शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चक्रव्यूहात अडकली जीवनोन्नती

By admin | Updated: June 17, 2015 02:57 IST

ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले आहे. या अभियानाची

कसे होणार दारिद्र्य निर्मूलन : ७१८ बचत गटाची कर्ज प्रकरणे प्रलंबित गणेश हूड ल्ल नागपूरग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँकांनी निर्माण केलेल्या असहकाराच्या चक्रव्यूहात जीवनोन्नती अभियान अडकले आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांना एकत्रित आणून त्यांचा स्वयंसहायता गट स्थापन करणे. गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करणे अभिप्रेत आहे. परंतु काही राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य करण्याला नकार दिला जातो. गरीब महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही बचत गटातील महिलांना न्याय मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाकडे १९८० कर्ज प्रकरणे सादर करण्यात आली. यातील १२६२ प्रकरणे मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात ११९९ गटांनाच कर्ज वितरण करण्यात आले आहे. ७१८ प्रकरणे बँकांकडे प्रलंबित आहेत. यातील १३८ प्रकरणे गेल्या आठ महिन्यांपासून तर ६४३ प्रकरणे चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. ग्रामीण विकास यंत्रणेकडून याचा वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही काही बँकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अभियानाच्या माध्यमातून बचतगट स्थापन करणे, बंद पडलेले गट पुनरुज्जीवित करणे, त्यांना फिरता निधी उपलब्ध करणे, बँकांकडे कर्ज प्रकरणे सादर करणे, बँक लोन मेळावे आयोजित करणे, प्रशिक्षण देणे अशी कामे केली जातात. परंतु कर्ज उपलब्ध होत नसल्याने भविष्यात महिलांकडून प्रतिसाद न मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच या अभियानावर प्रश्नचिन्ह लागले आहे.प्रशिक्षणावरील खर्च पाण्यात४बचत गटाच्या महिलांना स्वंयरोजगार सुरू करता यावा यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या मूळ हेतूलाच तडा जात आहे. दुसरीकडे प्रशिक्षणावरील खर्च पाण्यात जात आहे. अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज४केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री यांनी ३० मे २०१५ रोजी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत अभियानाचा आढावा घेतला. ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली. या संदर्भात त्यांनी निर्देशही दिले परंतु त्यानंतरही बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. असहकाराची भूमिका घेणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.