शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

लोकसेवा विधेयक सामान्यांना अधिकार देणारेच

By admin | Updated: November 20, 2014 01:02 IST

सत्ता ही वर्चस्व गाजविण्यासाठी नसते तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे सांगितले.

वसंत देसाई : भाऊराव देवरस मानव संसाधन विकास आणि शोध प्रतिष्ठान नागपूर : सत्ता ही वर्चस्व गाजविण्यासाठी नसते तर सामान्य जनतेची सेवा करण्यासाठी असते. मोदी यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरील भाषणातून आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक असल्याचे सांगितले. येथूनच लोकसेवेची सांकेतिक सुरुवात झाली. हे सरकार लोकांचे आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयातील लोकांची कामे योग्य वेळेत झाली पाहिजेत. हा लोकांचा अधिकार आहे. त्यासाठीच लोकसेवा विधेयक तयार करण्यात आले असून हे विधेयक सामान्य माणसांना त्यांचा अधिकार देणारे आहे, असे मत डॉ. वसंत देसाई यांनी बुधवारी व्यक्त केले. भाऊराव देवरस मानव विकास आणि शोध प्रतिष्ठानाच्या वतीने ‘लोकसेवा अधिकार विधेयक आहे तरी काय’ विषयावर त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. सी. एस. उपाख्य बाळासाहेब कप्तान तर प्रमुख अतिथी म्हणून महापौर प्रवीण दटके, प्राचार्य योगानंद काळे, नरेंद्र जोशी उपस्थित होते. डॉ. देसाई म्हणाले, राज्यात दहा वर्षांपासून माहितीचा अधिकार आहे, पण त्याचा उपयोग करताना सामान्य माणूस दिसत नाही. जोपर्यंत सामान्य जनता कायद्याचा उपयोग आणि अधिकार उपयोगात आणत नाही तोपर्यंत कायद्याचा अर्थ नाही. यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लोकसेवेचा कायदा केवळ सार्वजनिक प्राधिकरणापुरता मर्यादित नाही. जपानमध्ये हा कायदा १९४७ साली करण्यात आला. काही देशांमध्ये हा कायदा त्यानंतर करण्यात आला आहे. पण त्या देशातील लोक त्यांच्या अधिकारांसाठी या कायद्याचा उपयोग करतात आणि तशी जागरूकता निर्माण करण्यात हे देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे लोकसेवेचा कायदा व्हावाच, पण त्यासोबत जागरूकता निर्माण व्हावी. हा कायदा म्हणजे पुढाऱ्यांना जनतेशी जोडणारा आणि त्यांच्याशी संवाद वाढविण्याची संधी देणारा आहे. अ‍ॅड. कप्तान म्हणाले, आपण सरकारला कर देतो. त्या करातूनच कर्मचाऱ्यांचे वेतन मिळते. त्यांच्याकडून आपले काम करून घेणे हा नागरिकांचा नैसर्गिक अधिकारच आहे. कायदा करावा लागणे, हे आपल्या समाजाचे दुर्दैव आहे. कायदा करण्यापेक्षा शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रबोधन करून त्यांना सेवा द्यायला प्रोत्साहित केले पाहिजे. लोकसेवेसारखा एक कायदा ‘डील अ‍ॅण्ड डिस्चार्ज ड्युटी’ महाराष्ट्रात आधीपासूनच आहे. संचालन शिरीष भगत यांनी केले. विनोद वखरे यांनी गीत सादर केले.(प्रतिनिधी)