शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये होतेय काट्याची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:10 IST

कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे.

ठळक मुद्देजातींचे गणित की विकासाचा मुद्दा?प्रचारादरम्यान उमेदवारांची दमछाक

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानण्यात येतो व यंदा हा किल्ला राखणे हे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे.तुमाने यांना काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघातून एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी, थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला १९९९ साली सर्वप्रथम शिवसेनेने भेदला. त्यानंतर चारवेळा शिवसेनेचे खासदार येथून निवडून गेले. मागील निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना पावणेदोन लाखाहून अधिक मतांनी पराभूत केले होते. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचे ‘रिपोर्ट कार्ड’ घेऊनच ते मैदानात उतरले आहेत. ते त्याच आधारावर मतं मागत आहेत. शिवसेनेपेक्षा भाजपाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे किशोर गजभिये यांची भिस्त मात्र जातीय समीकरणांवर जास्त दिसून येत आहे. याशिवाय या मतदारसंघातील वर्षानुवर्षे कायम असलेल्या समस्यांवर देखील ते भाष्य करीत आहेत. गेल्या वेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५ हजारांहून अधिक मते घेतली होती. यावेळी त्या वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. तर बसपाच्या हत्तीला मतांची चाल देण्याची जबाबदारी सुभाष गजभिये या २९ वर्षांच्या उमेदवारावर सोपविण्यात आली आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता बसपा, वंचित बहुजन आघाडीची मतं महत्त्वाची ठरतील, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात मोडणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघात भाजप तर एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. आमदारांसाठीदेखील ही मोठी परीक्षा मानण्यात येत आहे.मागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. गावागावाच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा त्या समस्या सोडविणे यात माझा विश्वास आहे आणि गावागावातील मूलभूत गरजा सोडविण्यास मी पूर्णपणे समर्थ आहे.- कृपाल तुमाने, शिवसेना

भाजप-सेनेतर्फे रामटेक मतदारसंघातील समस्यांची उपेक्षाच करण्यात आली आहे. येथे बेरोजगारीची समस्या अतिशय गंभीर झाली आहे, शिवाय शेतकरी कठीण काळातून जात आहेत. सामाजिक मुद्यांकडे या सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. याची जाणीव जनतेला आहे.-किशोर गजभिये, काँग्रेसकळीचे मुद्देग्रामीण भाग असून येथे दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे; सोबतच अनेक ठिकाणी मूलभूत सुविधादेखील नाहीत.पाणीटंचाईची समस्या असून, बेरोजगारीमुळे तरुणांना शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. ‘एमआयडीसी’ ओसाड अवस्थेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nagpur-pcनागपूर