शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

साहित्य म्हणजे समाजाचा विचारबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:29 IST

कुठल्याही लेखकाचे साहित्य हे केवळ त्याच्या एकट्याच्या स्वानुभावाची साहित्यकृती नसते तर तो समाजाचा विचारबंध असतो.

ठळक मुद्देवसंत आबाजी डहाके : ‘अस्मितादर्शची ५० वर्षे’निमित्त राष्ट्रीय चर्चासत्र

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुठल्याही लेखकाचे साहित्य हे केवळ त्याच्या एकट्याच्या स्वानुभावाची साहित्यकृती नसते तर तो समाजाचा विचारबंध असतो. मागच्या ५० वर्षांपासून असा विचारबंध बांधण्याचे काम अस्मितादर्श या नियतकालिकाने केले आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी काढले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ व पीडब्ल्यूएस कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार २९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सिद्धार्थ सभागृह, पीडब्ल्यूएस कॉलेज येथे ‘अस्मितादर्शची ५० वर्षे’ या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर उद्घाटनीय सत्राचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गंगाधर पानतावणे, डॉ. मधुकर वासनिक व छत्तीसगड मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष कपूर वासनिक उपस्थित होते. अस्मितादर्श या नियतकालिकाची ५० वर्षे आणि पीडब्ल्यूएस कॉलेजची ५० वर्षे असा एकत्र योग साधून आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात डहाके पुढे म्हणाले, अस्मितादर्शने साहित्यातील केवळ पारंपरिक विचारांनाच नाकारले नाही तर ललित आणि समाजाभिमुख वैचारिक साहित्याला नवी दिशा दिली. रूपवादी समीक्षेभोवती फिरणारी समीक्षा सामाजिक सुंदरतेत शोधली. समाजातील वेगवेगळ्या विषयांवर चर्चा घडवून आणत साहित्याद्वारे जनजागृतीची चळवळ उभारली. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, नियतकालिकांच्या सेवेचा आदर्श डॉ. पानतावणे यांच्याकडून घ्यावा असाच आहे. ताठ मानेने जगायला शिकविणाºया जगातील ज्येष्ठ नियतकालिकांमध्ये अस्मितादर्शचे स्थान आहे. अस्मितादर्श हे केवळ दलितांचे नव्हे तर प्रत्येक संवेदनशील मनाच्या जाणिवांचे व्यासपीठ आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.कार्यक्रमाची भूमिका डॉ. इंद्रजित ओरके यांनी मांडली. संचालन डॉ. मनीषा नागपुरे यांनी केले. उद्घाटनीय सत्रानंंतर ‘अस्मितादर्शची ५० वर्षे आणि मराठी वाड्मयीन नियतकालिके’ या विषयावर डॉ. विलास चिंतामण देशपांडे यांच्या अध्यक्षतेत डॉ. अनिल नितनवरे यांनी तर ‘मराठीतील वैचारिक नियतकालिकांची सद्यस्थिती’ या विषयावर डॉ. अजय देशपांडे यांनी विचार मांडले. संध्याकाळी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेत या चर्चासत्राचा समारोप झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कपूर वासनिक, डॉ. अपर्णा लांजेवार, अ‍ॅड. पी. जी. लांजेवार व मोहन वासनिक उपस्थित होते.परिवर्तनवादी लेखकांनी अस्मितादर्शला उभे केलेअस्मितादर्श ही एक वाङ्मयीन व सांस्कृतिक चळवळ आहे. विचारातून वाङ्मयीन जाणिवा निर्माण होऊ शकतात, हे अस्मितादर्शने सिद्ध केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निर्वाणानंतर निर्माण झालेली सामाजिक, सांस्कृतिक, वैचारिक पोकळी आणि परिणामस्वरूप येणाºया सामाजिक, सांस्कृतिक आक्रमणास समर्थपणे रोखण्यासाठी अस्मितादर्शने आपल्या परीने निश्चित भक्कम योगदान दिले आहे. अस्मितादर्शच्या या प्रवासात वि. स. खांडेकर, बाबा आमटे, राम शेवाळकर यांच्यासारख्या परिवर्तनवादी लेखकांनी मोठी साथ दिली, अशी भावना अस्मितादर्शचे संपादक व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात त्यांचा महाविद्यालय व विविध संस्थांतर्फे भावपूर्ण सत्कार करण्यात आला.महामंडळाच्या प्रवासातील क्रांतिकारी टप्पाअस्मितादर्शचा वैचारिक प्रवास व अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कार्यक्षेत्र यात कायम एक अदृश्य अंतर राहिले. अस्मितादर्शचे नाते फुले-आंबेडकरांच्या सम्यक विचारांशी आणि त्यांच्या नवसमाज निर्मितीच्या स्वप्नांशी जुळलेले होते तर महामंडळ साहित्यातील एका विशिष्ट प्रवाहाच्या पलीकडे जाताना कधी फारसे दिसले नाही. अशा स्थितीत अस्मितादर्शच्या अर्धशतकी प्रवासाचे कौतुक करण्यासाठी महामंडळ पुढाकार घेत असेल तर निश्चितच महामंडळाच्या प्रवासातील हा परिवर्तनवादी व क्रांतिकारी टप्पा आहे.