शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ई-रिक्षासाठी स्थानिक भाषेची अट

By admin | Updated: August 10, 2016 02:36 IST

बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा अर्थात ‘ई-रिक्षा’ व ‘ई-आर्ट’ या संवर्गाला मोटार वाहन नियमात समाविष्ट करून शासनाने मान्यता दिली आहे.

पाचच जिल्ह्यात मिळणार परवाने : वाहनाच्या नियमनाबाबत शासनाच्या १९ शर्ती नागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा अर्थात ‘ई-रिक्षा’ व ‘ई-आर्ट’ या संवर्गाला मोटार वाहन नियमात समाविष्ट करून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु पहिल्या टप्प्यात राज्यातील पाचच जिल्ह्यात ‘ई-रिक्षा’चे परवाने मिळणार आहेत. यात नागपूरसह लातूर, अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वर्धा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वाहनाच्या नियमनाबाबत स्थानिक भाषेच्या अटीसह तब्बल १९ शर्ती व अटींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे याला किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ई-रिक्षासाठी जोपर्यंत स्वतंत्र कायदा तयार होत नाही, वाहन तपासणी करणाऱ्या ‘एआरएआय’ या संस्थेकडून या रिक्षाची चाचणी होत नाही व योग्यता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ई-रिक्षावर बंदी घालण्यात आली होती. असे असताना राज्यात सर्वत्र अवैधरीत्या ई-रिक्षा धावत होत्या. ई-रिक्षा संदर्भात केंद्र शासनाच्या अधिसूचना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने या वाहनांच्या नियमनाबाबत नुकतेच धोरण ठरविले. मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ७४ (१) मधील तरतुदीनुसार राज्यातील नागपूरसह पाच जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी ई-रिक्षा संदर्भातील परवाने देण्याचा निर्णय घेतला. हे परवाने मिळविण्यासाठी अर्जदाराला १९ अटी व शर्तीचे पालन करावे लागणार आहे. यात अर्जदाराकडे ई-रिक्षा चालविण्याचा वैध परवाना व सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे बॅज आणि लॅमिनेटेड स्वरुपात ओळखपत्र असण्याची पहिली अट आहे. दुसरी अट, अर्जदारास स्थानिक भाषेचे ज्ञान व परवाना क्षेत्रातील स्थळाची माहिती असणे आवश्यक असल्याची आहे. या शिवाय गेल्या वर्षभरामध्ये पोलीस विभागात दखलपात्र गुन्ह्याची नोंद नसावी, शासन किंवा निमशासकीय सेवेत तो नसावा, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा परवाना नसावा, ई-रिक्षाचा परवाना मिळाल्यानंतर वाहनात हेल्पलाईन क्रमांक व वाहनचालकाची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक असेल, आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही, प्राधिकरणाने विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र, मार्ग किंवा भागतच ई-रिक्षा चालविण्यास मान्यता असणार आहे, प्रथमोपचार पेटी व अग्निशमन यंत्र ठेवणे अनिवार्य असणार आहे, ई-रिक्षा हे वाहन तीनचाकी आॅटोरिक्षा वाहनाशी संलग्न करू नये त्याची नोंदणी परिवहन संवर्गात करावी, अशाही सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)