शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

Lok Sabha Election 2019; नागपूर व रामटेकचे उमेदवार म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 10:22 IST

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारमी निवडणुकीसाठी अर्ज भरत असताना नागपूरच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, हे एकाप्रकारे त्यांचे माझ्यावरील प्रेमच आहे. मागील वेळेपेक्षा माझा विजय जास्त मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रालोआला प्रचंड बहुमत मिळेल व मागील वेळपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल. जनतेने मला समर्थन दिले यासाठी त्यांचे आभार. त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा व विकासाच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करेल.- नितीन गडकरी, भाजपा उमेदवार, नागपूरलोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठलोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो.- नाना पटोले, काँग्रेस उमेदवार, नागपूरआपले कामच बोलणारमागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणुकांत ते कामच बोलेल व जनता परत शिवसेना-भाजप महायुतीवरच विश्वास टाकेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत आम्ही जात आहोत. रामटेकच काय पण राज्यात महायुतीला अपेक्षेहून जास्त जागा मिळतील.- कृपाल तुमाने, शिवसेना उमेदवार, रामटेकशेतकरी, बेरोजगारी विकास हेच मुद्देविकासाच्या अनेक गोष्टी केल्या जातात. परंतु रामटेकमध्ये कुठेच विकास दिसत नाही. शेतकरी, बेरोजगारी आणि विकास हेच आपले प्रमुख मुद्दे राहतील. रामटेकमध्ये केवळ शिवसेना आणि काँग्रेस अशी थेट लढत राहील. सेनाबद्दल प्रचंड विरोध आहे, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.-किशोर गजभिये, काँग्रेस उमेदवार, रामटेकविकास नव्हे गती झालीआमची लढत थेट भाजपसोबत आहे. भाजप विकास होत असल्याचे सांगते. परंतु गतीने विकास होण्याऐवजी विकासाचीच गती झाली आहे. या विकासाने नागरिकांची वाट लावली असून, हेच आपल्या प्रचाराचे मुद्दे राहतील.- मो. जमाल, बसपा उमेदवार, नागपूरबेरोजगारी विकास हाच मुद्दारामटेक हे मोठे क्षेत्र आहे. या शहराचा विकासच झालेला नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. विकास आणि बेरोजगारी हे आपल्या प्रचाराचे दोन मुख्य मुद्दे राहतील. हे मुद्दे घेऊनच आम्ही जनतेसमोर जाऊ.सुभाष गजभिये, बसपा उमेदवार, रामटेकआम्हीच देणार सक्षम पर्यायजनता आता काँग्रेस आणि भाजपला त्रासली आहे. त्यामुळे आता जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या रूपात नवा सक्षम पर्याय आम्ही निर्माण करून दिला आहे. त्यामुळे जनता आम्हालाच साथ देईल.- सागर डबरासे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, नागपूरबेरोजगारीसह अनेक मुद्देरामटेकमध्ये बेरोजगारीसह अनेक स्थानिक मुद्दे आहेत. विकासाच्या नावावर केवळ बोंब आहे. बंद केलेल्या शाळा, महिलांना नि:शुल्क शिक्षण आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ. आमची थेट लढतशिवसेनेसोबतच राहील.- किरण पाटणकर-रोडगे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, रामटेक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक