शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

एकमेकांपासून लांब राहत असल्यास कौटुंबिक हिंसाचार होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 10:32 IST

Nagpur News संबंधित व्यक्ती एकमेकांपासून लांब राहत असल्यास कौटुंबिक हिंसाचार होत नाही. त्याकरिता एकाच घरात राहणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी मंगळवारी एका प्रकरणात दिला.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निर्णयसासू व इतरांविरुद्धची तक्रार रद्द

 लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : संबंधित व्यक्ती एकमेकांपासून लांब राहत असल्यास कौटुंबिक हिंसाचार होत नाही. त्याकरिता एकाच घरात राहणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी मंगळवारी एका प्रकरणात दिला.

एका विवाहितेने पती, सासू व इतर सहा नातेवाइकांविरुद्ध १६ जानेवारी २०२० रोजी वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. ती तक्रार रद्द करण्यासाठी पती व इतरांनी उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उच्च न्यायालयाने या अर्जावर हा निर्णय देऊन पती वगळता इतरांविरुद्धची तक्रार रद्द केली.

प्रकरणातील पती-पत्नी मुंबईत राहत होते. संबंधित नातेवाईक सणासुदीला त्यांच्याकडे जात होते. दरम्यान, त्यांचा तक्रारकर्तीसाेबत वाद होत होता. संबंधित नातेवाईक तक्रारकर्तीसोबत कधीच दीर्घ काळ एकाच घरात एकत्र राहिले नाही. त्यामुळे त्यांचे तक्रारकर्तीसोबत कौटुंबिक नाते होते असे म्हणता येत नाही. परिणामी, त्यांच्यातील वाद कौटुंबिक हिंसाचाराच्या व्याख्येत बसत नाही, असे न्यायालयाने या निर्णयात स्पष्ट केले. अर्जदारांच्या वतीने ॲड. ए. व्ही. बंड यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय