शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये होतेय काट्याची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:10 IST

कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे.

ठळक मुद्देजातींचे गणित की विकासाचा मुद्दा?प्रचारादरम्यान उमेदवारांची दमछाक

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानण्यात येतो व यंदा हा किल्ला राखणे हे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे.तुमाने यांना काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघातून एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी, थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला १९९९ साली सर्वप्रथम शिवसेनेने भेदला. त्यानंतर चारवेळा शिवसेनेचे खासदार येथून निवडून गेले. मागील निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना पावणेदोन लाखाहून अधिक मतांनी पराभूत केले होते. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचे ‘रिपोर्ट कार्ड’ घेऊनच ते मैदानात उतरले आहेत. ते त्याच आधारावर मतं मागत आहेत. शिवसेनेपेक्षा भाजपाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे किशोर गजभिये यांची भिस्त मात्र जातीय समीकरणांवर जास्त दिसून येत आहे. याशिवाय या मतदारसंघातील वर्षानुवर्षे कायम असलेल्या समस्यांवर देखील ते भाष्य करीत आहेत. गेल्या वेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५ हजारांहून अधिक मते घेतली होती. यावेळी त्या वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. तर बसपाच्या हत्तीला मतांची चाल देण्याची जबाबदारी सुभाष गजभिये या २९ वर्षांच्या उमेदवारावर सोपविण्यात आली आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता बसपा, वंचित बहुजन आघाडीची मतं महत्त्वाची ठरतील, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात मोडणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघात भाजप तर एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. आमदारांसाठीदेखील ही मोठी परीक्षा मानण्यात येत आहे.मागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. गावागावाच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा त्या समस्या सोडविणे यात माझा विश्वास आहे आणि गावागावातील मूलभूत गरजा सोडविण्यास मी पूर्णपणे समर्थ आहे.- कृपाल तुमाने, शिवसेना

भाजप-सेनेतर्फे रामटेक मतदारसंघातील समस्यांची उपेक्षाच करण्यात आली आहे. येथे बेरोजगारीची समस्या अतिशय गंभीर झाली आहे, शिवाय शेतकरी कठीण काळातून जात आहेत. सामाजिक मुद्यांकडे या सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. याची जाणीव जनतेला आहे.-किशोर गजभिये, काँग्रेसकळीचे मुद्देग्रामीण भाग असून येथे दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे; सोबतच अनेक ठिकाणी मूलभूत सुविधादेखील नाहीत.पाणीटंचाईची समस्या असून, बेरोजगारीमुळे तरुणांना शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. ‘एमआयडीसी’ ओसाड अवस्थेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nagpur-pcनागपूर