शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
4
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
5
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
6
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
7
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
8
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
9
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
10
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
11
भाजपा नेत्यासमोरच पत्नीची हत्या, धारदार हत्याराने चिरला गळा, दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे खळबळ  
12
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
13
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
14
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
15
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
16
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
17
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
18
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
19
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
20
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!

लोकसभा नागपूर १९७७; आणीबाणीनंतरही काँग्रेसचाच झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:26 IST

१९७१ च्या निवडणुकांमध्ये नागपूरची जागा कॉंग्रेसच्या हातून निसटली होती. अशा स्थितीत १९७७ मध्ये नागपूरमध्ये कॉंग्रेसचे काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार गेव्ह आवारी यांनी सर्वांचे अंदाज मोडून काढत विजय पटकावला होता.

ठळक मुद्देइंदिरा गांधी यांची सभा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर समाज ढवळून निघाला होता. आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुका या ऐतिहासिक ठरल्या होत्या. देशात कॉंग्रेसविरोधी वातावरण होते. १९७१ च्या निवडणुकांमध्ये नागपूरची जागा कॉंग्रेसच्या हातून निसटली होती. जनसंघ तसेच संघ स्वयंसेवकदेखील सक्रिय झाले होते. अशा स्थितीत १९७७ मध्ये नागपूरमध्ये कॉंग्रेसचे काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार गेव्ह आवारी यांनी सर्वांचे अंदाज मोडून काढत विजय पटकावला होता.आणीबाणीनंतर कॉंग्रेस (ओ.), जनसंघ, समाजवादी पक्ष आणि लोकदल हे चार पक्ष विलीन झाले व जनता पक्ष स्थापन करण्यात आला. कॉंग्रेसने अवघ्या २५ वर्षांचे तरुण नेते व तत्कालीन नगरसेवक गेव्ह आवारी यांच्यावर विश्वास दाखविला तर खोरिपातर्फे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे हे मैदानात उतरले. नागपूर हा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला मतदारसंघ होता. मात्र नागपुरातून जनता पक्षाचा एकही उमेदवार उतरविण्यात आला नव्हता. त्यांनी खोब्रागडे यांना समर्थन दिले होते. १९७१ साली विजयी झालेले खासदार जांबुवंतराव धोटे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. उर्वरित सातही उमेदवार हे अपक्षच होते. यात भाऊराव तिमांडे, गंगाधर तेलरांधे, रविलाल गांधी, शामराव वांजरकर, शामराव देशभ्रतार, विजयकुमार तेलवाले, श्रीपाद किसान यांचा समावेश होता. नागपुरात खऱ्या अर्थाने तिरंगी लढतच होती. देशभरात कॉंग्रेसविरोधात रोष होता. मात्र विदर्भात इतर पक्षांना विशेष वाव दिसून येत नव्हता.बॅ.खोब्रागडे हे राज्यसभा खासदार होते तसेच उपसभापती देखील राहून चुकले होते तर विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी होती. या तुलनेत आवारी हे फारच नवीन होते. गांधी विचारांच्या कुटुंबातून ते आले होते. मात्र राजकीय अनुभव फारसा नव्हता. देशात विविध राज्यांत कॉंंग्रेसच्या बालेकिल्ल्यांना हादरे बसत होते. मात्र विदर्भात बॅ. शेषराव वानखेडे, नरेंद्र तिडके, वसंतराव नाईक यांनी कॉंग्रेसशी जनतेशी नाळ टिकवून ठेवली होती. निकाल लागला तेव्हा प्रस्थापितांना धक्काच बसला होता.गेव्ह आवारी हे ४४.५५ टक्के मतं मिळवत विजयी झाले. बॅ. खोब्रागडे यांना ३३.७९ टक्के मतं मिळाली व ते दुसºया स्थानी राहिले. तर जांबुवंतराव धोटे यांना २०.५० टक्के मतच मिळाली. उर्वरित सातही अपक्षांची जमानत जप्त झाली होती. देशात इंदिरा गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र विदर्भासह नागपूरच्या जनतेने कॉंग्रेसवर विश्वास टाकल्याचे दिसून आले.

इंदिरा गांधी यांची सभा हाऊसफुल्ल१९७७ च्या निवडणूकांच्या वेळी इंदिरा गांधी यांनी कस्तूरचंद पार्क येथे सभा घेतली होती. देशात त्यांच्या विरोधात लाट असतानादेखील नागपुरात मात्र सभा ‘हाऊसफुल्ल’ झाली होती. त्यावेळी वसंतराव नाईक, डॉ.रफीक झकेरिया यांनीदेखील नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. परिणामी नागपूरमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले.

टॅग्स :Politicsराजकारण