शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

Lok Sabha Election 2019; मतदानासाठी पालकांना विद्यार्थी करणार प्रोत्साहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 10:40 IST

यावर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थी भरून देणार संकल्पपत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाही सुदृढ करायची असेल तर मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. त्यासाठी मतदानाच्या बाबतीत लोकांच्या मनात कर्तव्यभावना निर्माण करणे गरजेचे आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे, निवडणूक आयोगापासून प्रशासनापर्यंत दरवर्षी विविध माध्यमातून आवाहन करण्यात येते. यावर्षी निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांचेही सहकार्य घेतले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाकडून ‘सिस्टीमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अ‍ॅण्ड इलेक्ट्रोरल पार्टीसिपेशन’ (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सरासरीपेक्षा गेल्या काही दिवसांपासून खालावत चालली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे, मतदारांनी कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता नैतिक पध्दतीने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकांमध्ये पालकांना मतदानासाठी प्रवृत्त करेल, असे संकल्पपत्र प्रत्येक शालेय विद्यार्थ्यांकडून भरून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला दिल्या आहेत. याअंतर्गत सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांकडून त्यांचे पालक आगामी लोकसभेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील, असे संकल्पपत्र भरुन घ्यायचे आहे. ‘स्वीप’साठी नोडल अधिकारी म्हणून जि.प.च्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार यांची नेमणूक केली आहे.

संकल्पपत्राचा नमुनासंकल्पपत्रात विद्यार्थ्याला आपले नाव, वर्ग, शाळा लिहायची आहे. याद्वारे संकल्प करतो की, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये माझे पालकांना मतदान करुन राष्ट्रीय कार्यात सहभागी होण्याकरिता प्रवृत्त करील तसेच माझे परिसरातील अन्य व्यक्तींना देखील मतदान करण्याकरिता प्रवृत्त करीन.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक