शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

चेतना, प्रेरणा, निर्माण अन् नाविन्याचे चक्षू म्हणजे साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सामाजिक चेतना जागवणे, चेतनेला प्रेरणेत रूपांतरित करण्याचे, प्रेरणेला निर्माणासाठी उत्साहित करणे आणि निर्माणाच्या प्रक्रियेत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सामाजिक चेतना जागवणे, चेतनेला प्रेरणेत रूपांतरित करण्याचे, प्रेरणेला निर्माणासाठी उत्साहित करणे आणि निर्माणाच्या प्रक्रियेत सतत नावीन्यता ठेवण्याचे सामर्थ्य साहित्यात असल्याची भावना दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी आज येथे व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघाच्या ९८व्या वर्धापनदिन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर होते तर विशेष पाहुणे म्हणून वर्धा येथील जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री उपस्थित होते. व्यासपीठावर विदर्भ साहित्य संघाचे उपाध्यक्ष राजन जैस्वाल, विलास मानेकर व डॉ. चंद्रशेखर मेश्राम उपस्थित होते.

याप्रसंगी अविनाश कोल्हे, चंद्रकांत वानखडे, नामदेव कांबळे, मनोज पाठक, डॉ. प्रमोद कोलवाडकर, गजानन फुसे, डॉ. विजय राऊत, डॉ. शुभंकर कुळकर्णी, नितीन नायगावकर, संजय गणोरकर, उल्हास साबळे, विलास जोशी, रवींद्र जवादे, डॉ. श्याम धोंड यांना विदर्भ साहित्य संघाचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. विदर्भ साहित्य संघाच्या वर्धा शाखेला उत्कृष्ट शाखेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्रीमद् भगवद्गीतेचे सचित्र लेखन करणाऱ्या माधवी बोरीकर यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन शलाका जोशी व स्नेहल शिंदे यांनी केले. प्रास्ताविक प्रकाश एदलाबादकर यांनी केले तर आभार डॉ. गजानन नारे यांनी मानले. सुगंधा लातूरकर-अय्यर यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

साहित्य संघाला भाषावाद मान्य नाही - मनोहर म्हैसाळकर

साहित्य संघाला भाषावाद मुळीच मान्य नाही. इतर सर्व भाषा मराठीच्या भगिनी आहेत. आमचे सदस्य सर्व भाषिक आहेत. त्यामुळे या सोहळ्याला हिंदी भाषिक का, असा प्रश्न विचारणेच मूर्खपणाचे असल्याची भावना विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केली.