शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
3
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
4
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
5
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
6
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
7
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
8
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
9
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
10
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
11
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
13
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
14
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
15
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
16
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
17
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
18
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
19
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
20
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका

मग्रारोहयोच्या कंत्राटी कर्मचाºयांसह ग्रामरोजगार सेवकांचे मानधन अडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 02:31 IST

मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही.

ठळक मुद्देतीन महिन्यांपासून वेतनाकरिता परवड

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मग्रारोहयो अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर गत सहा ते सात वर्षांपासून कंत्राटी नियुक्तीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना व ग्रामरोजगार सेवकांना तीन महिन्यांपासून कुठलेही मानधन मिळाले नाही. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाºयांच्या मानधनाचा मार्ग मोकळा करावा अशी मागणी या कर्मचाºयांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे.कर्मचाºयांच्या या समस्येबाबत त्यांच्या प्रतिनिधींनी वरिष्ठ कार्यालयास संपर्क साधून वारंवार विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त आदेशानुसार गत १९ जून २०१७ पासून सर्व कर्मचारी वर्ग एकही शासकीय सुट्टी, किरकोळ रजा न घेता सतत ३६ दिवसांपासून काम करीत आहेत. मानधनाअभावी आमची स्थिती फार हलाखीची आहे. ही समस्या सोडविण्याकरिता या कामगारांकडून तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंतच्या अधिकाºयांना साकडे घालण्यात आले. प्रत्येक अधिकाºयानेच त्यांना समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. दिलेले आश्वासन अधिकाºयांनी पूर्ण केले नाही तर समस्या सोडविण्याकरिता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असे संघटनेच्यावतीने सांगण्यात आले.शासनाकडून प्राप्त विहित मुदतीत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशा वेळेस दबाव तंत्राचा वापर केल्यास मानसिकता वाईट होऊन कामावर प्रभाव होण्याची शक्यता आहे. करीता अत्यल्प मानधनात कंत्राटी कर्मचारी काम करीत असल्याची जाणीव ठेवून वागणूक देण्यात यावी. जिल्हा स्तरावरून सतत सर्व कामाचे १०० उद्दिष्ट साध्य करण्याबाबत दबाव वाढत आहे. करीता उपरोक्त बाबीवर आपण गांभिर्य पुर्वक विचार करावा अशी मागणी होत आहे. यावेळी जिल्ह्यातील ग्रामरोजगार आणि कंत्राटी कर्मचारी सहभागी होते.अधिकाºयांनी दिले समस्या सोडविण्याचे आश्वासनसंघटनेच्या पदाधिकाºयांनी विविध समस्या मार्गी काढण्याकरिता अधिकाºयांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान अधिकाºयांनी असलेल्या समस्या मार्गी लावण्यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाºयांना आश्वासन दिले.