शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

‘त्या’ स्मृतींनी आजही येतात शहारे

By admin | Updated: July 30, 2015 03:16 IST

महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही.

मोवाड महापुराला २४ वर्षे : २०४ गावकऱ्यांना मिळाली होती जलसमाधीअविनाश गजभिये  मोवाड महापुरात मोवाडचे वैभव वाहून गेले त्या घटनेस उद्या (दि. ३०) २४ वर्षे होत आहे. दोन दशकं उलटून गेली तरी मोवाडचे वैभव प्राप्त होऊ शकले नाही. महापुराला दोन तपांचा कालावधी लोटला असला तरी महापुराच्या धक्क्यातून अद्यापही मोवाडवासी सावरलेले नाही. आजही या घटनेची आठवण काढताच तडाखा सहन केलेल्या नागरिकांच्या अंगावर शहारे येतात. मोवाडसाठी ३० जुलै १९९१ हा ‘काळा दिवस’च ठरला. महापुराने २०४ निरपराध लोकांना जलसमाधी मिळाली. ती रात्र सर्वांसाठी वैऱ्याचीच ठरली. मृतदेहांचा सडा दोन ते तीन किमीपर्यंत पसरला होता. यात उरली फक्त काही देवांची मंदिरे. महापुराची बातमी सर्वत्र पसरताच शेकडो हात मदतीसाठी धावले. मोवाडचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र पुनर्वसन कायद्यातील कलम आणि पोटकलमात हे गाव हरविले आहे. पूरग्रस्तांना २५ हजार रुपये आणि तीन हजार चौरस फूट जागा दिली. मोवाड येथील शेतकऱ्यांकडे पुरापूर्वी जवळपास १ हजार ६५० एकर शेती होती. पुरात ६५० एकर शेती खरडल्या गेली ती आता पडिक आहे. ३५० एकरमध्ये गावाचे पुनर्वसन करण्यात आले. ३५० एकर शेती रेल्वेमार्गात गेली. आता उरल्या शेतीवर गुजराण करावी लागते. महाराष्ट्राच्या आणि नागपूर जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या या गावासाठी वर्धा नदी जीवनदायी अशीच होती. या नदीच्या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग होत असल्याने उत्पन्नात भर पडून शेतकरीही सधन झाले होते. येथे मोठी बाजारपेठही होती परंतु, ३० जुलै १९९१ च्या रात्री याच वर्धा नदीने अख्ख्या मोवाडवासीयांचे संसार विस्कळीत केले. त्यामुळे महापुरापूर्वीचे जमीनदार आता शेतमजूर म्हणून काम करीत आहेत.बाहेरगावाहून शेतमजूर येणाऱ्या मोवाडचे चित्र पालटून आता या गावातील नागरिक १५ ते २० किमीपर्यंतच्या पट्ट्यात बाहेरगावी कामाला जातात, हे येथील वास्तव आहे. लोकसंख्या तेव्हा १० हजारांपेक्षा अधिक होती. आता केवळ ८ हजार ५०० आहे. दरवर्षी ३० जुलैला मोवाडवासी हा दिवस काळा दिवस म्हणून पाळत असून, जलसमाधी मिळालेल्या २०४ गावकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यात येते. यासाठी मोठमोठे नेते येतात आणि आश्वासने देत जखमांवर मीठ चोळण्याचेच काम करून जातात. मोवाडवासीयांवर असलेले कर्ज माफ, तरुणांच्या हाताला काम देण्याची घोषणा करतात. परंतु, या घोषणा क्षणातच हवेत विरतात. परत पुढील वर्षी हेच नेते ‘मागच्या पानावरून पुढे’ असा पाढा वाचतात. काही दिवसांपूर्वी मोवाडवासीयांना थोडा दिलासा मिळाला. यापुढे त्यांना त्यांच्या घरावर कर्ज मिळणे शक्य होणार आहे. किमान त्या आधारे जीवनमान सुधारण्याची अपेक्षा नागरिकांमध्ये आहे.