शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Lok Sabha Election 2019; आचारसंहिता आहे काम नाही होणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 10:58 IST

आचारसंहितेच्या नावाखाली नागपूर महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून आपली जबाबदारी झटकत आहेत.

ठळक मुद्देमनपा कर्मचाऱ्यांकडून टोलवाटोलवी अनेकांनी अंगातच आणली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून शहरातील नवीन विकास कामांना ब्रेक लागले आहेत. वास्तविक कार्यादेश झालेली कामे व प्रशासकीय कामकाजावर आचारसंहितेचा कोणताही परिणाम होत नाही. परंतु आचारसंहितेच्या नावाखाली महापालिकेतील कर्मचारी व अधिकाऱ्यांची मनमानी सुरू असून आपली जबाबदारी झटकत आहेत. महापालिका मुख्यालय असो वा झोन कार्यालयात कामासाठी येणाºया सर्वसामान्य नागरिकांना आचारसंहिता आहे. अधिकारी निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगून त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू आहे. अनेकांनी अंगात ‘आचारसंहिता’ आणून वेळकाढू धोरण अवलंबले आहे.निवडणुकीच्या कामात महापालिकेतील १५०० कर्मचारी व अधिकाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. यातील कर्मचाºयांचे टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण सुरू आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजावर याचा फारसा परिणाम झालेला नाही. मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी कर्मचारी व अधिकारी निवडणूक ड्युटीवर असतात. काही मोजक्या अधिकाºयांची तातडीने या कामावर नियुक्ती करण्यात आलेली आहे.निवडणुकीच्या कामातून आरोग्य, अग्निशमन विभागाला वगळण्यात आले आहे. परंतु असे असूनही आरोग्य विभागातील कर्मचारी आचारसंहितेचे कारण पुढे करतात. कर्मचाºयांच्या मनमानीमुळे शहरातील नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अघोषित सुटीहोळीमुळे गुरुवारी सार्वजनिक सुटी असल्याने महापालिका कार्यालये बंद होती. शुक्रवारी मुख्यालयासह झोन कार्यालये सुरू होती. मात्र २३ मार्चला चौथा शनिवार व २४ मार्चला रविवार आहे. याचा विचार करता अनेक कर्मचारी व अधिकारी शुक्रवारी कार्यालयाची वेळ संपण्यापूर्वीच बाहेर पडले. अनेकांनी सुटी घेतली. विशेष म्हणजे आयुक्त अभिजित बांगर, अपर आयुक्त अझीझ शेख यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सुटीवर असल्याने कार्यालयात शुकशुकाट होता.

वित्त विभागाची मनमानीमार्चअखेर नजिक आल्याने वित्त विभागाने परिपत्रक जारी करून २३ मार्चपर्यंत प्रलंबित बिल सादर करण्याची डेडलाईन दिली आहे. परंतु २३ तारखेला चौथा शनिवार असल्याने शुक्र वारी सायंकाळी बिल सादर करण्यासाठी विभागात गर्दी झाली होती तर वित्त विभागातील कर्मचारी आचारसंहिता असल्याचे कारण पुढे करून बिलात त्रुटी काढून स्वीकारण्यास नकार देत होते. वास्तविक गेल्या वर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. नंतर आयुक्तांनी हस्तक्षेप केल्यानंतर बिल स्वीकारण्यात आले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका