शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला जोडणारा शायर हरविला

By admin | Updated: February 9, 2016 02:44 IST

आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले.

निदा फाजली यांच्या निधनाने साहित्य जगतात शोकनागपूर : आपल्या सहजसुंदर रचनांनी हिंदी साहित्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे शायर निदा फाजली यांचे सोमवारी निधन झाले. आपल्या सुंदर रचनांनी समाजाला जोडणारा दुवा हरविला आहे. उपराजधानीच्या हिंदी, उर्दू साहित्यकारांनी निदांसोबत घालविलेल्या क्षणांना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.उर्दू साहित्यात हिंदीला ओळख दिलीनिदा फाजली यांच्या निधनाने उर्दू भाषिकांमध्ये हिंदीला ओळख मिळवून देणारा साहित्यकार हरपला आहे. त्यांनी हिंदी साहित्यात महत्त्वपूर्ण संशोधन केले आणि दोह्यांची सहज हिंदीमध्ये रचना करून लोकप्रिय केले. त्यांच्यातील विनम्रता प्रत्येकाला आपलसं करणारी होती. -प्रा. मधुप पांडेय, साहित्यकारनागपूरला घेतले होते घर१९६८ पासून निदा फाजली यांच्यशी मित्रता जुळली. आपल्याशी असलेल्या मित्रत्वामुळे निदा यांनी छावणी येथील गझल अपार्टमेंटमध्ये त्यांच्या व पत्नी मालती जोशी यांच्या नावाने एक घर खरेदी केले. मात्र नंतर ते घर विकले. निदा यांच्या निधनाने उर्दू शायरीच नाही तर देशाचे मोठे नुकसान झाले आहे.-जफर कलीम, ज्येष्ठ उर्दू शायरमानवतेला जिवंत ठेवणारा शायरकबिरानंतर दोह्यांना पुन्हा जिवंत करून निदा यांनी समाजातील ज्वलंत मुद्यांना खरेपणाने सडेतोडपणे समाजासमोर मांडले. आपल्या शायरीने त्यांनी मानवतेला जिवंत ठेवले होते. आम्ही आज आमच्या मार्गदर्शकाला मुकलो आहोत.- डॉ. सागर खादीवाला‘गया तो टुटकर रोया’निदा फाजली यांच्या निधनाने अतिव दु:ख झाले आहे. त्यांचे दोहे समाजातील ज्वलंत मुद्यांनाही आरसा दाखविणारे होते. निदा साहेबांना श्रद्धांजली अर्पण करताना ‘बिछडकर फुटकर रोया-गया तो टुटकर रोया’ एवढेच म्हणावेसे वाटते.-मधु गुप्ता लहानपणापासून जोडल्या गेलोवडिलांसोबत निदा यांची अतुट मैत्री होती. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्याशी जोडल्या गेलो. त्यांच्या शायरीत मातीचा गंध होता. बाबा ताजुद्दीन यांच्या सालाना उर्समध्येही ते अनेकवेळा सहभागी व्हायचे.- समीर कबीर, उर्दू शायरधर्मांना जोडणारे व्यक्तिमत्त्वफाजली यांच्या निधनाने उर्दू साहित्याचे नुकसान झाले. त्यांनी नेहमी समाजाला जोडण्याचे काम केले. त्यांच्या शायरीत अलीसोबतच राधा आणि कृष्णाची प्रतिमाही निर्माण होत होती.-लोकेंद्र सिंह, शायरदोह्यांमध्ये दु:खाचे वर्णननिदा यांच्या दोह्यांमध्ये समाजाच्या दु:खाचा सार वर्णन केला होता. ते केवळ उत्कृष्ट शायरच नव्हते तर साधे सरळ व्यवहार करणारे माणूस होते. -नरेंद्र सतीजा, अध्यक्ष, जगजितसिंह मंचशायरीमध्ये होती गंगाजमुनी तहजीबमुंबई येथे निदा यांच्याशी झालेली भेट एक अविस्मरणीय क्षणासारखी मनात कायम आहे. दोह्यांना पुनरुज्जीवित करून सामाजिक मुद्यांना समाजापर्यंत पोहचविले. त्यांच्या शायरीत राष्ट्रीय एकतेचे सार दिसून येते. त्यांच्या शायरीत असलेली गंगाजमुनी तहजीब सहज जाणवत होती.-निसार खान