शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

जीवघेणा पाणंद रस्ता, ‘सर्जा-राजा’चे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : घरातून शेताकडे आणि शेतातून घराकडे येता-जाता गुडघाभर चिखलातून त्यांना माथापच्ची करावी लागते. कधी बैलाची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : घरातून शेताकडे आणि शेतातून घराकडे येता-जाता गुडघाभर चिखलातून त्यांना माथापच्ची करावी लागते. कधी बैलाची जोडीच बैलगाडीसह चिखलात फसते. कधी बैलगाडीचे चाकच पुढे सरकत नाहीत. एकीकडे चिखलात पाय फसतात, अशी अत्यंत दुर्दैवी परिस्थिती उमरेड तालुक्यातील कऱ्हांडला ते वानोडा या पणंद रस्त्याची झाली आहे. चार किमीचा हा पाणंद रस्ता जीवघेणा झाला असून, ‘सर्जा-राजा’चे अतोनात हाल होत आहेत.

शेतकऱ्यांच्या साेबतीने शेतीत घाम गाळणाऱ्या आणि राबणाऱ्या ‘सर्जा-राजा’च्या जोडीचा हा जीवघेणा प्रवास आम्हाला रोजचाच करावा लागत आहे. पाणंद रस्त्याची ही दुर्दशा चांगलीच त्रासदायक ठरत असून, चिखलातून वाट काढायची तरी कशी, असा संतापजनक सवाल शेतकरी करीत आहेत.

देशभरात नाव मोठे करणाऱ्या उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्याला खेटून असलेला हा मार्ग मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी खडतर ठरत आहे. बैलगाडी असो, सायकल, दुचाकी वाहने तसेच माणसांनाही इकडून-तिकडे जाण्यासाठी सर्वांचीच वाट लागते.

सध्या पाऊसधारा बरसत आहेत. शेतात सोयाबीन, कपाशी, धान, मिरची, भाजीपाला आदी पिके सर्वत्र आहेत. अशावेळी दररोज शेतीची वाट धरावी लागते. अशातच पाऊस पडला की, मार्ग चिखलमय होतो. गुडघाभर चिखल तुडवीत या पाणंद रस्त्याचा खडतर आणि जीवघेणा प्रवास करावा लागतो. बैलांचे हाल-बेहाल होतात. मागील अनेक वर्षांपासून लोकप्रतिनिधींकडे ही समस्या शेतकऱ्यांनी मांडली. अनेकदा मातीकाम, खडीकरण तसेच डांबरीकरण करून द्यावे, असे निवेदनही शेतकऱ्यांनी सोपविले. मात्र कवडीचाही फायदा झाला नाही. समस्या ‘जैसे थे’ असून या गंभीर समस्येकडे मुद्दाम दुर्लक्ष केले जात असल्याचा संताप शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

....

शंभरावर शेतकऱ्यांना फटका

दिवस-रात्र घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यांना या अतिशय खराब पाणंद रस्त्यामुळे पिकांची योग्य नीगा राखण्यास अडचण निर्माण होत असल्याने दरवर्षी परिसरातील शंभरावर शेतकऱ्यांना याचा फटका बसतो. प्रचंड नुकसान सोसावे लागते. तातडीने या समस्येची दखल घ्यावी आणि मार्गाची दुरुस्ती तसेच खडीकरण करण्यात यावे, अशी मागणी वानोडा, कऱ्हांडला येथील शेतकरी, शेतमजुरांनी केली आहे.