शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
3
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
4
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
5
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
6
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
7
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
8
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
9
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
10
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
11
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
12
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
13
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
14
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
15
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
16
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
17
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
18
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
19
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
20
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार

लोकसभा नागपूर १९७७; आणीबाणीनंतरही काँग्रेसचाच झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 10:26 IST

१९७१ च्या निवडणुकांमध्ये नागपूरची जागा कॉंग्रेसच्या हातून निसटली होती. अशा स्थितीत १९७७ मध्ये नागपूरमध्ये कॉंग्रेसचे काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार गेव्ह आवारी यांनी सर्वांचे अंदाज मोडून काढत विजय पटकावला होता.

ठळक मुद्देइंदिरा गांधी यांची सभा हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर समाज ढवळून निघाला होता. आणीबाणी उठल्यानंतर झालेल्या निवडणुका या ऐतिहासिक ठरल्या होत्या. देशात कॉंग्रेसविरोधी वातावरण होते. १९७१ च्या निवडणुकांमध्ये नागपूरची जागा कॉंग्रेसच्या हातून निसटली होती. जनसंघ तसेच संघ स्वयंसेवकदेखील सक्रिय झाले होते. अशा स्थितीत १९७७ मध्ये नागपूरमध्ये कॉंग्रेसचे काय होणार याबाबत प्रश्न उपस्थित होत होते. मात्र कॉंग्रेसचे उमेदवार गेव्ह आवारी यांनी सर्वांचे अंदाज मोडून काढत विजय पटकावला होता.आणीबाणीनंतर कॉंग्रेस (ओ.), जनसंघ, समाजवादी पक्ष आणि लोकदल हे चार पक्ष विलीन झाले व जनता पक्ष स्थापन करण्यात आला. कॉंग्रेसने अवघ्या २५ वर्षांचे तरुण नेते व तत्कालीन नगरसेवक गेव्ह आवारी यांच्यावर विश्वास दाखविला तर खोरिपातर्फे बॅ. राजाभाऊ खोब्रागडे हे मैदानात उतरले. नागपूर हा तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेला मतदारसंघ होता. मात्र नागपुरातून जनता पक्षाचा एकही उमेदवार उतरविण्यात आला नव्हता. त्यांनी खोब्रागडे यांना समर्थन दिले होते. १९७१ साली विजयी झालेले खासदार जांबुवंतराव धोटे यांनी अपक्ष म्हणून आव्हान दिले. उर्वरित सातही उमेदवार हे अपक्षच होते. यात भाऊराव तिमांडे, गंगाधर तेलरांधे, रविलाल गांधी, शामराव वांजरकर, शामराव देशभ्रतार, विजयकुमार तेलवाले, श्रीपाद किसान यांचा समावेश होता. नागपुरात खऱ्या अर्थाने तिरंगी लढतच होती. देशभरात कॉंग्रेसविरोधात रोष होता. मात्र विदर्भात इतर पक्षांना विशेष वाव दिसून येत नव्हता.बॅ.खोब्रागडे हे राज्यसभा खासदार होते तसेच उपसभापती देखील राहून चुकले होते तर विदर्भवीर जांबुवंतराव धोटे यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे त्यांना मानणाऱ्या लोकांची संख्या फार मोठी होती. या तुलनेत आवारी हे फारच नवीन होते. गांधी विचारांच्या कुटुंबातून ते आले होते. मात्र राजकीय अनुभव फारसा नव्हता. देशात विविध राज्यांत कॉंंग्रेसच्या बालेकिल्ल्यांना हादरे बसत होते. मात्र विदर्भात बॅ. शेषराव वानखेडे, नरेंद्र तिडके, वसंतराव नाईक यांनी कॉंग्रेसशी जनतेशी नाळ टिकवून ठेवली होती. निकाल लागला तेव्हा प्रस्थापितांना धक्काच बसला होता.गेव्ह आवारी हे ४४.५५ टक्के मतं मिळवत विजयी झाले. बॅ. खोब्रागडे यांना ३३.७९ टक्के मतं मिळाली व ते दुसºया स्थानी राहिले. तर जांबुवंतराव धोटे यांना २०.५० टक्के मतच मिळाली. उर्वरित सातही अपक्षांची जमानत जप्त झाली होती. देशात इंदिरा गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या अनेक मोठ्या नेत्यांना पराभव पत्करावा लागला. मात्र विदर्भासह नागपूरच्या जनतेने कॉंग्रेसवर विश्वास टाकल्याचे दिसून आले.

इंदिरा गांधी यांची सभा हाऊसफुल्ल१९७७ च्या निवडणूकांच्या वेळी इंदिरा गांधी यांनी कस्तूरचंद पार्क येथे सभा घेतली होती. देशात त्यांच्या विरोधात लाट असतानादेखील नागपुरात मात्र सभा ‘हाऊसफुल्ल’ झाली होती. त्यावेळी वसंतराव नाईक, डॉ.रफीक झकेरिया यांनीदेखील नागपूरवर विशेष लक्ष केंद्रित केले होते. परिणामी नागपूरमध्ये कॉंग्रेसला यश मिळाले.

टॅग्स :Politicsराजकारण