शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

ई-रिक्षासाठी स्थानिक भाषेची अट

By admin | Updated: August 10, 2016 02:36 IST

बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा अर्थात ‘ई-रिक्षा’ व ‘ई-आर्ट’ या संवर्गाला मोटार वाहन नियमात समाविष्ट करून शासनाने मान्यता दिली आहे.

पाचच जिल्ह्यात मिळणार परवाने : वाहनाच्या नियमनाबाबत शासनाच्या १९ शर्ती नागपूर : बॅटरीवर चालणाऱ्या रिक्षा अर्थात ‘ई-रिक्षा’ व ‘ई-आर्ट’ या संवर्गाला मोटार वाहन नियमात समाविष्ट करून शासनाने मान्यता दिली आहे. परंतु पहिल्या टप्प्यात राज्यातील पाचच जिल्ह्यात ‘ई-रिक्षा’चे परवाने मिळणार आहेत. यात नागपूरसह लातूर, अमरावती, बुलडाणा, अकोला आणि वर्धा आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या वाहनाच्या नियमनाबाबत स्थानिक भाषेच्या अटीसह तब्बल १९ शर्ती व अटींचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे याला किती प्रतिसाद मिळतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ई-रिक्षासाठी जोपर्यंत स्वतंत्र कायदा तयार होत नाही, वाहन तपासणी करणाऱ्या ‘एआरएआय’ या संस्थेकडून या रिक्षाची चाचणी होत नाही व योग्यता प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत ई-रिक्षावर बंदी घालण्यात आली होती. असे असताना राज्यात सर्वत्र अवैधरीत्या ई-रिक्षा धावत होत्या. ई-रिक्षा संदर्भात केंद्र शासनाच्या अधिसूचना विचारात घेऊन महाराष्ट्र शासनाने या वाहनांच्या नियमनाबाबत नुकतेच धोरण ठरविले. मोटार वाहन कायदा १९८८च्या कलम ७४ (१) मधील तरतुदीनुसार राज्यातील नागपूरसह पाच जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांनी ई-रिक्षा संदर्भातील परवाने देण्याचा निर्णय घेतला. हे परवाने मिळविण्यासाठी अर्जदाराला १९ अटी व शर्तीचे पालन करावे लागणार आहे. यात अर्जदाराकडे ई-रिक्षा चालविण्याचा वैध परवाना व सार्वजनिक सेवा वाहन चालविण्याचे बॅज आणि लॅमिनेटेड स्वरुपात ओळखपत्र असण्याची पहिली अट आहे. दुसरी अट, अर्जदारास स्थानिक भाषेचे ज्ञान व परवाना क्षेत्रातील स्थळाची माहिती असणे आवश्यक असल्याची आहे. या शिवाय गेल्या वर्षभरामध्ये पोलीस विभागात दखलपात्र गुन्ह्याची नोंद नसावी, शासन किंवा निमशासकीय सेवेत तो नसावा, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा परवाना नसावा, ई-रिक्षाचा परवाना मिळाल्यानंतर वाहनात हेल्पलाईन क्रमांक व वाहनचालकाची माहिती प्रदर्शित करणे बंधनकारक असेल, आसनक्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांची वाहतूक करता येणार नाही, प्राधिकरणाने विनिर्दिष्ट केलेले क्षेत्र, मार्ग किंवा भागतच ई-रिक्षा चालविण्यास मान्यता असणार आहे, प्रथमोपचार पेटी व अग्निशमन यंत्र ठेवणे अनिवार्य असणार आहे, ई-रिक्षा हे वाहन तीनचाकी आॅटोरिक्षा वाहनाशी संलग्न करू नये त्याची नोंदणी परिवहन संवर्गात करावी, अशाही सूचना शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)