शहरं
Join us  
Trending Stories
1
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
2
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
3
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
4
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
5
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
6
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
7
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
8
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
9
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
10
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
11
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
12
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
13
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
14
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
15
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
16
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
17
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
18
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

नागपूर जिल्ह्यात पक्ष्यांच्या तलावांवरील अधिवासावर ‘लॉकडाऊन इफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 23:00 IST

तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पाणस्थळ भागात पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम झाले, स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी, त्यांचे प्रजनन, या भागातील अन्नसाखळी आदी गोष्टींचा डेटाबेस अभ्यास करण्यासाठी सध्या पक्षिनिरीक्षक कामाला लागले आहेत.

ठळक मुद्देवनविभागाच्या सहकार्याने पक्षिनिरीक्षकांचा अभ्यासराज्यातील पहिलाच उपक्रम

निशांत वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : तीन महिन्यांच्या लॉकडाऊन काळात जिल्ह्यातील पाणस्थळ भागात पक्ष्यांच्या अधिवासावर काय परिणाम झाले, स्थानिक पक्षी, स्थलांतरित पक्षी, त्यांचे प्रजनन, या भागातील अन्नसाखळी आदी गोष्टींचा डेटाबेस अभ्यास करण्यासाठी सध्या पक्षिनिरीक्षक कामाला लागले आहेत. नागपूर वनविभागाच्या पुढाकाराने हा अभ्यास कार्यक्रम राबविला जात असून अशाप्रकारचा राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरला आहे.कोविड महामारीच्या नियंत्रणासाठी लावलेल्या लॉकडाऊनचे पर्यावरणाच्या दृष्टीने अनेक सकारात्मक परिणाम झाले. मानवी हस्तक्षेप कमी झाल्याने विशेषत: पक्षी आणि प्राण्यांनी त्यांच्या अधिवासात मोकळा श्वास घेतला. टाळेबंदीमुळे जिल्ह्यातील पाणथळ भागात पक्ष्यांच्या हालचालीत कशाप्रकारे परिणाम झाले याचा गुणात्मक अभ्यास करण्याच कार्यक्रम नागपूर वनविभागाने सुरू केला आहे. पक्षी अभ्यासक अविनाश लोंढे यांच्या नेतृत्वात ‘बर्डस ऑफ विदर्भ’च्या मदतीने हा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. यामध्ये जिल्ह्यातील १०० च्यावर तलावांवर अभ्यास केला जात आहे. अविनाश लोंढे यांनी सांगितले, २०१३ पासून तलावांवर पक्ष्यांच्या प्रजननात विपरीत परिणाम दिसून येत होते. मानवी हस्तक्षेप वाढल्याने प्रवासी पक्षी येईनासे आणि स्थानिक पक्षी दिसेनासे झाले होते. मात्र यावर्षी लॉकडाऊनमुळे पहिल्यांदा अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. पक्ष्यांचा किलबिलाट वाढला, स्थानिक पक्ष्यांसह स्थलांतरित पक्ष्यांचा वावर वाढला. याच बदलाचा डेटा तयार करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.हा अभ्यास किमान वर्षभर चालणार आहे. लॉकडाऊन ते पावसाळा असा पहिला टप्पा असेल तर हिवाळा ते उन्हाळ्याची सुरुवात असा दुसऱ्या टप्प्याचा अभ्यास होईल. लॉकडाऊननंतरची सद्यस्थिती, पावसाळा आणि हिवाळ्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या हालचाली, स्थानिक आणि प्रवासी पक्ष्यांमध्ये संख्यात्मक बदल (वाढ किंवा घट), त्यांची प्रजनन क्षमता, अधिवासातील उपलब्ध अन्नसाखळी, हस्तक्षेप नसल्याने कोणत्या प्रजाती वाढल्या अशा सर्व बाबींवर गुणात्मक अभ्यास केला जाणार असल्याचे अविनाश लोंढे यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.मानवी वावर कमी असला की प्रदूषण व पर्यावरणावर त्याचे सकारात्मक परिणाम निश्चित होतात. टाळेबंदीमुळे असे बदल जाणवले आहेत. पाणस्थळ भागात पक्ष्यांवर टाळेबंदी व त्यानंतर काय परिणाम झाले, कोणते पक्षी वाढले, घटले याचा अभ्यासपूर्ण डेटा तयार करण्यात येत आहे. पुढे पक्षी संवर्धनासाठी धोरण तयार करताना या अभ्यास अहवालाचा लाभ निश्चित होईल.- प्रभुनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक, नागपूर वनविभाग२०१३ नंतर पक्ष्यांच्या हालचाली कमी झाल्याने चिंता निर्माण झाली होती. टाळेबंदीने ही कमतरता भरून काढली. या काळात स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांची संख्या आणि त्यांची प्रजनन क्षमता वाढल्याचे दिसून आले. आता उन्हाळ्यापर्यंत पूर्ण सीझनमध्ये या हालचालीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. भविष्यात यामुळे एक दिशा निश्चित करण्यास मोठी मदत होईल.अविनाश लोंढे, पक्षी अभ्यासक

 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य