शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

Maharashtra Assembly Election 2019  : नागपुरात मतदानासाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 21:22 IST

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे१७ हजारावर निवडणूक कर्मचारी तैनात ८९ टक्के लोकांपर्यंत पोहोचल्या व्होटर स्लीप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवार २१ तारखेला मतदान होणार आहे. मतदानासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाली असून प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकोश ओला, विशेष शाखेच्या पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.निवडणुकीसाठी एकूण १७ हजारावर निवडणूक कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांचे दोन प्र्रशिक्षण पूर्ण झाले असून, तिसरे प्रशिक्षण उद्या होणार आहे. नागपूर जिल्ह्यातील तब्बल ८९ टक्के मतदारांपर्यंत व्होटर स्लीप पोहोचलेल्या आहेत. मतदान केंद्रांवर मतदारंसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अंध, अपंग दिव्यांगांसाठी रॅम्प, व्हीलचेअरसह विशेष व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत.यंदा मतदान केंद्रांवर बसण्याची व्यवस्थाहीमतदान केंद्रांवर मतदानासाठी मोठी रांग असते. मतदारांना साधी बसायचीही सुविधा नसते, हे नेहमीचेच चित्र आहे. परंतु यंदा मतदान केंद्रांवर मतदारांना बसण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तशी माहिती दिली.मतदारांच्या माहितीसाठी ‘व्होटर गाईड’मतदान करण्याच्या प्रक्रियेची माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर ‘व्होटर गाईड’ची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मतदान कसे करावे, यासोबतच ईव्हीएम कसे काम करते, याची माहितीही यावर राहणार आहे.४४३ मतदान केंद्राच्या ठिकाणी वेब कास्टिंगजिल्ह्यात एकूण ४,४१२ मतदान केंद्र आहेत. त्यापैकी ४४३ ठिकाणी वेब कास्टिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये त्या मतदान केंद्रावर घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीवर थेट लक्ष राहील. त्याचे केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात राहील.एक्झीट पोलला मनाईनिवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार एक्झीट पोलला मनाई आहे. कुणीही एक्झीट पोल दाखविल्यास कारवाई केली जाईल.जमावबंदी कायदा लागूनिवडणूक प्रचार संपला आहे. आता केवळ घरोघरी जाऊन संपर्क करता येईल. परंतु पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येणार नाही. नागपुरात कलम १४४ अंतर्गत जमावबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019collectorजिल्हाधिकारीMediaमाध्यमे