शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लोकसेवा विधेयक सामान्यांना अधिकार देणारेच

By admin | Updated: November 20, 2014 01:02 IST

सत्ता ही वर्चस्व गाजविण्यासाठी नसते तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे सांगितले.

वसंत देसाई : भाऊराव देवरस मानव संसाधन विकास आणि शोध प्रतिष्ठान नागपूर : सत्ता ही वर्चस्व गाजविण्यासाठी नसते तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे सांगितले. येथूनच लोकसेवेची सांकेतिक सुरुवात झाली. हे सरकार लोकांचे आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील लोकांची कामे योग्य वेळेत झाली पाहिजेत. हा लोकांचा अधिकार आहे. त्यासाठीच लोकसेवा विधेयक तयार करण्यात आले असून हे विधेयक सामान्य माणसांना त्यांचा अधिकार देणारे आहे, असे मत डॉ. वसंत देसाई यांनी बुधवारी व्यक्त केले. भाऊराव देवरस मानव विकास आणि शोध प्रतिष्ठानाच्या वतीने ‘लोकसेवा अधिकार विधेयक आहे तरी काय’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सी. एस. उपाख्य बाळासाहेब कप्तान तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, प्राचार्य योगानंद काळे, नरेंद्र जोशी उपस्थित होते. डॉ. देसाई म्हणाले, राज्यात दहा वर्षांपासून माहितीचा अधिकार आहे, पण त्याचा उपयोग करताना सामान्य माणूस दिसत नाही. जोपर्यंत सामान्य जनता कायद्याचा उपयोग आणि अधिकार उपयोगात आणत नाही तोपर्यंत कायद्याचा अर्थ नाही. यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकसेवेचा कायदा केवळ सार्वजनिक प्राधिकरणापुरता मर्यादित नाही. जपानमध्ये हा कायदा १९४७ साली करण्यात आला. काही देशांमध्ये हा कायदा त्यानंतर करण्यात आला आहे. पण त्या देशातील लोक त्यांच्या अधिकारांसाठी या कायद्याचा उपयोग करतात आणि तशी जागरूकता निर्माण करण्यात हे देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे लोकसेवेचा कायदा व्हावाच, पण त्यासोबत जागरूकता निर्माण व्हावी. हा कायदा म्हणजे पुढाऱ्यांना जनतेशी जोडणारा आणि त्यांच्याशी संवाद वाढविण्याची संधी देणारा आहे. अ‍ॅड. कप्तान म्हणाले, आपण सरकारला कर देतो. त्या करातूनच कर्मचाऱ्यांचे वेतन मिळते. त्यांच्याकडून आपले काम करून घेणे हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकारच आहे. कायदा करावा लागणे, हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. कायदा करण्यापेक्षा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना सेवा द्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. लोकसेवेसारखा एक कायदा ‘डील अ‍ॅण्ड डिस्चार्ज ड्युटी’ महाराष्ट्रात आधीपासूनच आहे. संचालन शिरीष भगत यांनी केले. विनोद वखरे यांनी गीत सादर केले.(प्रतिनिधी)