शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

महाचर्चेत झाले महामंथन

By admin | Updated: September 12, 2016 02:45 IST

नागपूरच्या विकासावर आधारित या महाचर्चेत एकूण चार सत्रात नागपूर शहरातील विविध नागरी प्रश्नांवर विचारमंथन झाले.

नागपूर : नागपूरच्या विकासावर आधारित या महाचर्चेत एकूण चार सत्रात नागपूर शहरातील विविध नागरी प्रश्नांवर विचारमंथन झाले. पहिल्या सत्रात ‘नागपूर शहराचा मूलभूत विकास आणि उपाय’ ( नगर विकास, नागरी सुविधा, २४ तास शुद्ध पाणी, शहर वाहतूक व्यवस्था, उद्याने व क्रीडांगणे, टाऊन हॉल, घनकचरा विल्हेवाट, रस्ते, सार्वजनिक शौचालय, कचऱ्याचे सिंगापूर सुंदर होऊ शकते मग नागपूर का नाही ? ) या विषयावर ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, ‘नीरी’चे वरिष्ठ वैज्ञानिक पवन लाभसेटवार उपस्थित होते. दुसऱ्या सत्राचा विषय ‘झोपडपट्ट्यांचा विकास’ (सरकारी योजना व अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या व अपेक्षा, भविष्यात झोपडपट्ट्या निर्माण होऊ नये, अतिक्रमण निर्माण होऊ नये ) हा होता. यात आमदार प्रकाश गजभिये, कृष्णा खोपडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, वास्तुविशारद वीरेंद्र खरे सहभागी झाले होते.तिसऱ्या सत्रात ‘नागपूर मेट्रो व पायाभूत विकास’ (पार्किंगच्या योजना, पार्किंग स्थळांवरील अतिक्रमण, प्रस्तावित योजना, फूटपाथची स्थिती, अंध अपंग वृद्ध नागरिकांसाठी व्यवस्था ) या विषयावर झालेल्या चर्चेत आमदार सुधाकर कोहळे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष अनिल नायर, उद्योगपती व वास्तुविशारद अशोक मोखा यांनी मत मांडले. चौथ्या व अखेरच्या सत्रात ‘महापालिका आणि नासुप्र आपली जबाबदारी पार पाडत आहेत का ?’ (करदात्यांना सोयी सुविधा मिळतात का, भ्रष्टाचार, चुकीचे नियोजन आणि व्होट बँक यामुळे शहराचा विकास खुंटला का ?) या विषयावर चर्चा झाली. यात आमदार अनिल सोले, मनपातील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख व ‘व्हीआयए’चे अध्यक्ष अतुल पांडे सहभागी झाले होते. मॉडरेटर म्हणून लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत समाचारचे निवासी संपादक हर्षवर्धन आर्य, लोकमतचे सहाय्यक संपादक गजानन जानभोर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)