होता व पुढेदेखील असेलच. सावरकर यांना भारतरत्न देण्यासंदर्भात काँग्रेस नेते विनाकारण वक्तव्य देत आहेत. सावरकर यांच्यासंबंधात काँग्रेस नेत्यांनी स्वत:च्याच पक्षाचा इतिहास तपासावा. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सावरकर यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले होते. तर सी.राजगोपालाचारी यांनी पुस्तक लिहीले होते.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Prakash Javadekarप्रकाश जावडेकरMediaमाध्यमे