शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Lok Sabha Election 2019; नागपूर व रामटेकचे उमेदवार म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 10:22 IST

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारमी निवडणुकीसाठी अर्ज भरत असताना नागपूरच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, हे एकाप्रकारे त्यांचे माझ्यावरील प्रेमच आहे. मागील वेळेपेक्षा माझा विजय जास्त मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रालोआला प्रचंड बहुमत मिळेल व मागील वेळपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल. जनतेने मला समर्थन दिले यासाठी त्यांचे आभार. त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा व विकासाच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करेल.- नितीन गडकरी, भाजपा उमेदवार, नागपूरलोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठलोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो.- नाना पटोले, काँग्रेस उमेदवार, नागपूरआपले कामच बोलणारमागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणुकांत ते कामच बोलेल व जनता परत शिवसेना-भाजप महायुतीवरच विश्वास टाकेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत आम्ही जात आहोत. रामटेकच काय पण राज्यात महायुतीला अपेक्षेहून जास्त जागा मिळतील.- कृपाल तुमाने, शिवसेना उमेदवार, रामटेकशेतकरी, बेरोजगारी विकास हेच मुद्देविकासाच्या अनेक गोष्टी केल्या जातात. परंतु रामटेकमध्ये कुठेच विकास दिसत नाही. शेतकरी, बेरोजगारी आणि विकास हेच आपले प्रमुख मुद्दे राहतील. रामटेकमध्ये केवळ शिवसेना आणि काँग्रेस अशी थेट लढत राहील. सेनाबद्दल प्रचंड विरोध आहे, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.-किशोर गजभिये, काँग्रेस उमेदवार, रामटेकविकास नव्हे गती झालीआमची लढत थेट भाजपसोबत आहे. भाजप विकास होत असल्याचे सांगते. परंतु गतीने विकास होण्याऐवजी विकासाचीच गती झाली आहे. या विकासाने नागरिकांची वाट लावली असून, हेच आपल्या प्रचाराचे मुद्दे राहतील.- मो. जमाल, बसपा उमेदवार, नागपूरबेरोजगारी विकास हाच मुद्दारामटेक हे मोठे क्षेत्र आहे. या शहराचा विकासच झालेला नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. विकास आणि बेरोजगारी हे आपल्या प्रचाराचे दोन मुख्य मुद्दे राहतील. हे मुद्दे घेऊनच आम्ही जनतेसमोर जाऊ.सुभाष गजभिये, बसपा उमेदवार, रामटेकआम्हीच देणार सक्षम पर्यायजनता आता काँग्रेस आणि भाजपला त्रासली आहे. त्यामुळे आता जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या रूपात नवा सक्षम पर्याय आम्ही निर्माण करून दिला आहे. त्यामुळे जनता आम्हालाच साथ देईल.- सागर डबरासे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, नागपूरबेरोजगारीसह अनेक मुद्देरामटेकमध्ये बेरोजगारीसह अनेक स्थानिक मुद्दे आहेत. विकासाच्या नावावर केवळ बोंब आहे. बंद केलेल्या शाळा, महिलांना नि:शुल्क शिक्षण आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ. आमची थेट लढतशिवसेनेसोबतच राहील.- किरण पाटणकर-रोडगे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, रामटेक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक