शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

कामगारांच्या अधिकारांवर गदा

By admin | Updated: August 10, 2016 02:46 IST

महाराष्ट्रातील कामगार हा नेहमीच सुरक्षित राहिला आहे. त्याला कामगार कायद्याचे पाठबळ मिळाले आहे

संघटना संपविण्याचा कट : विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचा संताप नागपूर : महाराष्ट्रातील कामगार हा नेहमीच सुरक्षित राहिला आहे. त्याला कामगार कायद्याचे पाठबळ मिळाले आहे आणि यातून त्याचे हक्क आणि अधिकाराचे संरक्षण झाले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून कामगार कायद्यातील सुधारणांच्या नावाखाली कामगारांचे हक्क आणि अधिकार हिरावण्याचा प्रयत्न चालविला जात आहे. एवढेच नव्हे, तर त्यांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनासुद्धा संपविण्याचा कट रचला जात आहे. असा संताप शहरातील विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ‘लोकमत’ व्यासपीठच्या मंचावर व्यक्त केला. या चर्चेत राष्ट्रीय माथाडी श्रमिक संघाचे (इंटक) अध्यक्ष बजरंगसिंग परिहार, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक संघटनेचे नागपूर जिल्हा महासचिव चंद्रशेखर पानतावणे, विदर्भ प्रहार कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा अ‍ॅड़ हर्षल कुमार चिपळुणकर, राष्ट्रीय इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष राजेश फुले, राष्ट्रीय महिला मोलकरीण संघटनेच्या सुनीता सोमकुंवर व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक कामगार संघटनेचे नारायण महल्ले यांनी भाग घेतला होता. राज्यात तब्बल ३९ माथाडी कामगार मंडळे आहेत. शिवाय त्यात ४० लाखांपेक्षा अधिक कामगारांचा समावेश आहे. सोबतच २८ सुरक्षा रक्षक मंडळांमध्ये २८ लाख कर्मचारी आहेत. राज्यात या सर्व कामगारांचे हक्क आणि अधिकारांच्या संरक्षणासाठी विविध कायदे तयार झाले आहेत. मात्र सध्याच्या सरकारने त्या सर्व कायद्यात सुधारणा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिवाय या माध्यमातून कारखानदारांसाठी पोषक कायदे तयार करण्याचा घाट रचला जात आहे. यातून भविष्यात कामगारांचे प्रचंड आर्थिक शोषण होण्याची भीती निर्माण झाली आहे. कामगार हा नेहमीच शोषित राहिला आहे. त्याला आपल्या हक्कासाठी सतत संघर्ष करावा लागला आहे. अशा स्थितीत सरकार त्यांना कायदेशीर पाठबळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करू पाहत आहे. कामगार हा समाजातील प्रमुख घटक राहिला आहे. त्याचा देशाच्या विकासात फार मोठा वाटा राहिला आहे. मग असे असताना त्याला दुर्बल करून चालणार नाही. कामगार जगला तर कारखाने टिकतील, आणि कारखाने टिकले, तर विकास होईल. त्यामुळे कारखान्यांसोबतच त्यामध्ये काम करणारा प्रत्येक कामगारसुद्धा जगला पाहिजे, अशी भूमिका यावेळी कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी) कामगार कायद्याची अंमलबजावणी कशी होणार? कामगार कायद्याची अंमलबजावणी करून, कामगारांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या अपर कामगार आयुक्त कार्यालयातील शेकडो पदे रिक्त पडली आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकूण २७२ पदे मंजूर आहेत, परंतु त्यापैकी तब्बल १०४ पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे यावेळी परिहार यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर उपराजधानीतील अपर कामगार आयुक्तांचे पद मागील दोन वर्षांपासून रिक्त असल्याचे ते म्हणाले. तसेच सहायक कामागार आयुक्तांची ५, कामगार अधिकाऱ्यांची ९, किमान वेतन निरीक्षकांची २५, दुकाने निरीक्षकांची १२, वरिष्ठ कामगार अन्वेषकांची २ व वरिष्ठ लिपिकाची ३ अशी अनेक महत्त्वाची पदे रिक्त असल्याचे ते म्हणाले. यामुळे कामगार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसून, कामगारांना न्याय मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात २०१० मध्ये सुरक्षा रक्षक मंडळाची स्थापना करण्यात आली आहे, मात्र या मंडळासाठी एकही अधिकारी व कर्मचारी नाही. याशिवाय माथाडी कामगार बोर्डासाठी ५० कर्मचाऱ्यांची गरज असताना केवळ १३ कर्मचाऱ्यांच्या भरोशावर या मंडळाचा कारभार सुरू आहे. यातही त्याच १३ लोकांवर सुरक्षा रक्षक मंडळाचा अतिरिक्त बोजा देण्यात आला असल्याचे राष्ट्रीय इमारत बांधकाम संघटनेचे अध्यक्ष राजेश फुले यांनी सांगितले.