शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
2
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
3
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
4
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
6
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
7
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
8
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
9
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
10
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
11
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
12
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
13
Navratri 2025: नवरात्रीला घटस्थापना कशी करावी? जाणून घ्या साहित्य, मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी!
14
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
15
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
16
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
17
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
18
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
19
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
20
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?

Lok Sabha Election 2019; रामटेकमध्ये होतेय काट्याची लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 13:10 IST

कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे.

ठळक मुद्देजातींचे गणित की विकासाचा मुद्दा?प्रचारादरम्यान उमेदवारांची दमछाक

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: कालिदासाची भूमी म्हणून परिचित असलेल्या रामटेक लोकसभा मतदारसंघाचे देशाच्या राजकारणात ऐतिहासिक महत्त्व राहिले आहे. माजी पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ शिवसेनेचा गड मानण्यात येतो व यंदा हा किल्ला राखणे हे शिवसेनेचे कृपाल तुमाने यांच्यासमोर आव्हान ठरणार आहे.तुमाने यांना काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनी आव्हान दिले आहे. या मतदारसंघातून एकूण १६ उमेदवार रिंगणात असले तरी, थेट लढत ही काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच राहणार आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला १९९९ साली सर्वप्रथम शिवसेनेने भेदला. त्यानंतर चारवेळा शिवसेनेचे खासदार येथून निवडून गेले. मागील निवडणुकीत कृपाल तुमाने यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांना पावणेदोन लाखाहून अधिक मतांनी पराभूत केले होते. मागील पाच वर्षांत केलेल्या विकास कामांचे ‘रिपोर्ट कार्ड’ घेऊनच ते मैदानात उतरले आहेत. ते त्याच आधारावर मतं मागत आहेत. शिवसेनेपेक्षा भाजपाचे कार्यकर्ते जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे किशोर गजभिये यांची भिस्त मात्र जातीय समीकरणांवर जास्त दिसून येत आहे. याशिवाय या मतदारसंघातील वर्षानुवर्षे कायम असलेल्या समस्यांवर देखील ते भाष्य करीत आहेत. गेल्या वेळी बसपाच्या किरण पाटणकर यांनी ९५ हजारांहून अधिक मते घेतली होती. यावेळी त्या वंचित बहुजन आघाडीकडून लढत आहेत. तर बसपाच्या हत्तीला मतांची चाल देण्याची जबाबदारी सुभाष गजभिये या २९ वर्षांच्या उमेदवारावर सोपविण्यात आली आहे. मतदारसंघातील जातीय समीकरणे लक्षात घेता बसपा, वंचित बहुजन आघाडीची मतं महत्त्वाची ठरतील, असा राजकीय धुरिणांचा अंदाज आहे. सद्यस्थितीत या मतदारसंघात मोडणाऱ्या चार विधानसभा मतदारसंघात भाजप तर एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. आमदारांसाठीदेखील ही मोठी परीक्षा मानण्यात येत आहे.मागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. गावागावाच्या समस्या जाणून घेण्यापेक्षा त्या समस्या सोडविणे यात माझा विश्वास आहे आणि गावागावातील मूलभूत गरजा सोडविण्यास मी पूर्णपणे समर्थ आहे.- कृपाल तुमाने, शिवसेना

भाजप-सेनेतर्फे रामटेक मतदारसंघातील समस्यांची उपेक्षाच करण्यात आली आहे. येथे बेरोजगारीची समस्या अतिशय गंभीर झाली आहे, शिवाय शेतकरी कठीण काळातून जात आहेत. सामाजिक मुद्यांकडे या सरकारने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. याची जाणीव जनतेला आहे.-किशोर गजभिये, काँग्रेसकळीचे मुद्देग्रामीण भाग असून येथे दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे; सोबतच अनेक ठिकाणी मूलभूत सुविधादेखील नाहीत.पाणीटंचाईची समस्या असून, बेरोजगारीमुळे तरुणांना शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. ‘एमआयडीसी’ ओसाड अवस्थेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nagpur-pcनागपूर