शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
4
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
5
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
6
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
7
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
8
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
9
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
10
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
11
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
12
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
13
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
14
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
15
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
16
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
17
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
18
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
19
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
20
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल

जिल्हा बँकेचे शेतकऱ्यांना कर्ज

By admin | Updated: April 17, 2016 02:50 IST

रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल केल्यानंतर महिन्यांत शेतकऱ्यांना १२.६० लाख रुपयांचे खरीप कर्ज वाटप केले आहे.

१२.६० लाखांचे वाटप : कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्जनागपूर : रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेला आपला कारभार पुन्हा सुरू करण्याची परवानगी बहाल केल्यानंतर महिन्यांत शेतकऱ्यांना १२.६० लाख रुपयांचे खरीप कर्ज वाटप केले आहे. कर्जाची परतफेड केलेल्यांनाच कर्ज मिळेल, असा इशारा बँकेने दिला आहे. खरीप हंगाम सुरू व्हायला अद्याप बराच कालावधी आहे. पण बँकेने कर्ज वाटपाला सुरुवात केली आहे. कर्ज वाटप सप्टेंबरपर्यंत होणार आहे, पण शेतकऱ्यांच्या मागणीनुसार जूनपर्यंत कर्ज वाटपाला वेग राहणार आहे. अन्य बँकांच्या तुलनेत कर्जवाटप सोपेशेतकऱ्यांसाठी ही बँक सुरू होणे अत्यंत गरजेचे होते. बँकेने २०१४ च्या खरीप हंगामासाठी कर्ज वाटप केले होते. रिझर्व्ह बँकेच्या आर्थिक निर्बंधानंतर खरीप आणि रब्बी पिकांसाठी कर्ज वाटप बंद झाले. २०१५ च्या हंगामात कर्ज वाटप बंद होते. शेतकऱ्यांना जिल्हा बँकेतून अत्यंत सोप्या पद्धतीने कर्ज मिळते. त्यामुळेच शेतकऱ्यांची हक्काची बँक म्हणून या बँकेला मान्यता आहे. एक लाखापर्यंत बँकेचा व्याजदर शून्य टक्के आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडे कर्जाची मागणी केली तेव्हा त्यांना विविध कागदपत्रांच्या मागणीमुळे त्रास झाला. त्यातच शिक्षकांचे खाते अन्य बँकेत सुरू झाल्यामुळे त्यांचीही ओव्हरड्राफ्ट मिळविण्यात पंचाईत झाली. त्यामुळे जिल्हा बँक तातडीने सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे लावून धरली होती. आता शेतकऱ्यांना सुलभरीत्या कर्ज मिळणार आहे. (प्रतिनिधी)कर्ज फेडणाऱ्यांनाच कर्ज१४ मार्च २०१६ ला बँकेला आर्थिक परवाना मिळाल्यानंतर बँकिंग व्यवहाराला वेग आला आहे. नागपूर भागातील शेतकऱ्यांना आता बँकेच्या सर्व योजनांचा लाभ मिळणार आहे. अनेकांना वेळोवेळी कर्जेही उपलब्ध होतील. आॅक्टोबरपर्यंत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप करण्यात येणार आहे. पूर्वी कर्जाचा भरणा केलेल्या वा आता करीत असलेल्यांचा नंतर विचार करण्यात येणार आहे. प्रारंभी जवळपास १०० कोटींचे, नंतर ५० कोटींचे कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आहे. एक लाखापर्यंत शून्य टक्के आणि दोन लाखांपर्यंत दोन टक्के व्याजदराने कर्जवाटप होणार आहे.