शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

ऋण वसुली न्यायाधीकरणात वर्षभरापासून लॉकडाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 08:58 IST

Nagpur News बँका व वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाच्या वसुलीसंदर्भातील वादावर न्यायनिवाडा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या ऋण वसुली न्यायाधीकरणचे नागपूर खंडपीठ गेल्या १५ महिन्यांपासून ‘लॉक’ आहे.

ठळक मुद्देपीठासीन अधिकारी नाही हजारो वाद प्रलंबित; निकालाची प्रतीक्षा

राकेश घानोडे

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : बँका व वित्तीय संस्थांनी दिलेल्या कर्जाच्या वसुलीसंदर्भातील वादावर न्यायनिवाडा करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी असलेल्या ऋण वसुली न्यायाधीकरणचे नागपूर खंडपीठ गेल्या १५ महिन्यांपासून ‘लॉक’ आहे. पीठासीन अधिकारी नसल्यामुळे खंडपीठाचे काम ठप्प झाले आहे. सध्या खंडपीठात हजारो वाद प्रलंबित असून, तक्रारकर्ते न्यायाची प्रतीक्षा करीत आहेत.

नागपूर खंडपीठात २४ ऑक्टोबर २०१६ ते १२ फेब्रुवारी २०२० पर्यंत आंध्र प्रदेश न्यायिक सेवेतील विजय मोहन चिक्कम हे पीठासीन अधिकारी होते. दरम्यान, केंद्र सरकारला त्यांच्या कार्यपद्धतीविरुद्ध विविध तक्रारी प्राप्त झाल्या. परिणामी, त्यांना पदमुक्त करण्यात आले. तेव्हापासून नागपूर खंडपीठात पीठासीन अधिकारी नाही. राज्यामध्ये नागपूरसह मुंबई, पुणे व औरंगाबाद येथे न्यायाधीकरणचे खंडपीठ आहे. नागपूर खंडपीठाच्या अधिकारक्षेत्रात संपूर्ण विदर्भातील प्रकरणे येतात. नागपूर खंडपीठ अकार्यान्वित असल्यामुळे तक्रारकर्त्यांना मुंबई खंडपीठात प्रकरणे दाखल करावी लागत आहेत. त्यासाठी तक्रारकर्त्यांवर अधिक आर्थिक भुर्दंड पडत आहे.

अतिशय चिंताजनक बाब

संपूर्ण विदर्भाची जबाबदारी असलेल्या नागपूर खंडपीठात एवढ्या दीर्घकाळापासून पीठासीन अधिकारी नसणे ही अतिशय चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकारला अनेकदा निवेदने सादर करून पीठासीन अधिकाऱ्याचे पद तातडीने भरण्याची मागणी केली; परंतु यासंदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

 अ‍ॅड. अतुल पांडे, अध्यक्ष, ऋण वसुली न्यायाधीकरण विधिज्ञ संघटना.

बँका व वकील चिंतेत

न्यायाधीकरणात २० लाख व त्यावरील रकमेच्या कर्जवसुलीविषयीची प्रकरणे हाताळली जातात. अशी कोट्यवधी रुपयांची प्रकरणे रखडली असल्यामुळे बँका व वकिलांची चिंता वाढली आहे. करिता, पीठासीन अधिकाऱ्याचे पद तातडीने भरणे आवश्यक झाले आहे.

अ‍ॅड. एम. अनिलकुमार.

टॅग्स :Courtन्यायालय