शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

ऋण वसुली न्यायाधीकरणात वर्षभरापासून लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:58 IST

Nagpur News बँका व वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाच्या वसुलीसंदर्भातील वादावर न्यायनिवाडा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या ऋण वसुली न्यायाधीकरणचे नागपूर खंडपीठ गेल्या १५ महिन्यांपासून ‘लॉक’ आहे.

ठळक मुद्देपीठासीन अधिकारी नाही हजारो वाद प्रलंबित; निकालाची प्रतीक्षा

राकेश घानोडे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : बँका व वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाच्या वसुलीसंदर्भातील वादावर न्यायनिवाडा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या ऋण वसुली न्यायाधीकरणचे नागपूर खंडपीठ गेल्या १५ महिन्यांपासून ‘लॉक’ आहे. पीठासीन अधिकारी नसल्यामुळे खंडपीठाचे काम ठप्प झाले आहे. सध्या खंडपीठात हजारो वाद प्रलंबित असून, तक्रारकर्ते न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत.

नागपूर खंडपीठात २४ ऑक्टोबर २०१६ ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत आंध्र प्रदेश न्यायिक सेवेतील विजय मोहन चिक्कम हे पीठासीन अधिकारी होते. दरम्यान, केंद्र सरकारला त्यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त झाल्या. परिणामी, त्यांना पदमुक्त करण्यात आले. तेव्हापासून नागपूर खंडपीठात पीठासीन अधिकारी नाही. राज्यामध्ये नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथे न्यायाधीकरणचे खंडपीठ आहे. नागपूर खंडपीठाच्या अधिकारक्षेत्रात संपूर्ण विदर्भातील प्रकरणे येतात. नागपूर खंडपीठ अकार्यान्वित असल्यामुळे तक्रारकर्त्यांना मुंबई खंडपीठात प्रकरणे दाखल करावी लागत आहेत. त्यासाठी तक्रारकर्त्यांवर अधिक आर्थिक भुर्दंड पडत आहे.

अतिशय चिंताजनक बाब

संपूर्ण विदर्भाची जबाबदारी असलेल्या नागपूर खंडपीठात एवढ्या दीर्घकाळापासून पीठासीन अधिकारी नसणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकारला अनेकदा निवेदने सादर करून पीठासीन अधिकाऱ्याचे पद तातडीने भरण्याची मागणी केली; परंतु यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

 अ‍ॅड. अतुल पांडे, अध्यक्ष, ऋण वसुली न्यायाधीकरण विधिज्ञ संघटना.

बँका व वकील चिंतेत

न्यायाधीकरणात २० लाख व त्यावरील रकमेच्या कर्जवसुलीविषयीची प्रकरणे हाताळली जातात. अशी कोट्यवधी रुपयांची प्रकरणे रखडली असल्यामुळे बँका व वकिलांची चिंता वाढली आहे. करिता, पीठासीन अधिकाऱ्याचे पद तातडीने भरणे आवश्यक झाले आहे.

अ‍ॅड. एम. अनिलकुमार.

टॅग्स :Courtन्यायालय