शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
3
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
4
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
5
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
6
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
7
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
8
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
9
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
10
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
11
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
12
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
13
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
14
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
15
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
16
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
17
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
18
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
19
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
20
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...

नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:38 IST

येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.

ठळक मुद्देप्राणिप्रेमींमध्ये हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना नोव्हेंबर २००८ साली मेडकी, जि. चंद्र्रपूर येथील जंगलातून आणण्यात आले होते. तेव्हापासून गेली १० वर्षे या दोघी महाराज बाग प्राणिसंग्रहालयात होत्या. यापैकी जुईचा मृत्यू अगोदरच झाला. जुईच्या मृत्यूनंतर जाई महाराज बागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली होती. परंतु ५ नोव्हेंबर २०१७ रोजी साप चावल्यामुळे ती आजारी पडली. महाराज बाग , कृषी महाविद्यालय प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून जाईला जिवंत ठेवले. १७ नोव्हेंबरला विविध तपासणी अहवालातून तिची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. महाराज बाग प्रशासनातर्फे तिच्यावर दिवसरात्र उपचार सुरु होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळाले. जाईच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. त्यानंतर तिला १२ मार्च रोजी मोठ्या पिंजऱ्यात हलविण्यात आले आणि आवश्यक ते उपचार सुरु केले. परंतु २५ मार्च रोजी तिची प्रकृती खाल्यावल्यामुळे तिला प्राणिसंग्रहालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. परंतु २९ मार्च रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान जाईचा मृत्यू झाला. या घटनेने महाराज बाग परिसरात शोककळा पसरली. सकाळी ११.३० वाजता तिचे शवविच्छेदन झाले. यावेळी डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. विनोद धूत, डॉ. गौतम भोजने, डॉ. सुनील बावस्कर, व डॉ. अभिजित मोटघरे उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर दुपारी १२.१५ च्या सुमारास प्राणिसंग्रहालय परिसरात जुईला अगी्न देऊन अंत्यविधी करण्यात आला.अंत्यविधीच्या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी पार्लावार, प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर, डॉ. अभिजित मोटघरे, महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक दिनकर जीवतोडे, विशेष अधिकारी डॉ. सुभाष पोटदुखे, सहायक कुलसचिव आर.डी. चव्हाण, वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते.... म्हणून वाघाचा मृतदेह जाळला जातोडॉ. बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघ, चिता, भालू यासारखे वन्य प्राण्यांचा मृत्यूनंतर त्यांचे पोस्टमार्टम करून विसरा काढला जातो. तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो. या विसºयाच्या आधारावर प्राण्यांच्या मृत्यूची कारणे शोधली जातात. मृत्यूनंतर या प्राण्यांना जाळलेच गेले पाहिजे, असे आवश्यक नाही. परंतु वाघ, चिता आणि भालू यासारख्या वन्य प्राण्यांची स्किन, नखे, दात आणि शरीराचे इतर अंग हे अतिशय किमती असतात. खड्डा खोदून अंत्यसंस्कार केल्यास मृतदेह चोरून त्याची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून या प्राण्यांचा मृतदेह जाळला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.‘जान’ राहिली एकटीचंद्रपूरच्या जंगलातून जाई व जुईला अतिशय नाजुक अवस्थेत महाराज बागेत आणण्यात आले होते. जुईलाही वाचवण्याचा बराच प्रयत्न झाला होतो. पण तिला वाचवता आले नव्हते. त्यानंतर जाई महाराज बागेत इतर वाघांसोबत राहू लागली. नंतर जुनैना येथे आईपासून दुरावलेल्या ‘ली’, जान आणि चेरी सुद्धा महाराज बागेत आल्या. यानंतर शिकाऱ्यांच्या जाळात फसून अपंग झालेला वाघ ‘साहेबराव’ यालाही महाराज बागेत आणण्यात आले. परंतु नंतर त्याला गोरेवाडा येथे पाठवण्यात आले. नंतर ‘ली’ ला साहेबरावसोबत गोरेवाडा जंगलात पाठवण्यात आले. आता जाईच्या मृत्यूनंतर ‘जान’ ही महाराज बागेत एकटीच राहिली आहे. तिला आता नवीन सोबती कधी व केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरTigerवाघ