शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

वैवाहिक जीवनातही विष कालवत आहे लॉकडाऊन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:06 IST

जगदीश जोशी नागपूर : लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईमुळे वैवाहिक जीवनात विष कालवण्याचा प्रकार घडत आहे. टीव्ही ...

जगदीश जोशी

नागपूर : लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईमुळे वैवाहिक जीवनात विष कालवण्याचा प्रकार घडत आहे. टीव्ही पाहणे, बाथरूममध्ये अधिक वेळ घालविणे, मनासारखे भोजन तयार न करणे यासारख्या लहानसहान बाबींवरून भांडणे होत असल्यामुळे पती-पत्नी पोलिसांकडे धाव घेत आहेत. दोन-चार महिन्यांपासून बेरोजगारीचा सामना करीत असलेल्या पतीला पत्नी सहन करू शकत नसल्याचे चित्र आहे. ती घटस्फोट घेण्याच्या हेतूने पोलिसांकडे धाव घेत आहे. भरोसा सेल त्यांची समजूत घालून त्यांच्या समस्यांचे निराकरण करीत आहे.

कोरोनामुळे आणि लॉकडाऊनमुळे सर्वजण संकटाचा सामना करीत आहेत. केवळ नोकरदार वर्ग आर्थिक संकटापासून दूर आहे. लॉकडाऊनमुळे नागरिक घरात बंदिस्त आहेत. मुलेही ऑनलाईन क्लासच्या भरवशावर आहेत. कुणी नोकरी गेल्यामुळे बेरोजगार झाला आहे तर कुणी वेतन कमी मिळत असल्यामुळे त्रस्त आहे. लहान मोठे व्यवसायही ठप्प झाले आहेत. या बाबींचा मानसिक परिणाम होत आहे. हताश झालेले नागरिक पत्नी किंवा मुलांवर आपला राग व्यक्त करीत आहेत. यामुळे घरात भांडणांचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत पती-पत्नीत विनाकारण वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. पती जी मालिका पाहतो ती मालिका पत्नीला आवडत नाही. पती दिवसभर भोजन आणि नाश्त्यात वेगवेगळे पदार्थ करून देण्याची इच्छा व्यक्त करतो. ही बाब पत्नीला सहन होत नाही. आई-वडील बाथरूममध्ये अधिक वेळ लावतात. सुनेच्या वागणुकीमुळे नाराज आईवडिलांच्या गोष्टी आगीत तेल टाकण्याचे काम करीत असून हा वाद पोलीस ठाण्यात पोहोचत आहे. पती-पत्नीमधील वाद सोडविण्यासाठी भरोसा सेल कार्यरत आहे. भरोसा सेल पती-पत्नीमध्ये मध्यस्थी करून त्यांचे भांडण सोडवितो. लॉकडाऊनमध्येही भरोसा सेलमध्ये येणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झालेली नाही. मागील दोन महिन्यात एप्रिल आणि मेमध्ये भरोसा सेलला २६० तक्रारी मिळाल्या. अनेक तक्रारीवरून पती-पत्नीत घरगुती वादामुळे भांडणे झाल्याचे उघड झाले आहे. अनेक पती, पत्नी आई-वडील किंवा भाऊ-बहिणीसोबत बोलल्यामुळे नाराज होतात. कामावर गेल्यामुळे पत्नीला कुटुंबीयांसोबत बोलण्याची संधी मिळते. लॉकडाऊनमुळे घरात असलेल्या पतीपासून ही बाब लपत नाही. यामुळे दोघात वाद होतो. अनेक पती मोबाईलवर किंवा शेजारी जाऊन बोलल्यामुळे पत्नीवर आरोप करीत आहेत. अनेक प्रकरणात माहेरी गेल्यामुळे पतीने पत्नीला घरात ठेवण्यास मनाई केली आहे. तर अनेक महिला कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या पतीवर नाराज होऊन घटस्फोट घेण्यासाठी भरोसा सेलमध्ये पोहोचल्या आहेत. त्यांच्या मते घरखर्च भागविणे कठीण होत आहे. दोन वेळचे भोजन आणि मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. बेरोजगार पतीपेक्षा त्या मुलांसोबत वेगळे राहण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.

.........

वर्षभरात आल्या ७५० तक्रारी

लॉकडाऊन सुरू होऊन सव्वा वर्ष झाले आहे. तरीसुद्धा भरोसा सेलमध्ये येणाऱ्या तक्रारींची संख्या कमी झालेली नाही. सव्वा वर्षात सेलला ७५० तक्रारी मिळाल्या आहेत. बहुतांश तक्रारीत भरोसा सेलने पती-पत्नीचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला आहे. भरोसा सेलच्या प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक रेखा संखपाळे यांनी सांगितले की, त्यांचा उद्देश पती-पत्नीला मार्गदर्शन करून त्यांचे भांडण मिटविण्याचा असतो. लॉकडाऊनमुळे पती-पत्नी दोघेही त्रस्त आहेत. त्यामुळे लहानसहान बाबींवरून त्यांच्यात वाद होत आहेत. संयम आणि समजूतदारपणा बाळगण्याचा सल्ला देऊन त्यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

............