शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
3
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
4
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
5
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
6
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
7
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
8
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
9
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
10
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
11
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
12
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
13
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
14
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
15
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
16
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
17
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
18
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
19
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
20
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 

मुलांवर अटीशिवाय प्रेम करा

By admin | Updated: January 3, 2015 02:32 IST

सर्वच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात, पण त्यामागे विविध अटी असतात. मुलगा वर्गात पहिला आला, स्पर्धेत पुरस्कार जिंकला, सांगितले तसे ऐकले, इत्यादी परिस्थितीच मुलांवर प्रेम केले जाते.

नागपूर : सर्वच पालक आपल्या मुलांवर प्रेम करतात, पण त्यामागे विविध अटी असतात. मुलगा वर्गात पहिला आला, स्पर्धेत पुरस्कार जिंकला, सांगितले तसे ऐकले, इत्यादी परिस्थितीच मुलांवर प्रेम केले जाते. अन्यथा कुणीही मुलांना जवळ करीत नाही. ही पद्धत चुकीची असून मुलांवर अटीशिवाय प्रेम करायला शिका, असे आवाहन प्रसिद्ध समुपदेशक राजा आकाश यांनी केले.डॉ. दंदे फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी झाशी राणी चौकातील रामगोपाल माहेश्वरी सांस्कृतिक सभागृह येथे ‘मुलांचा अभ्यास व वागणूक विकासामध्ये पालकांची भूमिका’ विषयावर राजा आकाश यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पालकांनी कसे वागले पाहिजे यावर मार्गदर्शन केले. व्यासपीठावर अबॅकस यूसीएमएएस संस्थेचे प्रादेशिक प्रभारी दिलीप जैन व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पिनाक दंदे उपस्थित होते.जुन्या काळात संयुक्त कुटुंब पद्धतीमुळे कुणी रागावले तर, कुणीतरी समजावण्यासाठी राहात होते. आज ही परिस्थिती नाही. यामुळे रागावण्याचा प्रकार धोकादायक आहे. सतत चिडल्यामुळे मुले आत्महत्या करू शकतात. आदेश देणे कोणालाच आवडत नाही. मुलांनाही स्वाभिमान असतो. त्यांना राग आल्यास काहीच साध्य होत नाही. यामुळे मुलांना प्रेमाने समजावून सांगा. आदेश न देता प्रश्नाच्या स्वरूपात विचारपूस करा. त्याच्याशी चर्चा करा. संवाद वाढवा. सर्वात चांगले नाते स्पर्शाचे आहे. स्पर्शातून प्रेम व्यक्त केल्यास मुलांमध्ये सकारात्मक भावणा निर्माण होते. पालक आपल्यावर प्रेम करतात. त्यांना दुखवायला नको, असे मुलांना वाटायला लागते, असे आकाश यांनी सांगितले.२० वर्षांपूर्वीच्या व आताच्या पालकांच्या समस्यांचे स्वरूप बदलले आहे. पूर्वीचे पालक मुलगा अभ्यास करीत नाही, खोडकर आहे, सतत खेळत राहतो अशा तक्रारी करायचे. आजचे पालक मुलांच्या व्हॅट्स अ‍ॅप, फेसबूक, संगणकीय खेळ इत्यादीच्या वेडामुळे त्रस्त आहेत. परंतु, यात मुलांचा काहीच दोष नसून यासाठी पालकच सर्वस्वी जबाबदार आहेत. सामाजिक वातावरण व मनोरंजन माध्यमांचा मुलांवर वाईट परिणाम होत आहे. पूर्वी मुलांच्या जीवनात अनेक गोष्टींचा अभाव राहात होता. कोणतीही गोष्ट त्यांना सहजतेने मिळत नव्हती. तीच मुले आज पालक झाल्यानंतर स्वत:च्या मुलाला काहीच कमी पडू द्यायचे नाही अशा पद्धतीने वागतात. ही वागणूक मुलांची दिशा भटकविण्यास कारणीभूत ठरत आहे, असे आकाश यांनी स्पष्ट केले.डॉ. दंदे यांनी प्रास्ताविक करताना आजच्या स्पर्धेच्या काळात मुले अष्टपैलू व मानसिकदृष्ट्या कणखर असणे आवश्यक असल्याचे सांगितले. दिलीप जैन व नागपूर किड्स शाळेच्या समन्वयक प्रीती सावळे यांनीही समयोचित विचार व्यक्त केले. डॉ. गजानन नारे यांनी संचालन केले. (प्रतिनिधी)