शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
2
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
3
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
4
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
5
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
6
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
7
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल
8
"मुंबईत सत्तेत असताना मराठी माणसाला हद्दपार केलं आणि आता सत्ता मिळवण्यासाठी पुन्हा..."
9
भारताच्या शत्रूसोबत अजरबैजानची १७ हजार कोटींची डील, काय आहे त्यांचा प्लान?
10
"आमच्यासारख्या गावठीवर त्याने...", अखेर शरद उपाध्ये-निलेश साबळे वादावर CHYDचा कलाकार बोलला, काय म्हणाला?
11
राज ठाकरेंजवळ आदित्य, उद्धव ठाकरेंजवळ अमित, सुप्रिया सुळेंनी एकत्र आणलं; पाहा Video
12
Ashadhi Ekadashi 2025: एकादशी व्रताचे पालन म्हणजे थेट विष्णुकृपा; आषाढीपासून होते सुरुवात!
13
Uddhav Thackeray pats Raj Thackeray Video : कौतुकाची थाप..!! राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरे यांच्या कृतीने मराठी माणूस सुखावला...
14
"निवडणुकीत हरणार म्हणून कुटुंब "तहात" जिंकण्याचा प्रयत्न"; भाजपाचा पलटवार
15
"३० वर्ष झाली तरी मराठी माणसासारखी..."; सुशील केडियांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली
16
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
17
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ...तर आहोत आम्ही गुंड; उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना आव्हान
18
Raj Thackeray : "तुमच्याकडे सत्ता विधान भवनात असेल, आमच्याकडे रस्त्यावर...",हिंदी सक्तीवरुन राज ठाकरेंचा राज्य सरकारला इशारा
19
Uddhav Thackeray : "आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजी पंतांनी दूर केला"; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना टोला
20
Raj Thackeray : ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकली, या आरोपावर राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

गीतकार हा मानवी जीवनाचाही भाष्यकार असतो

By admin | Updated: June 26, 2014 00:53 IST

कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ

यशवंत मनोहर :कवी बी. काशीनंद यांना आदरांजली नागपूर : कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ योग्य पद्धतीने चालावी यासाठी प्रेरणा द्यावी लागते. योग्य पद्धतीने चळवळ चालावी म्हणून कारणे द्यावी लागतात. गीतकार हा विचारांचा समीक्षकच असतो. तो मानवी जीवनांचा भाष्यकारही असतो, असे मत सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले.निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्यावतीने स्मृतिशेष गीतकार, कवी बी. काशीनंद यांना श्रद्धांजली देण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला कवी इ.मो. नारनवरे, सतेश्वर मोरे, अशोक बुरबुरे, संजय शेजव, राहुल दहिकर, प्रवीण कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. डॉ. मनोहर म्हणाले, गीतकाराला चळवळीसाठी गीते लिहिताना संपूर्ण सामाजिक स्थितीचा विचार करावा लागतो. तो समाजाला मार्गदर्शन आणि दिशाही देत असतो. त्यामुळेच गीतकार अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यात बी. काशीनंद यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. बी. काशीनंद यांनी गीतांच्या माध्यमातून विचार दिला, प्रेरणा दिली आणि लोकशिक्षणही केले. त्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. संजय शेजव म्हणाले, बी. काशीनंद यांची गीते महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. वामनदादा कर्डक यांच्यानंतर त्यांच्या गीतांनीच आम्हाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनाने विचार देणारा मार्गदर्शक हरपला. राहुल दहिकर म्हणाले, माझा त्यांचा परिचय नव्हता; पण गीतकार, कवी आणि छायाचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या गीतांनी समाजमन ढवळून निघाले. आपणही समाजासाठी काम करीत राहणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. इ.मो. नारनवरे म्हणाले, समाज कसा घडावा आणि तो कुठल्या दिशेने गेला पाहिजे, याचे मार्गदर्शन बी. काशीनंद यांच्या गीतांनी केले. समाज घडण्यामागे अशा अनेक कवींचा सहभाग आहे. आंबेडकरांचा विचार पोहोचविणाऱ्या या कवींची मात्र उपेक्षाच झाली. कवितेतून समाजात ऊर्जा पेरणाऱ्या या कवीला माझा सलाम आहे. अशोक बुरबुरे म्हणाले, बी. काशीनंद यांचे नाव लहानपणापासून ऐकले आहे. त्यांच्या गीतांनीच आमच्या पिढीवर संस्कार झाले. त्यांच्या गीतांनी एक काळ गाजला. हल्ली मात्र मुक्तछंदातच सारे लिहित आहेत. मुक्तछंद हा कवितेला लागलेला शाप आहे. यामुळे लोककलावंतांना नाकारले जात आहे. ज्यांनी मार्ग आणि विचार दिला त्यांना आम्ही सन्मान देऊ शकत नाही का, हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. बी. काशीनंद यांचा वारसा सांगताना आम्हाला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. सतेश्वर मोरे म्हणाले, आंबेडकरी मूल्य समाजात झिरपवण्याचे काम बी. काशीनंद यांनी केले. आता लोककलावंत खेड्यातून शहरात येतात आणि शहरात त्यांची कविता फुलत नाही कारण त्यांच्या गीताला प्रेरणा देणारी स्थिती येथे नसते. त्यामुळे तळागाळातल्या माणसाच्या प्रबोधनाची चिंता वाटते. पूर्वी लोकगीतांचे कार्यक्रम रात्रभर चालायचे. आता रात्री १० वाजताची मर्यादा आल्याने ही चळवळ खुंटते आहे. ही परंपरा सुरू राहावी, आणि समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी बी काशीनंद यांचा मुलगा सुनील बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध आंबेडकरी आणि सामाजिक संघटनांनी बी. काशीनंद यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)