शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जोपर्यंत जातीभेद तोपर्यंत आरक्षण

By admin | Updated: September 28, 2015 03:14 IST

आरक्षणाचा आधार हा आर्थिक नसून सामाजिक असमानता आहे. भारतात ही असमानता जातीशी संबंधित आहे आणि जातीव्यवस्था ही धर्माशी संबंधित असल्याने ती घट्ट चिकटून बसलेली आहे.

आरक्षण परिषद : सुखदेव थोरात यांचे रोखठोक मत नागपूर : आरक्षणाचा आधार हा आर्थिक नसून सामाजिक असमानता आहे. भारतात ही असमानता जातीशी संबंधित आहे आणि जातीव्यवस्था ही धर्माशी संबंधित असल्याने ती घट्ट चिकटून बसलेली आहे. त्यामुळे समाजात अजूनही जातीभेद पाळला जातो. हा जातीभेद नष्ट झाला तरच असमानता दूर होऊ शकते. त्यामुळे समाजात जोपर्यंत जातीभेद आहे तोपर्यंत आरक्षण हवेच, असे रोखठोक मत इंडियन कौन्सिल फॉर सोशल सायन्सेस अ‍ॅण्ड रिसर्च नवी दिल्लीचे चेअरमन डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र आॅफिसर्स फोरमतर्फे डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी आयोजित आरक्षण परिषदेचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. फोरमचे संस्थापक अध्यक्ष ई.झेड. खोब्रागडे अध्यक्षस्थानी होते तर फुले-आंबेडकरी विचारवंत प्रा. हरी नरके व प्रा. देवीदास घोडेस्वार हे प्रमुख अतिथी होते. डॉ. थोरात म्हणाले, सर्वच समाजात गरीब लोक आहेत. गरिबीचे कारण जवळपास सारखेच आहे. परंतु अस्पृश्य समाजातील लोकांच्या गरिबीचे कारण आणि प्रश्न मात्र जातीशी संबंधित आहेत. खासगी क्षेत्रातील परिस्थिती अतिशय वाईट आहे. खासगी क्षेत्रातील नोकर भरतीमध्ये सर्वाधिक जातीभेद पाळला जातो. त्यामुळे खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे, ही मागणी लावून धरण्याची गरज आहे. यासोबतच दलितांच्या स्वतंत्र वसाहती, स्वतंत्र मतदार संघ आणि हजारो वर्षांपासून ज्या समाजाचे अधिकार नाकारण्यात आले, त्या समाजाला नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे रेटण्याची आवश्यकता असल्याचेही डॉ. थोरात म्हणाले. ई.झेड. खोब्रागडे यांनी आरक्षणाचे धोरण व अंमलबजावणीचा आढावा मागण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. घोडेस्वार यांनी संविधान सभेतील आरक्षणावरील चर्चेवर प्रकाश टाकला. शिवदास वासे यांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. टी.बी. देवतळे यांनी प्रास्ताविक, सच्चिदानंद दारुंडे यांनी संचालन तर विलास सुटे यांनी आभार मानले. राजरतन कुंभारे, ललित खोब्रागडे, डॉ. अनिल हिरेखण आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)