शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

कम्फर्ट झोन सोडलाच नाही तर आकाश भरारी कशी घेणार? - लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर शोध नव्या उमेदीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2022 17:01 IST

Lokmat Women Summit 2022 : आपला कम्फर्ट सोडला तर जगण्याची नवी दिशा आणि भरारीसाठी नवीन आकाश गवसेल, लोकमत वुमेन समिटच्या व्यासपीठावर महिलांच्या क्षमतांचा जागर

ठळक मुद्दे काय केलं तर बायकांना त्यांचं अवकाश गवसेल ?

लोकमत वुमेन समिटच्या( Lokmat Women Summit 2022) व्यासपीठावर चर्चा सुरु होती, महिलांनी मुक्तपणे सामर्थ्यशाली जीवन जगण्याची. ‘पंछी बनू’ म्हणत आपल्या साऱ्या क्षमतांसह कर्तृत्वाचं आकाश सर करण्याची. अभिनेत्री ईशा कोप्पीकर, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेण्टरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर आणि एलोपेशिया आजारासंदर्भात जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्या केतकी जानी लोकमत वुमेन समिटच्या विशेष संवादात सहभागी झाल्या होत्या. काय केलं तर बायकांना त्यांचं अवकाश गवसेल या प्रश्नाभोवती चर्चा सुरु असताना सर्वांनी एकमतानं सांगितलं, बायकांनी आधी त्यांच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायला हवं. नवी आव्हानं स्वीकारताना स्वत:वर भरवसा ठेवायला हवा.अभिनेत्री ईशा कोप्पीकर म्हणाली, मुळात आपण हे मान्यच करुन टाकू की हे जग पुरुष प्रधान आहेच. मग क्षेत्र कोणतेही असो, फक्त सिनेइंडस्ट्रीच कशाला, सर्वच क्षेत्र. त्यामुळे पुरुषांशी सतत महिलांची तुलना आणि स्पर्धा आता आपण बंद करुन टाकली पाहिजे. मुळात स्वत:ला हे सांगितलं पाहिजे की आपण जन्मत: सबल-स्वतंत्र आहोत. आपल्याला कोण काय सबलीकरणाचे धडे देणार? आपण आपली ताकद आणि आपलं स्वातंत्र्य ओळखलं पाहिजे. तशी उमीद ठेवली पाहिजे.

उमीद म्हणजे नेमकं काय याचं तंतोतंत उदाहरण एलोपेशिया आजारासंदर्भात काम करणाऱ्या केतकी जानी व्यासपीठावर उपस्थित होत्या. केसात चाई पडल्यानं सगळे केस गेले. तोंड लपवून डिप्रेशनमध्ये पाच वर्षे घरात घातल्यावर आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत त्या जाऊन आल्या. पण मग आपल्या मुलांचे चेहरे आठवत त्यांनी जगायचं ठरवलं. त्या सांगतात, एलोपेशिया या आजारापायी किती महिला-मुली आत्महत्या करतात. घरात कोंडून घेतात स्वत:ला. आत मला वाटतं, आपण काय लोकांना सुंदर दिसण्यासाठी, त्यांना एंटरटेन करण्यासाठी आहोत का? मला लोक टकली म्हणतात, तू काय पाप केलंस म्हणतात, हे सारं ऐकून घेऊनही जगायचं आनंदानं. ’ सांगता सांगता त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तसं सारं चर्चासत्र भावूक झालं. मात्र जगण्याची त्यांची उमेद सगळ्यांना अतिशय सुखावून गेली.पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर म्हणाल्या, महिलांना काम करताना स्वत:ला वारंवार सिध्द करावं लागतं. दुप्पट काम करावं लागतं पुरुषांपेक्षा. आव्हाने येतातच, पुरुषांनाही येतात. मात्र यासाऱ्यातून भरारी घ्यायची तर कुटुंबाची साथ हवी. अवतीभवती तसं वातावरण हवं, महिला महिलांचं बॉण्डिंग हवं आणि मुख्य म्हणजे सिस्टरहूड तयार व्हायला हवं. त्यातून पोषक वातावरण घडत जाईल. महिलांनीही सुपरवूमन बनायचा अट्टहास यसोडून आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं मनापासून जगावं. आनंदाला मूरड घालू नये.’हेच सूत्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेण्टरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर मांडतात. त्या म्हणतात, ‘महिला उद्योजक म्हणजे लोणची पापड मसाले एवढेच उद्योग असं कशाला? मोठे उद्योग असावे, प्रयोग करावे, मोठी गुंतवणूक असावी अशी स्वप्न पहावी त्यादिशेनं प्रयत्न करायला हवेत. आजही यशस्वी महिलेलाही विचारले जाते, तुझा नवरा काय करतो? कशासाठी? आजही उच्चशिक्षणात महिलांचं प्रमाण कमी आहे. हे का? यासाऱ्यातून वाट शोधायची तर महिलांनी आपला कम्फर्ट सोडून नवीन आव्हानं पेलली पाहिजे.’आव्हानं स्वीकारुन आपल्या क्षमतांचा पूर्ण वापर करण्याचं सूत्र देत हा संवाद थांबला तेव्हा अनेकींच्या नजरेसमोर आपल्या क्षमतांचं बळ नक्की उभं होतं.

टॅग्स :Lokmat Women Summitलोकमत वुमेन समीट