शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
2
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
3
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
4
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
5
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
6
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
7
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
8
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
9
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
10
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
11
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
12
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
13
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
14
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
15
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
16
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
17
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
19
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
20
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 

महाचर्चेत झाले महामंथन

By admin | Updated: September 12, 2016 02:45 IST

नागपूरच्या विकासावर आधारित या महाचर्चेत एकूण चार सत्रात नागपूर शहरातील विविध नागरी प्रश्नांवर विचारमंथन झाले.

नागपूर : नागपूरच्या विकासावर आधारित या महाचर्चेत एकूण चार सत्रात नागपूर शहरातील विविध नागरी प्रश्नांवर विचारमंथन झाले. पहिल्या सत्रात ‘नागपूर शहराचा मूलभूत विकास आणि उपाय’ ( नगर विकास, नागरी सुविधा, २४ तास शुद्ध पाणी, शहर वाहतूक व्यवस्था, उद्याने व क्रीडांगणे, टाऊन हॉल, घनकचरा विल्हेवाट, रस्ते, सार्वजनिक शौचालय, कचऱ्याचे सिंगापूर सुंदर होऊ शकते मग नागपूर का नाही ? ) या विषयावर ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, ‘नीरी’चे वरिष्ठ वैज्ञानिक पवन लाभसेटवार उपस्थित होते. दुसऱ्या सत्राचा विषय ‘झोपडपट्ट्यांचा विकास’ (सरकारी योजना व अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या व अपेक्षा, भविष्यात झोपडपट्ट्या निर्माण होऊ नये, अतिक्रमण निर्माण होऊ नये ) हा होता. यात आमदार प्रकाश गजभिये, कृष्णा खोपडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, वास्तुविशारद वीरेंद्र खरे सहभागी झाले होते.तिसऱ्या सत्रात ‘नागपूर मेट्रो व पायाभूत विकास’ (पार्किंगच्या योजना, पार्किंग स्थळांवरील अतिक्रमण, प्रस्तावित योजना, फूटपाथची स्थिती, अंध अपंग वृद्ध नागरिकांसाठी व्यवस्था ) या विषयावर झालेल्या चर्चेत आमदार सुधाकर कोहळे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष अनिल नायर, उद्योगपती व वास्तुविशारद अशोक मोखा यांनी मत मांडले. चौथ्या व अखेरच्या सत्रात ‘महापालिका आणि नासुप्र आपली जबाबदारी पार पाडत आहेत का ?’ (करदात्यांना सोयी सुविधा मिळतात का, भ्रष्टाचार, चुकीचे नियोजन आणि व्होट बँक यामुळे शहराचा विकास खुंटला का ?) या विषयावर चर्चा झाली. यात आमदार अनिल सोले, मनपातील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख व ‘व्हीआयए’चे अध्यक्ष अतुल पांडे सहभागी झाले होते. मॉडरेटर म्हणून लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत समाचारचे निवासी संपादक हर्षवर्धन आर्य, लोकमतचे सहाय्यक संपादक गजानन जानभोर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)