शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

तलावात पाेहणे जिवावर बेतले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:08 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क काेंढाळी/बाजारगाव : नातेवाइकाकडे आलेले चाैघे मित्र परतीच्या प्रवासात बाजारगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. यांतील ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेंढाळी/बाजारगाव : नातेवाइकाकडे आलेले चाैघे मित्र परतीच्या प्रवासात बाजारगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. यांतील दाेघे पाेहण्यासाठी मंदिर परिसरातील तलावात उतरले. यातील एकाचा बुडून मृत्यू झाला; तर एकाला वाचविण्यात इतर दाेघांना यश आले. ही घटना रविवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली.

हिमांशू रमेश झरकर (वय २२, रा. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली) असे मृत तरुणाचे नाव आहे. हिमांशू झरकर, सेवकलाल धनलाल सोनावणे (३०, रा. इंद्रप्रस्थनगर, नागपूर), अखिल रवींद्र मंडपे (२५, रा. एकात्मतानगर नागपूर) व चेतन शेडमाके (२२, रा. चामोर्शी, जिल्हा गडचिरोली) हे मित्र असून, ते हिंगणा एमआयडीसी परिसरातील पिक्स ट्रान्समिशन नामक कंपनीमध्ये कामगार म्हणून काम करतात. सेवकरामचे नातेवाईक शिवा येथे राहत असल्याने चाैघेही माेटारसायकलने शिवा येथे त्याच्या नातेवाइकांकडे आले हाेते.

परतीच्या प्रवासात ते बाजारगाव येथील श्री गणपती मंदिरात दर्शनासाठी थांबले. त्यातच हिमांशू व चेतनला मंदिराशेजारी असलेल्या तलावात पाेहण्याचा माेह झाल्याने दाेघेही तलावात उतरले. दाेघांनाही व्यवस्थित पाेहता येत नसल्याने ते गटांगळ्या खाऊ लागले. त्यामुळे सेवकराम व अखिलने दुपट्टा पाण्यात टाकला. ताे दुपट्टा धरून चेतन कसाबसा पाण्याबाहेर आला. मात्र, हिमांशू खाेल पाण्यात गेल्याने बुडाला. माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठले. त्यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने हिमांशूचा पाण्यात शाेध घेतला असता, सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह गवसला. पाेलिसांनी तो उत्तरीय तपासणीसाठी काटाेल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी काेंढाळी पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

....

आठवडाभरातील दुसरी घटना

बाजारगाव येथील हा तलाव नाईक तलाव नावाने ओळखला जात असून, त्याची निर्मिती भाेसले काळात करण्यात आली आहे. या तलावाची खाेली २० फुटांपेक्षा अधिक आहे. या तलावात आजवर अनेकांचा बुडून मृत्यू झाला आहे. धुलिवंदनाच्या दिवशी प्रतीक तेजराव साेनटक्के, रा. बाजारगाव या मुलाचा याच तलावात बुडून मृत्यू झाल्याने ही आठवडाभरातील दुसरी घटना हाेय. यापूर्वी येथे तिघांचा बृडून मृत्यू झाला हाेता. या घटना टाळण्यासाठी येथे याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे असताना, त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.