शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
7
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
8
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
9
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
10
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
11
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
12
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
13
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
14
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
15
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
16
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
17
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
18
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

माेदी सरकार शेतकऱ्यांना फसवित आहे : जावंधिया ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:48 IST

नागपूर : महाराष्ट्र राज्य किसान महासभा जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका ...

नागपूर : महाराष्ट्र राज्य किसान महासभा जिल्हाध्यक्ष, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी नव्या कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर टीका केली. विविध उदाहरणे व आकडेवारी सादर करीत माेदी सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करीत असल्याचा आराेप त्यांनी केला. राष्ट्रीय शिक्षा नीतीविरुद्ध आंदोलन समन्वय समितीच्यावतीने शेती व शिक्षण हक्क परिषदेत ते बाेलत हाेते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह, उरुवेला कॉलनी, वर्धा रोड येथे ही परिषद पार पडली. समितीचे राज्य मुख्य समन्वयक अशोक सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेत सीपीआय नेते अरुण वनकर, सत्यशोधक शिक्षक सभेचे अध्यक्ष रमेश बीजेकर यांनी मार्गदर्शन केले. सीपीएमचे जिल्हा सचिव अरुण लाटकर यांनी ठराव वाचन केले. कोरोना आजाराचा दुरुपयोग करून संसदेला दुर्लक्षित करून दरबारी भांडवलदारांना नफा मिळवून देण्यासाठी शेतकरीविरोधी, गरीब आणि महिलांविरोधी क्रूर कायदे करून त्यांना संकटात आणले आहे. त्याविरुद्ध दिल्लीला सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला ही परिषद सक्रिय पाठिंबा देत असल्याचा ठराव येथे पारीत करण्यात आला.

रमेश बीजेकरांनी, केंद्र सरकारचे शिक्षण धाेरण हे अंधश्रद्धा, जाती व्यवस्थेला खतपाणी घालणारे असल्याचा आराेप करीत, माेदी सरकारने मनुस्मृतीची प्रतिष्ठापना करून मागासवर्गीय, आदिवासी, दलित आणि महिलांच्या दमनाचे षड्‌यंत्र रचल्याचा आराेप केला. अशोक सरस्वती यांनी कृषी कायदे व शिक्षण धाेरणाविराेधात समितीने ३६ जिल्ह्यात आंदोलन उभारणी प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितले.

संचालन प्रमिला सोनवणे, प्रास्ताविक प्रा. घन:श्याम धाबर्डे यांनी केले, तर यशवंत वासनिक यांनी आभार मानले.