शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Lok Sabha Election 2019; आमदार अन् इच्छुकांची लोकसभा ‘सेमिफायनल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 11:53 IST

लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाच्या आमदारांसाठी तसेच काँग्रेसमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे.

ठळक मुद्देरिझल्टवर बरेच काही अवलंबूनप्रत्येकाचा कस लागणार

कमलेश वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेची निवडणूक ही खऱ्या अर्थाने सहा महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपाच्या आमदारांसाठी तसेच काँग्रेसमधील इच्छुकांसाठी ‘सेमिफायनल’ असणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने सहाही विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली होती. आता तीच आघाडी आपल्या मतदारसंघात कायम राखण्यासाठी आमदारांची परीक्षा होणार आहे. तर काँग्रेसमधील इच्छुकांचाही चांगलाच कस लागणार आहे. विशेष म्हणजे यावरून दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या परफॉर्मन्सचे एकप्रकारे आॅडिट होणार असून येणाºया ‘रिजल्ट’वर बरेच काही अवलंबून असणार आहे.नागपुरात भाजपाचे सहा आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दक्षिण-पश्चिम नागपुरातून निवडून गेले आहेत. पूर्व नागपुरात कृष्णा खोपडे, पश्चिममध्ये सुधाकरराव देशमुख, मध्य नागपुरात विकास कुंभारे, उत्तरमध्ये डॉ. मिलिंद माने तर दक्षिणमध्ये आ. सुधाकरराव कोहळे नेतृत्व करतात. कोहळे यांच्याकडे तर पक्षाच्या शहर अध्यक्षपदाचाही भार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी विजयी झाले होते.त्यावेळी दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि पूर्व नागपूर या तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपाला १ लाखावर मते मिळाली होती. मुस्लिमबहुल असलेल्या मध्य नागपुरात भाजपाला ९४ हजार १६२ तर रिपब्लिकन विचारांची गठ्ठा मते असलेल्या उत्तर नागपुरातही ७४ हजार ७४६ मते मिळाली होती. पश्चिम नागपुरातही ९३ हजार २५६ मतांपर्यंत भाजपाने झेप घेतली होती. मताधिक्याचा विचार करता सर्वाधिक ६५ हजार ७४२ मतांची आघाडी पूर्व नागपुरात मिळाली होती. तर त्या पाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघात ६२ हजार ७२३ मतांनी काँग्रेस पिछाडीवर होती. उत्तर नागपुरातही १८ हजार ५४० मतांची मुसंडी मारण्यात भाजपाला यश आले होते. अशीच आघाडी कायम ठेवण्याचे सर्वच आमदारांवर ‘प्रेशर’ आहे.लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाने सहाही मतदारसंघात झेंडा रोवला. मात्र, लोकसभेच्या तुलनेत काही मतदारसंघात मताधिक्य कमी झाले. भाजपाचे आमदार आपला गड राखण्यासाठी जसे कसून प्रयत्न करीत आहेत तशाच पद्धतीने काँग्रेसमधील इच्छुकही कामाला लागले आहेत. काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्यासमोर नागपूर शहरासह पश्चिम नागपुरात काँग्रेसचा सूर्य अस्ताला जाण्यापासूनन वाचविण्याचे आव्हान आहे. अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, अतुल लोंढे हे तिन्ही नेते पूर्व नागपुरात मोर्चा सांभाळून आहेत. दक्षिण-पश्चिममध्ये प्रफुल्ल गुडधे यांचा कस लागेल. उत्तर नागपुरात मिळणारी मते नितीन राऊत यांच्यासमोर अनेक प्रश्न निर्माण करू शकतात. तर सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आल्यानंतर दक्षिणच्या गादीसाठी इच्छुक असलेले डॉ. बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, गिरीश पांडव, प्रमोद मानमोडे, प्रशांत धवड यांच्या परफॉर्मन्सचेही संयुक्त आॅडिट होणार आहे. मध्य नागपुरात इच्छुकांची संख्या १५ वर आहे. त्यामुळे अनिस अहमद यांनाही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. लोकसभा आटोपली की तिच्या निकालावर चर्चा करता करता विधानसभेची निवडणूक येऊन ठेपते. त्यामुळे लोकसभेत मतांची दरी कमी जास्त झाली तर ती विधानसभेत भरून काढण्यासाठी उमेदवारांकडे फारसा वेळ नसणार आहे. त्यामुळे विधानसभेसाठी प्रत्येक आमदार अन् इच्छुकाला लोकसभेची निवडणूक हीच सेमिफायनल समजून काम करावे लागणार आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक