शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

समाजाला जोडणारा शायर हरविला

By admin | Updated: February 9, 2016 02:44 IST

आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले.

निदा फाजली यांच्या निधनाने साहित्य जगतात शोकनागपूर : आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले. आपल्या सुंदर रचनांनी समाजाला जोडणारा दुवा हरविला आहे. उपराजधानीच्या हिंदी, उर्दू साहित्यकारांनी निदांसोबत घालविलेल्या क्षणांना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.उर्दू साहित्यात हिंदीला ओळख दिलीनिदा फाजली यांच्या निधनाने उर्दू भाषिकांमध्ये हिंदीला ओळख मिळवून देणारा साहित्यकार हरपला आहे. त्यांनी हिंदी साहित्यात महत्त्वपूर्ण संशोधन केले आणि दोह्यांची सहज हिंदीमध्ये रचना करून लोकप्रिय केले. त्यांच्यातील विनम्रता प्रत्येकाला आपलसं करणारी होती. -प्रा. मधुप पांडेय, साहित्यकारनागपूरला घेतले होते घर१९६८ पासून निदा फाजली यांच्यशी मित्रता जुळली. आपल्याशी असलेल्या मित्रत्वामुळे निदा यांनी छावणी येथील गझल अपार्टमेंटमध्ये त्यांच्या व पत्नी मालती जोशी यांच्या नावाने एक घर खरेदी केले. मात्र नंतर ते घर विकले. निदा यांच्या निधनाने उर्दू शायरीच नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.-जफर कलीम, ज्येष्ठ उर्दू शायरमानवतेला जिवंत ठेवणारा शायरकबिरानंतर दोह्यांना पुन्हा जिवंत करून निदा यांनी समाजातील ज्वलंत मुद्यांना खरेपणाने सडेतोडपणे समाजासमोर मांडले. आपल्या शायरीने त्यांनी मानवतेला जिवंत ठेवले होते. आम्ही आज आमच्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.- डॉ. सागर खादीवाला‘गया तो टुटकर रोया’निदा फाजली यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे. त्यांचे दोहे समाजातील ज्वलंत मुद्यांनाही आरसा दाखविणारे होते. निदा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘बिछडकर फुटकर रोया-गया तो टुटकर रोया’ एवढेच म्हणावेसे वाटते.-मधु गुप्ता लहानपणापासून जोडल्या गेलोवडिलांसोबत निदा यांची अतुट मैत्री होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्याशी जोडल्या गेलो. त्यांच्या शायरीत मातीचा गंध होता. बाबा ताजुद्दीन यांच्या सालाना उर्समध्येही ते अनेकवेळा सहभागी व्हायचे.- समीर कबीर, उर्दू शायरधर्मांना जोडणारे व्यक्तिमत्त्वफाजली यांच्या निधनाने उर्दू साहित्याचे नुकसान झाले. त्यांनी नेहमी समाजाला जोडण्याचे काम केले. त्यांच्या शायरीत अलीसोबतच राधा आणि कृष्णाची प्रतिमाही निर्माण होत होती.-लोकेंद्र सिंह, शायरदोह्यांमध्ये दु:खाचे वर्णननिदा यांच्या दोह्यांमध्ये समाजाच्या दु:खाचा सार वर्णन केला होता. ते केवळ उत्कृष्ट शायरच नव्हते तर साधे सरळ व्यवहार करणारे माणूस होते. -नरेंद्र सतीजा, अध्यक्ष, जगजितसिंह मंचशायरीमध्ये होती गंगाजमुनी तहजीबमुंबई येथे निदा यांच्याशी झालेली भेट एक अविस्मरणीय क्षणासारखी मनात कायम आहे. दोह्यांना पुनरुज्जीवित करून सामाजिक मुद्यांना समाजापर्यंत पोहचविले. त्यांच्या शायरीत राष्ट्रीय एकतेचे सार दिसून येते. त्यांच्या शायरीत असलेली गंगाजमुनी तहजीब सहज जाणवत होती.-निसार खान