शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ स्मृतींनी आजही येतात शहारे

By admin | Updated: July 30, 2015 03:16 IST

महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही.

मोवाड महापुराला २४ वर्षे : २०४ गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधीअविनाश गजभिये  मोवाड महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही. महापुराला दोन तपांचा कालावधी लोटला असला तरी महापुराच्या धक्क्यातून अद्यापही मोवाडवासी सावरलेले नाही. आजही या घटनेची आठवण काढताच तडाखा सहन केलेल्या नागरिकांच्या अंगावर शहारे येतात. मोवाडसाठी ३० जुलै १९९१ हा ‘काळा दिवस’च ठरला. महापुराने २०४ निरपराध लोकांना जलसमाधी मिळाली. ती रात्र सर्वांसाठी वैऱ्याचीच ठरली. मृतदेहांचा सडा दोन ते तीन किमीपर्यंत पसरला होता. यात उरली फक्त काही देवांची मंदिरे. महापुराची बातमी सर्वत्र पसरताच शेकडो हात मदतीसाठी धावले. मोवाडचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन कायद्यातील कलम आणि पोटकलमात हे गाव हरविले आहे. पूरग्रस्तांना २५ हजार रुपये आणि तीन हजार चौरस फूट जागा दिली. मोवाड येथील शेतकऱ्यांकडे पुरापूर्वी जवळपास १ हजार ६५० एकर शेती होती. पुरात ६५० एकर शेती खरडल्या गेली ती आता पडिक आहे. ३५० एकरमध्ये गावाचे पुनर्वसन करण्यात आले. ३५० एकर शेती रेल्वेमार्गात गेली. आता उरल्या शेतीवर गुजराण करावी लागते. महाराष्ट्राच्या आणि नागपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या या गावासाठी वर्धा नदी जीवनदायी अशीच होती. या नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होत असल्याने उत्पन्नात भर पडून शेतकरीही सधन झाले होते. येथे मोठी बाजारपेठही होती परंतु, ३० जुलै १९९१ च्या रात्री याच वर्धा नदीने अख्ख्या मोवाडवासीयांचे संसार विस्कळीत केले. त्यामुळे महापुरापूर्वीचे जमीनदार आता शेतमजूर म्हणून काम करीत आहेत.बाहेरगावाहून शेतमजूर येणाऱ्या मोवाडचे चित्र पालटून आता या गावातील नागरिक १५ ते २० किमीपर्यंतच्या पट्ट्यात बाहेरगावी कामाला जातात, हे येथील वास्तव आहे. लोकसंख्या तेव्हा १० हजारांपेक्षा अधिक होती. आता केवळ ८ हजार ५०० आहे. दरवर्षी ३० जुलैला मोवाडवासी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळत असून, जलसमाधी मिळालेल्या २०४ गावकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. यासाठी मोठमोठे नेते येतात आणि आश्वासने देत जखमांवर मीठ चोळण्याचेच काम करून जातात. मोवाडवासीयांवर असलेले कर्ज माफ, तरुणांच्या हाताला काम देण्याची घोषणा करतात. परंतु, या घोषणा क्षणातच हवेत विरतात. परत पुढील वर्षी हेच नेते ‘मागच्या पानावरून पुढे’ असा पाढा वाचतात. काही दिवसांपूर्वी मोवाडवासीयांना थोडा दिलासा मिळाला. यापुढे त्यांना त्यांच्या घरावर कर्ज मिळणे शक्य होणार आहे. किमान त्या आधारे जीवनमान सुधारण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.