शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
2
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
3
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
4
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
5
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
6
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
7
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
8
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
9
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
10
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
11
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
12
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
13
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
14
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
15
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
16
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
17
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
18
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
19
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
20
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?

गीतकार हा मानवी जीवनाचाही भाष्यकार असतो

By admin | Updated: June 26, 2014 00:53 IST

कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ

यशवंत मनोहर :कवी बी. काशीनंद यांना आदरांजली नागपूर : कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ योग्य पद्धतीने चालावी यासाठी प्रेरणा द्यावी लागते. योग्य पद्धतीने चळवळ चालावी म्हणून कारणे द्यावी लागतात. गीतकार हा विचारांचा समीक्षकच असतो. तो मानवी जीवनांचा भाष्यकारही असतो, असे मत सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले.निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्यावतीने स्मृतिशेष गीतकार, कवी बी. काशीनंद यांना श्रद्धांजली देण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला कवी इ.मो. नारनवरे, सतेश्वर मोरे, अशोक बुरबुरे, संजय शेजव, राहुल दहिकर, प्रवीण कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. डॉ. मनोहर म्हणाले, गीतकाराला चळवळीसाठी गीते लिहिताना संपूर्ण सामाजिक स्थितीचा विचार करावा लागतो. तो समाजाला मार्गदर्शन आणि दिशाही देत असतो. त्यामुळेच गीतकार अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यात बी. काशीनंद यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. बी. काशीनंद यांनी गीतांच्या माध्यमातून विचार दिला, प्रेरणा दिली आणि लोकशिक्षणही केले. त्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. संजय शेजव म्हणाले, बी. काशीनंद यांची गीते महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. वामनदादा कर्डक यांच्यानंतर त्यांच्या गीतांनीच आम्हाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनाने विचार देणारा मार्गदर्शक हरपला. राहुल दहिकर म्हणाले, माझा त्यांचा परिचय नव्हता; पण गीतकार, कवी आणि छायाचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या गीतांनी समाजमन ढवळून निघाले. आपणही समाजासाठी काम करीत राहणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. इ.मो. नारनवरे म्हणाले, समाज कसा घडावा आणि तो कुठल्या दिशेने गेला पाहिजे, याचे मार्गदर्शन बी. काशीनंद यांच्या गीतांनी केले. समाज घडण्यामागे अशा अनेक कवींचा सहभाग आहे. आंबेडकरांचा विचार पोहोचविणाऱ्या या कवींची मात्र उपेक्षाच झाली. कवितेतून समाजात ऊर्जा पेरणाऱ्या या कवीला माझा सलाम आहे. अशोक बुरबुरे म्हणाले, बी. काशीनंद यांचे नाव लहानपणापासून ऐकले आहे. त्यांच्या गीतांनीच आमच्या पिढीवर संस्कार झाले. त्यांच्या गीतांनी एक काळ गाजला. हल्ली मात्र मुक्तछंदातच सारे लिहित आहेत. मुक्तछंद हा कवितेला लागलेला शाप आहे. यामुळे लोककलावंतांना नाकारले जात आहे. ज्यांनी मार्ग आणि विचार दिला त्यांना आम्ही सन्मान देऊ शकत नाही का, हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. बी. काशीनंद यांचा वारसा सांगताना आम्हाला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. सतेश्वर मोरे म्हणाले, आंबेडकरी मूल्य समाजात झिरपवण्याचे काम बी. काशीनंद यांनी केले. आता लोककलावंत खेड्यातून शहरात येतात आणि शहरात त्यांची कविता फुलत नाही कारण त्यांच्या गीताला प्रेरणा देणारी स्थिती येथे नसते. त्यामुळे तळागाळातल्या माणसाच्या प्रबोधनाची चिंता वाटते. पूर्वी लोकगीतांचे कार्यक्रम रात्रभर चालायचे. आता रात्री १० वाजताची मर्यादा आल्याने ही चळवळ खुंटते आहे. ही परंपरा सुरू राहावी, आणि समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी बी काशीनंद यांचा मुलगा सुनील बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध आंबेडकरी आणि सामाजिक संघटनांनी बी. काशीनंद यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)