शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

हजारो लिटर पाण्याची नासाडी

By admin | Updated: September 18, 2014 00:44 IST

रेल्वेस्थानकाच्या परिसरात जनावरे घुसतात. डी कॅबिनकडील भागात असलेल्या टाकीतील पाणी गुराखी त्यांना पाणी पाजून पाणी तसेच सुरू ठेवतात. यामुळे या भागात पाण्याचा तलाव साचला आहे.

नागपूर विभागाचे पितळ उघडे : दिल्ली लाईनच्या बाजूला साचला तलावदयानंद पाईकराव - नागपूररेल्वेस्थानकाच्या परिसरात जनावरे घुसतात. डी कॅबिनकडील भागात असलेल्या टाकीतील पाणी गुराखी त्यांना पाणी पाजून पाणी तसेच सुरू ठेवतात. यामुळे या भागात पाण्याचा तलाव साचला आहे. अशुद्ध पाण्याचे ‘रिसायकलिंग’ करून रेल्वेगाड्या धुण्यात येतात, अशी शेखी मिरविणाऱ्या मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे पितळ उघडे पडले आहे. प्रत्यक्षात दररोज शेकडो लिटर पाण्याची नासाडी रेल्वेस्थानकाच्या डी कॅबिन भागातील दिल्ली लाईनजवळ वाहून जात असल्याने तेथे तलाव साचल्याची स्थिती आहे.मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असूनही एकाही अधिकाऱ्याला ही पाण्याची नासाडी थांबविण्याची गरज न वाटल्यामुळे दररोज हजारो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. नागपूर रेल्वेस्थानकावर सिग्नलच्या ‘रुट रिले इंटरलॉकींग’चे(आरआरआय) काम करण्यात आले.या कामासाठी या भागात पाण्याच्या पाईपमधून एक जोडणी दिल्ली लाईनच्या शेजारी देण्यात आली. २०१२ मध्ये ‘आरआरआय’चे काम पूर्ण झाले. तेंव्हापासून ही पाण्याची जोडणी बंद न केल्यामुळे तशीच सुरू असल्यामुळे या भागात पाण्याचा सारखा अपव्यय सुरू आहे. या भागात अनेक गुराखी आपली गुरे चारण्यासाठी येतात. गुरांना पिण्यासाठी पाणी सुरू करतात आणि ते बंद न करता तसेच निघून जातात. याशिवाय असामाजिक तत्त्वही या भागात असलेल्या पाण्याच्या टाक्यात बिनधास्तपणे आंघोळ करतात. परंतू त्यांना अटकाव करण्याची तसदी कुणीच घेतलीनाही. रेल्वेस्थानकावर गार्ड लाईनच्या भागात एक जल पुनर्शुद्धीकरण केंद्र आहे. रेल्वेस्थानकाच्या बाजूच्या नाल्यातील ५ लाख लिटरअशुद्ध पाण्याचे शुद्धीकरण करून हे पाणी रेल्वेगाड्या धुणे, रेल्वेरुळावरील घाण स्वच्छ करणे यासाठी वापरण्यात येते. एकीकडे ‘रिसायकलिंग’ करून पाणी वाचविण्याची शेखी मध्य रेल्वेचा विभाग मिरवतो आणि दुसरीकडे हजारो लिटर पाण्याची नासाडी करतो. रेल्वेच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत असून दररोज होणारी हजारो लिटर पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी होत आहे.