शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
2
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
3
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
4
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
5
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
6
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
7
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
8
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
9
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
10
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
11
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये
12
Crime: भयंकर! १८ वर्षीय तरुणीचा सुटकेसमध्ये सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मुंबईतील कामचुकार कंत्राटदारांना बसणार मोठ्ठा दणका! पालकमंत्री शेलारांनी दिले महत्त्वाचे आदेश
14
Video: जुळ्या बहिणींचे जुळ्या भावांसोबत लग्न; व्हिडिओ पाहून चक्रावून जाल...
15
ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस
16
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
17
जपानमध्ये तांदळावर कृषीमंत्र्यांनी असं काय म्हटलं?; ज्याने द्यावा लागला मंत्रिपदाचा राजीनामा
18
नव्या गर्लफ्रेंडची साथ मिळताच शिखर धवनने घेतला आलिशान बंगला; किंमत ऐकून बसेल धक्का
19
गुरुवारी गजकेसरी योग: ८ राशींवर लक्ष्मी कृपा, अपार गुरुबळ; बक्कळ लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ!
20
कोण म्हणतं वय झालं? ८६ आणि ८४ वर्षांच्या दोन बहिणींनी ठरवलं जग पहायचं, आणि निघाल्या..

जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांना कर्ज

By admin | Updated: April 17, 2016 02:50 IST

रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल केल्यानंतर महिन्यांत शेतकऱ्यांना १२.६० लाख रुपयांचे खरीप कर्ज वाटप केले आहे.

१२.६० लाखांचे वाटप : कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्जनागपूर : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल केल्यानंतर महिन्यांत शेतकऱ्यांना १२.६० लाख रुपयांचे खरीप कर्ज वाटप केले आहे. कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्ज मिळेल, असा इशारा बँकेने दिला आहे. खरीप हंगाम सुरू व्हायला अद्याप बराच कालावधी आहे. पण बँकेने कर्ज वाटपाला सुरुवात केली आहे. कर्ज वाटप सप्टेंबरपर्यंत होणार आहे, पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जूनपर्यंत कर्ज वाटपाला वेग राहणार आहे. अन्य बँकांच्या तुलनेत कर्जवाटप सोपेशेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. बँकेने २०१४ च्या खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले होते. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधानंतर खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप बंद झाले. २०१५ च्या हंगामात कर्ज वाटप बंद होते. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज मिळते. त्यामुळेच शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून या बँकेला मान्यता आहे. एक लाखापर्यंत बँकेचा व्याजदर शून्य टक्के आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे कर्जाची मागणी केली तेव्हा त्यांना विविध कागदपत्रांच्या मागणीमुळे त्रास झाला. त्यातच शिक्षकांचे खाते अन्य बँकेत सुरू झाल्यामुळे त्यांचीही ओव्हरड्राफ्ट मिळविण्यात पंचाईत झाली. त्यामुळे जिल्हा बँक तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे लावून धरली होती. आता शेतकऱ्यांना सुलभरीत्या कर्ज मिळणार आहे. (प्रतिनिधी)कर्ज फेडणाऱ्यांनाच कर्ज१४ मार्च २०१६ ला बँकेला आर्थिक परवाना मिळाल्यानंतर बँकिंग व्यवहाराला वेग आला आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. आॅक्टोबरपर्यंत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. प्रारंभी जवळपास १०० कोटींचे, नंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे.