शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
4
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
5
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
6
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
7
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
8
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
9
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
10
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
11
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
12
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
14
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
15
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
16
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
17
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
18
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
19
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
20
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
Daily Top 2Weekly Top 5

माेदी सरकार शेतकऱ्यांना फसवित आहे : जावंधिया ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

नागपूर : महाराष्ट्र राज्य किसान महासभा जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका ...

नागपूर : महाराष्ट्र राज्य किसान महासभा जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. विविध उदाहरणे व आकडेवारी सादर करीत माेदी सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षा नीतीविरुद्ध आंदोलन समन्वय समितीच्यावतीने शेती व शिक्षण हक्क परिषदेत ते बाेलत हाेते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरुवेला कॉलनी, वर्धा रोड येथे ही परिषद पार पडली. समितीचे राज्य मुख्य समन्वयक अशोक सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत सीपीआय नेते अरुण वनकर, सत्यशोधक शिक्षक सभेचे अध्यक्ष रमेश बीजेकर यांनी मार्गदर्शन केले. सीपीएमचे जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी ठराव वाचन केले. कोरोना आजाराचा दुरुपयोग करून संसदेला दुर्लक्षित करून दरबारी भांडवलदारांना नफा मिळवून देण्यासाठी शेतकरीविरोधी, गरीब आणि महिलांविरोधी क्रूर कायदे करून त्यांना संकटात आणले आहे. त्याविरुद्ध दिल्लीला सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ही परिषद सक्रिय पाठिंबा देत असल्याचा ठराव येथे पारीत करण्यात आला.

रमेश बीजेकरांनी, केंद्र सरकारचे शिक्षण धाेरण हे अंधश्रद्धा, जाती व्यवस्थेला खतपाणी घालणारे असल्याचा आराेप करीत, माेदी सरकारने मनुस्मृतीची प्रतिष्ठापना करून मागासवर्गीय, आदिवासी, दलित आणि महिलांच्या दमनाचे षड्‌यंत्र रचल्याचा आराेप केला. अशोक सरस्वती यांनी कृषी कायदे व शिक्षण धाेरणाविराेधात समितीने ३६ जिल्ह्यात आंदोलन उभारणी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले.

संचालन प्रमिला सोनवणे, प्रास्ताविक प्रा. घन:श्याम धाबर्डे यांनी केले, तर यशवंत वासनिक यांनी आभार मानले.