शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

पंख होते तो तूम क्या करती? - ‘ऑपरेशन गंगा’फेम शिवानी कालरांचा थेट प्रश्न, भीती वाटली तर तुम्ही काय करता?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 16:02 IST

Lokmat Women Summit 2022 : ऑपरेशन गंगा फेम शिवानी कालरा आणि ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे यांनी सांगितली आकाशात उत्तुंग भरारी घेण्याच्या जिद्दीची जिगरबाज गोष्ट. 

ठळक मुद्देआपल्यावर विश्वास ठेवून आपण चालत राहिलो, करुन पाहिलं तर आपल्याला आपल्या वाटेचं आकाश नक्की शोधता येतं.

कशाला हवी कुणाची परवानगी, बायकांना कुणी का द्यावी आकाशात झेप घ्यायची इजाजत? त्यांनी का असा विचार करावा की पंख होते ते क्या होता? बायकांना पंख नाहीत हे कोण ठरवणार? खरंतर ते बायकांनी स्वत: स्वत:ला सांगायला हवं की पंख मला आहेतच, प्रश्न फक्त एकच आणि तो ही जिने तिने स्वत:लाच विचारायचा आहे, पंख होते तो तूम क्या करती? आणि शोधायचं त्याचं उत्तर. खरंतर आपण असे प्रश्न पुरुषांना विचारतो का, त्यांच्यासाठी आकाश खुलं, त्यांच्या पंखात बळ, मग बायकांना का विचारावं. मुद्दा एवढाच आहे, आपण आपल्याला रोखलं नाही तर दुसरं कुणीच आपल्याला रोखू शकत नाही. ‘ऑपरेशन गंगा’फेम एअर इंडिया पायलट शिवानी कालरा सांगत असताना ‘उडण्याच्या’ स्वप्नातलं बळ. लोकमत आयोजित लोकमत वुमेन समिटमध्ये शिवानी सांगत होत्या बुलंद हौसल्यांची गोष्ट.भावाचं लग्न सोडून त्या ऑपरेशन गंगासाठी रवाना झाल्या. बुडापेस्टहून त्यांनी २५० भारतीय विद्यार्थ्यांना रेस्क्यू केलं. त्याबद्दल त्या सांगतात, ‘खरं तर ते माझं कामच आहे. त्यासाठीच आमचं ट्रेनिंग झालेलं असतं. पुन्हा पुन्हा होतं. आपत्कालीन परिस्थितीत कसं काम करायचं हे आमच्या कामाचाच भाग आहे. ना मी एकटी होते ना एकटीने काही केलं. सगळ्यांचीच साथ मोठी होती. मात्र जेव्हा केव्हा असं स्वत:ला आव्हान देण्याची वेळ येते तेव्हा हा प्रश्न स्वत:लाच विचारायला हवा की, हम नहीं करेंगे तो कौन करेगा? भीती तर सगळ्यांना वाटते, मलाही वाटते. मात्र घाबरण्याचा आणि त्यातून बाहेर पडण्याचा एक क्षण असतो.हिंमत एकवटीली आणि सांगितलं स्वत:ला की आपल्यासमोर जे आव्हान आहे ते स्वीकारा तरी, करुन तर पहा. आपण आपल्याभोवती मर्यादांची रिंगणं घातली नाही, आपणच आपल्याला अडवलं नाही तर बाकी कुणाची काय टाप आपला रस्ता अडवून धरेल?’ग्रॅव्हिटास फाऊंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे यांनीही याप्रसंगी याच धाडसाची आणि स्वत:च्या हिमतीवर भरवसा ठेवण्याची गोष्ट सांगितली. त्या म्हणाल्या, अमूक एक गोष्ट मुली करुच शकत नाही असं कुणी सांगितलं तर ते खरं मानून का चालायचं. आपल्यावर विश्वास ठेवून आपण चालत राहिलो, करुन पाहिलं तर आपल्याला आपल्या वाटेचं आकाश नक्की शोधता येतं.उषा काकडे यांनी याप्रसंगी लहान मुलांवर होणारे अत्याचार, पालकांनी मुलांवर विश्वास ठेवून त्यांना द्यायची साथ आणि मुलामुलींना समजून घेण्याची गरज सांगितली. गुड टच-बॅड टच, लैंगिक छळ यासंदर्भात त्यांनी उभारलेलं काम याचीचही त्यांनी माहिती दिली.शिवानी कालरा आणि उषा काकडे दोघींनीही आपल्या अनुभवातून सांगितलं की, आपल्याला कुणीच बांधून घालू शकत नाही. आपण फक्त आपल्या मनानं हिंमत धरुन आपण निवडलेलं काम उत्तम आणि हिमतीने केलं पाहिजे.! 

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीट