शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
3
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
4
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
5
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
6
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
7
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
8
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
9
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
10
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
11
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
12
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
14
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
15
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
16
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
17
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
18
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
19
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
20
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या महाराजबागेची शान गेली : ‘जाई’ वाघिणीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 22:38 IST

येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.

ठळक मुद्देप्राणिप्रेमींमध्ये हळहळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : येथील महाराज बाग प्राणिसंग्रहालयाची शान समजल्या जाणाऱ्या ‘जाई’ वाघिणीचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. गेल्या साडेचार महिन्यांपासून ही वाघिण मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होती. तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही.आईपासून दुरावलेल्या जाई व जुई या दोन वाघिणींना नोव्हेंबर २००८ साली मेडकी, जि. चंद्र्रपूर येथील जंगलातून आणण्यात आले होते. तेव्हापासून गेली १० वर्षे या दोघी महाराज बाग प्राणिसंग्रहालयात होत्या. यापैकी जुईचा मृत्यू अगोदरच झाला. जुईच्या मृत्यूनंतर जाई महाराज बागेतील आकर्षणाचे प्रमुख केंद्र बनली होती. परंतु ५ नोव्हेंबर २०१७ रोजी साप चावल्यामुळे ती आजारी पडली. महाराज बाग , कृषी महाविद्यालय प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न करून जाईला जिवंत ठेवले. १७ नोव्हेंबरला विविध तपासणी अहवालातून तिची दोन्ही मूत्रपिंड निकामी झाल्याचे स्पष्ट झाले. महाराज बाग प्रशासनातर्फे तिच्यावर दिवसरात्र उपचार सुरु होते. या प्रयत्नांना काही प्रमाणात यशही मिळाले. जाईच्या प्रकृतीत थोडीफार सुधारणा दिसून आली. त्यानंतर तिला १२ मार्च रोजी मोठ्या पिंजऱ्यात हलविण्यात आले आणि आवश्यक ते उपचार सुरु केले. परंतु २५ मार्च रोजी तिची प्रकृती खाल्यावल्यामुळे तिला प्राणिसंग्रहालयाच्या दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांचे प्रयत्न सुरु होते. परंतु २९ मार्च रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान जाईचा मृत्यू झाला. या घटनेने महाराज बाग परिसरात शोककळा पसरली. सकाळी ११.३० वाजता तिचे शवविच्छेदन झाले. यावेळी डॉ. प्रशांत सोनकुसरे, डॉ. विनोद धूत, डॉ. गौतम भोजने, डॉ. सुनील बावस्कर, व डॉ. अभिजित मोटघरे उपस्थित होते. शवविच्छेदनानंतर दुपारी १२.१५ च्या सुमारास प्राणिसंग्रहालय परिसरात जुईला अगी्न देऊन अंत्यविधी करण्यात आला.अंत्यविधीच्या वेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एन. डी पार्लावार, प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर, डॉ. अभिजित मोटघरे, महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी प्राध्यापक दिनकर जीवतोडे, विशेष अधिकारी डॉ. सुभाष पोटदुखे, सहायक कुलसचिव आर.डी. चव्हाण, वन्यजीव रक्षक कुंदन हाते उपस्थित होते.... म्हणून वाघाचा मृतदेह जाळला जातोडॉ. बावस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार वाघ, चिता, भालू यासारखे वन्य प्राण्यांचा मृत्यूनंतर त्यांचे पोस्टमार्टम करून विसरा काढला जातो. तो फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला जातो. या विसºयाच्या आधारावर प्राण्यांच्या मृत्यूची कारणे शोधली जातात. मृत्यूनंतर या प्राण्यांना जाळलेच गेले पाहिजे, असे आवश्यक नाही. परंतु वाघ, चिता आणि भालू यासारख्या वन्य प्राण्यांची स्किन, नखे, दात आणि शरीराचे इतर अंग हे अतिशय किमती असतात. खड्डा खोदून अंत्यसंस्कार केल्यास मृतदेह चोरून त्याची तस्करी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून या प्राण्यांचा मृतदेह जाळला जातो, असे त्यांनी स्पष्ट केले.‘जान’ राहिली एकटीचंद्रपूरच्या जंगलातून जाई व जुईला अतिशय नाजुक अवस्थेत महाराज बागेत आणण्यात आले होते. जुईलाही वाचवण्याचा बराच प्रयत्न झाला होतो. पण तिला वाचवता आले नव्हते. त्यानंतर जाई महाराज बागेत इतर वाघांसोबत राहू लागली. नंतर जुनैना येथे आईपासून दुरावलेल्या ‘ली’, जान आणि चेरी सुद्धा महाराज बागेत आल्या. यानंतर शिकाऱ्यांच्या जाळात फसून अपंग झालेला वाघ ‘साहेबराव’ यालाही महाराज बागेत आणण्यात आले. परंतु नंतर त्याला गोरेवाडा येथे पाठवण्यात आले. नंतर ‘ली’ ला साहेबरावसोबत गोरेवाडा जंगलात पाठवण्यात आले. आता जाईच्या मृत्यूनंतर ‘जान’ ही महाराज बागेत एकटीच राहिली आहे. तिला आता नवीन सोबती कधी व केव्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Maharajbagh Nagpurमहाराजबाग नागपूरTigerवाघ