शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

गीतकार हा मानवी जीवनाचाही भाष्यकार असतो

By admin | Updated: June 26, 2014 00:53 IST

कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ

यशवंत मनोहर :कवी बी. काशीनंद यांना आदरांजली नागपूर : कुठलीही चळवळ समोर जात असते, अडखळत असते, त्यात उणिवाही निर्माण होतात. पण चळवळ चालविणाऱ्यांना अनेकदा त्याचे भान राहात नाही. कवी आणि गीतकारांना मात्र चळवळ योग्य पद्धतीने चालावी यासाठी प्रेरणा द्यावी लागते. योग्य पद्धतीने चळवळ चालावी म्हणून कारणे द्यावी लागतात. गीतकार हा विचारांचा समीक्षकच असतो. तो मानवी जीवनांचा भाष्यकारही असतो, असे मत सुप्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत कवी डॉ. यशवंत मनोहर यांनी बुधवारी व्यक्त केले.निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवाराच्यावतीने स्मृतिशेष गीतकार, कवी बी. काशीनंद यांना श्रद्धांजली देण्यासाठी आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाला कवी इ.मो. नारनवरे, सतेश्वर मोरे, अशोक बुरबुरे, संजय शेजव, राहुल दहिकर, प्रवीण कांबळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. हा कार्यक्रम विदर्भ हिंदी साहित्य संमेलनाच्या सभागृहात पार पडला. डॉ. मनोहर म्हणाले, गीतकाराला चळवळीसाठी गीते लिहिताना संपूर्ण सामाजिक स्थितीचा विचार करावा लागतो. तो समाजाला मार्गदर्शन आणि दिशाही देत असतो. त्यामुळेच गीतकार अतिशय महत्त्वाचा घटक आहे. यात बी. काशीनंद यांनी केलेल्या कार्याला तोड नाही. बी. काशीनंद यांनी गीतांच्या माध्यमातून विचार दिला, प्रेरणा दिली आणि लोकशिक्षणही केले. त्यांचे योगदान आपण कधीही विसरू शकत नाही. संजय शेजव म्हणाले, बी. काशीनंद यांची गीते महाराष्ट्राबाहेरही प्रसिद्ध आहेत. वामनदादा कर्डक यांच्यानंतर त्यांच्या गीतांनीच आम्हाला प्रेरणा दिली आहे. त्यांच्या निधनाने विचार देणारा मार्गदर्शक हरपला. राहुल दहिकर म्हणाले, माझा त्यांचा परिचय नव्हता; पण गीतकार, कवी आणि छायाचित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते. त्यांच्या गीतांनी समाजमन ढवळून निघाले. आपणही समाजासाठी काम करीत राहणे, हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल. इ.मो. नारनवरे म्हणाले, समाज कसा घडावा आणि तो कुठल्या दिशेने गेला पाहिजे, याचे मार्गदर्शन बी. काशीनंद यांच्या गीतांनी केले. समाज घडण्यामागे अशा अनेक कवींचा सहभाग आहे. आंबेडकरांचा विचार पोहोचविणाऱ्या या कवींची मात्र उपेक्षाच झाली. कवितेतून समाजात ऊर्जा पेरणाऱ्या या कवीला माझा सलाम आहे. अशोक बुरबुरे म्हणाले, बी. काशीनंद यांचे नाव लहानपणापासून ऐकले आहे. त्यांच्या गीतांनीच आमच्या पिढीवर संस्कार झाले. त्यांच्या गीतांनी एक काळ गाजला. हल्ली मात्र मुक्तछंदातच सारे लिहित आहेत. मुक्तछंद हा कवितेला लागलेला शाप आहे. यामुळे लोककलावंतांना नाकारले जात आहे. ज्यांनी मार्ग आणि विचार दिला त्यांना आम्ही सन्मान देऊ शकत नाही का, हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. बी. काशीनंद यांचा वारसा सांगताना आम्हाला अभिमान वाटतो, असे ते म्हणाले. सतेश्वर मोरे म्हणाले, आंबेडकरी मूल्य समाजात झिरपवण्याचे काम बी. काशीनंद यांनी केले. आता लोककलावंत खेड्यातून शहरात येतात आणि शहरात त्यांची कविता फुलत नाही कारण त्यांच्या गीताला प्रेरणा देणारी स्थिती येथे नसते. त्यामुळे तळागाळातल्या माणसाच्या प्रबोधनाची चिंता वाटते. पूर्वी लोकगीतांचे कार्यक्रम रात्रभर चालायचे. आता रात्री १० वाजताची मर्यादा आल्याने ही चळवळ खुंटते आहे. ही परंपरा सुरू राहावी, आणि समाजाचे प्रबोधन व्हावे म्हणून काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. याप्रसंगी बी काशीनंद यांचा मुलगा सुनील बागडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात विविध आंबेडकरी आणि सामाजिक संघटनांनी बी. काशीनंद यांना आदरांजली अर्पण केली. (प्रतिनिधी)