शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विदर्भ साहित्य संघाचे वाङ्म‌य पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:09 IST

- ९८ व्या वर्धापनदिनी पुरस्कार प्रदान सोहळा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्म‌य ...

- ९८ व्या वर्धापनदिनी पुरस्कार प्रदान सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : विदर्भ साहित्य संघातर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्म‌य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘पंगतीतलं पान’ या कादंबरीसाठी अविनाश कोल्हे यांना पु. य. देशपांडे स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून, चंद्रकांत वानखडे यांना ‘गांधी का मरत नाही’ या ग्रंथासाठी म.म. डॉ. वा.वि. मिराशी स्मृती वैचारिक वाङ्म‌य पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

इतर पुरस्कारांमध्ये ‘महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय’ या ग्रंथासाठी नामदेव कांबळे हे कुसुमानिल स्मृती समीक्षा पुरस्काराचे मानकरी ठरले असून, ‘वैद्यकशास्त्रातील कालवेध’या पुस्तकासाठी डाॅ. प्रमोद कोलवाडकर यांना य. खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार दिला जाईल. इतर पुरस्कारांमध्ये मनोज सुरेंद्र पाठक यांना शरच्चंद्र मुक्तिबोध स्मृती काव्यलेखन तर वा. ना. देशपांडे स्मृती ललितलेखन पुरस्कार रवींद्र जवादे यांना घोषित झाला आहे. गजानन फुसे व डॉ. विजय राऊत यांना नवोदित साहित्य लेखन पुरस्कार घोषित झाले आहे. ज्येष्ठ कथाकार स्व. के. ज. पुरोहित उपाख्य शांताराम यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा या वर्षीच्या दिवाळी अंकातील सर्वोत्कृष्ट कथेचा शांताराम कथा पुरस्कार पुरस्कार ‘संवादसेतू’ या दिवाळी अंकातील ‘निर्णय’ या कथेसाठी डॉ. शुभंकर कुलकर्णी यांना घोषित झाला असून, नितीन नायगावकर यांना हरिकिसन अग्रवाल स्मृती अग्रवाल स्मृती पत्रकारिता पुरस्कार देण्यात येईल. कविवर्य ग्रेस यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘युगवाणी’ नियतकालिकातील सर्वोत्कृष्ट लेखासाठी दिला जाणारा पुरस्कार यंदा सुधीर पटवर्धन यांची संजय गणोरकर यांनी घेतलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मुलाखतीसाठी जाहीर झाला आहे. ‘कवी अनिल यांची संपूर्ण कविता’ या ग्रंथासाठी श्याम माधव धोंड यांना उत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार घोषित करण्यात आला. उल्हास साबळे आणि विलास जोशी यांना ‘नक्षत्रगाथा’ विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर झाला असून, विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट शाखा पुरस्कार वर्धा शाखेला जाहीर झाला आहे. १४ जानेवारी २०२१ रोजी विदर्भ साहित्य संघाच्या ९८ व्या वर्धापन दिनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल, अशी माहिती वि.सा.संघाचे सरचिटणीस विलास मानेकर यांनी दिली.

........