शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

नागपुरातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:07 IST

नागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नागपुरातन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून ...

नागपूर : महाराष्ट्र राज्यमार्ग परिवहन महामंडळाने नागपुरातन सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्या ३० एप्रिलपर्यंत बंद केल्या आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून मध्य प्रदेश व हैदराबादला जाणाऱ्या बसेस यापूर्वीच बंद करण्यात आल्या आहेत.

गणेशपेठ बस आगराचे व्यवस्थापक अनिल आमनेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे, धुळे, औरंगाबाद, अकाेला, राजनांदगाव (छत्तीसगड), वाशीम या शहरात जाणाऱ्या बसेस ३० एप्रिलपर्यंत धावणार नाहीत. यामुळे या आगाराचे उत्पन्न खालावले आहे. दोन महिन्यापूर्वी वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू असताना या आगारामधून सुटणाऱ्या बसेस रोज १७ हजार किलोमीटर अंतर धावायच्या. आता हा आकडा ७ हजार किलोमीटरवर आला आहे.

लांब पल्ल्याच्या बसेस बंद झाल्याने या आगाराला रोजचे सुमारे तीन लाख रुपयाचे नुकसान सहन करावे लागत आहे. दरवर्षी एप्रिल, मे, जून हे महिने लग्नसराईचे असल्याने बसमध्ये प्रचंड गर्दी असायची. मुलांच्या शाळा संपल्याने परगावी जाणारे, देवदर्शन व पर्यटनाला जाणाऱ्या प्रवाशांचीही मोठी गर्दी असायची. मात्र कोरोना संक्रमणामुळे प्रवास मर्यादित झाला आहे. प्रवासी मिळत नसल्याने लांब पल्ल्याच्या बसेस बंद करण्याचा आणि फेऱ्या कमी करण्याचा निर्णय महामंडळाला घ्यावा लागत आहे. गणेशपेठ आगारातून लांब अंतराच्या ३५ बसेस धावायच्या. कमी अंतराच्या बसफेऱ्याही आता प्रवाशांच्या प्रतिसादानुसार सोडल्या जात आहेत.