शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

चक्रव्यूहात अडकली जीवनोन्नती

By admin | Updated: June 17, 2015 02:57 IST

ग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले आहे. या अभियानाची

कसे होणार दारिद्र्य निर्मूलन : ७१८ बचत गटाची कर्ज प्रकरणे प्रलंबित गणेश हूड ल्ल नागपूरग्रामीण भागातील दारिद्र्य निर्मूलनासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान सुरू केले आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ग्रामीण जीवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे. परंतु राष्ट्रीयकृत बँकांनी निर्माण केलेल्या असहकाराच्या चक्रव्यूहात जीवनोन्नती अभियान अडकले आहे. दारिद्र्य निर्मूलनासाठी ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील महिलांना एकत्रित आणून त्यांचा स्वयंसहायता गट स्थापन करणे. गटातील महिलांना स्वयंरोजगार मिळावा यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करणे अभिप्रेत आहे. परंतु काही राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य करण्याला नकार दिला जातो. गरीब महिलांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही बचत गटातील महिलांना न्याय मिळत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत २०१४-१५ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाकडे १९८० कर्ज प्रकरणे सादर करण्यात आली. यातील १२६२ प्रकरणे मंजूर आहेत. परंतु प्रत्यक्षात ११९९ गटांनाच कर्ज वितरण करण्यात आले आहे. ७१८ प्रकरणे बँकांकडे प्रलंबित आहेत. यातील १३८ प्रकरणे गेल्या आठ महिन्यांपासून तर ६४३ प्रकरणे चार महिन्यांपासून प्रलंबित आहे. ग्रामीण विकास यंत्रणेकडून याचा वेळोवेळी पाठपुरावा केल्यानंतरही काही बँकाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अभियानाच्या माध्यमातून बचतगट स्थापन करणे, बंद पडलेले गट पुनरुज्जीवित करणे, त्यांना फिरता निधी उपलब्ध करणे, बँकांकडे कर्ज प्रकरणे सादर करणे, बँक लोन मेळावे आयोजित करणे, प्रशिक्षण देणे अशी कामे केली जातात. परंतु कर्ज उपलब्ध होत नसल्याने भविष्यात महिलांकडून प्रतिसाद न मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासोबतच या अभियानावर प्रश्नचिन्ह लागले आहे.प्रशिक्षणावरील खर्च पाण्यात४बचत गटाच्या महिलांना स्वंयरोजगार सुरू करता यावा यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत महिलांना प्रशिक्षण दिले जाते. यावर लाखो रुपये खर्च केले जातात. परंतु प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर बँकांकडून कर्ज उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या मूळ हेतूलाच तडा जात आहे. दुसरीकडे प्रशिक्षणावरील खर्च पाण्यात जात आहे. अधिकाऱ्यांवर कारवाईची गरज४केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री यांनी ३० मे २०१५ रोजी जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीच्या बैठकीत अभियानाचा आढावा घेतला. ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास ही बाब आणली. या संदर्भात त्यांनी निर्देशही दिले परंतु त्यानंतरही बँकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. असहकाराची भूमिका घेणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची गरज आहे.