शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019; नागपूर व रामटेकचे उमेदवार म्हणतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 10:22 IST

नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नागपूर व रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी जनसामान्यांसाठी ते काय करणार आहेत, याविषयी जे मनोगत व्यक्त केले ते थोडक्यात देत आहोत..जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणारमी निवडणुकीसाठी अर्ज भरत असताना नागपूरच्या जनतेने मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, हे एकाप्रकारे त्यांचे माझ्यावरील प्रेमच आहे. मागील वेळेपेक्षा माझा विजय जास्त मताधिक्याने होईल असा मला विश्वास आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात रालोआला प्रचंड बहुमत मिळेल व मागील वेळपेक्षा जास्त जागांवर आमचा विजय होईल. जनतेने मला समर्थन दिले यासाठी त्यांचे आभार. त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा व विकासाच्या आशा आहेत, त्या मी पूर्ण करेल.- नितीन गडकरी, भाजपा उमेदवार, नागपूरलोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठलोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. वारंवार काँग्रेसबद्दल मतभेद असल्याबाबत गैरप्रचार करण्यात आला होता. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसने काहीच केले नाही. गेल्या पाच वर्षांतच विकास झाला, असे चित्र निर्माण केले जात आहे. आज सर्व कार्यक र्ते जोमाने कामाला लागले आहेत. काँग्रेस आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आल्याने ताकद वाढली आहे. लोकशाहीत मतदारच सर्वश्रेष्ठ असतो.- नाना पटोले, काँग्रेस उमेदवार, नागपूरआपले कामच बोलणारमागील पाच वर्षांत आम्ही रामटेक मतदारसंघाच्या विकासासाठी केलेले काम जनतेने पाहिले आहे. त्यामुळे निवडणुकांत ते कामच बोलेल व जनता परत शिवसेना-भाजप महायुतीवरच विश्वास टाकेल. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात जनतेपर्यंत आम्ही जात आहोत. रामटेकच काय पण राज्यात महायुतीला अपेक्षेहून जास्त जागा मिळतील.- कृपाल तुमाने, शिवसेना उमेदवार, रामटेकशेतकरी, बेरोजगारी विकास हेच मुद्देविकासाच्या अनेक गोष्टी केल्या जातात. परंतु रामटेकमध्ये कुठेच विकास दिसत नाही. शेतकरी, बेरोजगारी आणि विकास हेच आपले प्रमुख मुद्दे राहतील. रामटेकमध्ये केवळ शिवसेना आणि काँग्रेस अशी थेट लढत राहील. सेनाबद्दल प्रचंड विरोध आहे, ही आपल्यासाठी जमेची बाजू आहे.-किशोर गजभिये, काँग्रेस उमेदवार, रामटेकविकास नव्हे गती झालीआमची लढत थेट भाजपसोबत आहे. भाजप विकास होत असल्याचे सांगते. परंतु गतीने विकास होण्याऐवजी विकासाचीच गती झाली आहे. या विकासाने नागरिकांची वाट लावली असून, हेच आपल्या प्रचाराचे मुद्दे राहतील.- मो. जमाल, बसपा उमेदवार, नागपूरबेरोजगारी विकास हाच मुद्दारामटेक हे मोठे क्षेत्र आहे. या शहराचा विकासच झालेला नाही. बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. विकास आणि बेरोजगारी हे आपल्या प्रचाराचे दोन मुख्य मुद्दे राहतील. हे मुद्दे घेऊनच आम्ही जनतेसमोर जाऊ.सुभाष गजभिये, बसपा उमेदवार, रामटेकआम्हीच देणार सक्षम पर्यायजनता आता काँग्रेस आणि भाजपला त्रासली आहे. त्यामुळे आता जनतेला वंचित बहुजन आघाडीच्या रूपात नवा सक्षम पर्याय आम्ही निर्माण करून दिला आहे. त्यामुळे जनता आम्हालाच साथ देईल.- सागर डबरासे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, नागपूरबेरोजगारीसह अनेक मुद्देरामटेकमध्ये बेरोजगारीसह अनेक स्थानिक मुद्दे आहेत. विकासाच्या नावावर केवळ बोंब आहे. बंद केलेल्या शाळा, महिलांना नि:शुल्क शिक्षण आदी मुद्दे घेऊन आम्ही जनतेमध्ये जाऊ. आमची थेट लढतशिवसेनेसोबतच राहील.- किरण पाटणकर-रोडगे, वंचित बहुजन आघाडी, उमेदवार, रामटेक

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक