शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अर्थसंकल्पात हरवला वचननामा

By admin | Updated: June 20, 2017 01:47 IST

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ब्रीदवाक्यानुसार लक्ष्य अंत्योदय, प्रण अंत्योदय व पथ अंत्योदय, अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकासाचा लाभ मिळावा, ...

निवडणुकीतील आश्वासनांचा विसर : जुन्याच योजनांचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या ब्रीदवाक्यानुसार लक्ष्य अंत्योदय, प्रण अंत्योदय व पथ अंत्योदय, अर्थात समाजातील शेवटच्या घटकापर्यत विकासाचा लाभ मिळावा, या हेतूने महापालिकेचा अर्थसंकल्प सादर केल्याचा दावा स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह सत्ताधाऱ्यांनी केला आहे. परंतु महापालिका निवडणुकीतील वचननाम्याचा भाजपाला विसर पडला आहे. यामुळे अर्थसंकल्पात वचननामा हरवल्याची नागरिकांत चर्चा आहे.सर्वच योजना एका वर्षात कार्यान्वित करणे शक्य नाही. काही योजनांना चार ते पाच वर्षांचा कालावधी लागतो. याचा विचार करता वचननाम्यातील योजना पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने नियोजन करून त्याचा अर्थसंकल्पात समावेश अपेक्षित होता. तरच त्या पुढील चार ते पाच वर्षात पूर्ण होण्याची अपेक्षा ठेवता आली असती. परंतु आता पहिल्या वर्षात या योजनांना सुरुवात होण्याची शक्यता नाही. स्वच्छ व सुंदर शहर करण्याचे वचन दिले होते. परंतु स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराचा क्रमांक २७ व्या क्रमांकावरून १२७ व्या क्रमांकावर गेला. शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सफाई कर्मचारी नाही. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. शहरातील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु अद्याप शहरातील सर्व भागातील नागरिकांना समान पाणी वितरण करणे शक्य झालेले नाही. उलट टँकरची संख्या वाढलेली आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतुदीची गरज होती. खासगी बसेसमुळे शहरातील नागरिकांना होणारा त्रास विचारात घेता या बसेसचे पार्किंग शहराबाहेर स्थलांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या थोर पुरुषांच्या नावावर नवीन योजना सुरू करणे, शहरात जलतरण तलावांची निर्मिती करण्याचे आश्वासन पूर्ण करण्यासाठी तरतूद नाही. बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच उच्च शिक्षणासाठी गरीब मुलांना दत्तक घेण्याची ग्वाही दिली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रम श्राफल्य योजनेंतर्गत २५ वर्ष सेवा झालेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मोफत घर दिले जाते. या योजनेचा गरजूंना लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. कम्युनिटी आरोग्य केंद्राचा विसरशहरातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यानुसार शहारातील स्लम भागातील गरीब लोकांना उपचार मिळावे, यासाठी ५० हजार लोकसंख्येमागे एक कम्युनिटी आरोग्य केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार १६ कें द्र सुरू होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी तरतूद करण्यात आलेली नाही.वृद्धांना शास्ती माफी नाही८० वर्षांवरील वृद्ध नागरिकांना थकीत पाणी व मालमत्ता कराच्या शास्तीत सूट देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच ७० वर्षांवरील नागरिकांना यात २० टक्के सवलत देण्याची घोषणा करण्यात आलेली होती. परंतु या आश्वासनाचा विसर पडला आहे. तसेच इतरही अनेक योजनांसाठी तरतूद करण्यात आलेली नाही. जुन्या योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.