शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
4
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
5
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
6
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
7
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
8
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
9
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
10
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
11
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
12
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
13
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
14
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
15
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
16
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
17
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
18
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
19
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
20
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
Daily Top 2Weekly Top 5

भेदभावाच्या वातावरणाविरोधात साहित्यिकांनी बोलावे; ज्ञानपीठ विजेत्या प्रतिभा राय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:07 IST

शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले.

ठळक मुद्देसुमतीताई-भालचंद्र व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगात वाढणारा धार्मिक कट्टरवाद, हिंसात्मक वातावरणाला राजकीय शक्तींकडूनच मिळणारे प्रोत्साहन आणि याद्वारे नैतिक मूल्यांचा ऱ्हास होत असल्याने प्रेमभावाची सामाजिक व्यवस्थाच ढासळत चालली आहे. अशावेळी लेखक, साहित्यिकांनी मूकदर्शक राहून चालणार नाही. शेकडो वर्षापासून सुरू असलेला जातीय भेदभाव, धार्मिक कट्टरपणावर साहित्यिकांनी कठोर प्रहार करावा, असे आवाहन ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा राय यांनी केले.विदर्भ सांस्कृतिक परिषदेच्यावतीने आयोजित सुमतीताई-भालचंद्र व्याख्यानमालेत ‘असीम है ये विश्व’ विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. सर्वोदय आश्रम, बोले पेट्रोल पंप, अमरावती रोड येथे या व्याख्यानाचे आयोजन शनिवारी करण्यात आले. त्या पुढे म्हणाल्या, हे संपूर्ण विश्व अलौकिक अशा नैसर्गिक शक्तीने चालत आहे. या शक्तीला ईश्वर मानून वेगवेगळ्या धर्मियांनी वेगवेगळ्या नावाने संबोधले आहे. पण खरा ईश्वर कसा आणि कुठे आहे हे कुणालाच माहीत नाही. मनुष्याने स्वत:च्या भल्यासाठी ईश्वर नामक शक्तीची निर्मिती केली, मात्र आता याच ईश्वराच्या नावाने एकमेकांविरोधात हिंसाचार केला जातो.मनुष्य आणि इतर सर्व सजीवांना ईश्वराची नितांत आवश्यकता आहे. मात्र हा ईश्वर चांगल्यासाठी असावा. स्वर्ग-नरक या व्यर्थ कल्पना आहेत. खरा स्वर्ग या आपल्या पृथ्वीवरच आहे. या पृथ्वीलाच स्वर्ग बनविणाऱ्या ईश्वराची व तशा विचाराने चालणाऱ्या माणसांची नितांत आवश्यकता असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.दहशतवाद हा वाईटच आहे व देशाच्या संरक्षणासाठी त्याचा बीमोड करणे आवश्यकच आहे. मात्र एखादी व्यक्ती किंवा अल्पवयाचा तरुण या वाईट मार्गाकडे का जातो, याचे चिंतन झाले पाहिजे. कारण जगातील प्रत्येकाला शांतपणे आयुष्य जगण्याची लालसा असते.त्यामुळे हिंसाचार करणारे दहशतवादी कुठल्यातरी मातेचा पुत्र आहे व तो या मार्गाला का लागला याची कारणे शोधून त्या कारणाला नष्ट करणे आवश्यक आहे. शेवटी ‘वसुधैवकुटुंबकम’ या संकल्पनेप्रमाणे हे संपूर्ण जग आपले कुटुंब आहे, ही भावना महत्त्वाची असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.लहानपणी मी वडिलांना, किती बांबू जोडून आकाशाच्या पार जाता येईल व ईश्वराला भेटता येईल असे विचारायचे. त्यांनी मात्र परीकथा सांगण्याऐवजी या केवळ कल्पनामात्र असल्याचे उत्तर दिले. माझे समाधान झाले नाही आणि तेव्हापासून मी ईश्वराचा शोध घेत असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.आकाशाला मर्यादा आहेत असे म्हणतात, पण नैसर्गिक व वैज्ञानिकदृष्ट्या आकाश असिमीत आहे, त्यास अंत नाही. मग आपल्या विचारांना मर्यादा का असावी, असा प्रश्न करीत आपल्या कल्पनांना, विचारांना मर्यादित करू नका, त्यांना मुक्तपणे विहार करू द्या, असे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनील पाटील यांनी तर संचालन अजेय गंपावार यांनी केले. डॉ. विलास देशपांडे यांनीआभार मानले.

टॅग्स :literatureसाहित्य