नागपूर : शिवारातील विहिरीत पडलेल्या १० रानडुकरांना आज जीवदान मिळाले. वनविभागाच्या ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरच्या धाडसी प्रयत्नामुळे सर्व रानडुकरे बाहेर काढण्यात यश आले. हिंगणा क्षेत्रातील ही घटना हाेय. उल्लेखनीय म्हणजे, नागपूर जिल्ह्यातील दाेन दिवसात शिवारातील विहिरीत प्राणी पडल्याची ही दुसरी घटना हाेय.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी हिंगणा वनपरिक्षेत्रातील मांडव घाेराड शिवरात असलेल्या विहिरीत १० रानडुक्कर पडल्याची माहिती मिळाली. हिंगणा वनपरिक्षेत्राचे आरएफओ आशिष निनावे यांनी ही माहिती ट्रान्झिट सेंटरला दिली. त्यानुसार सेंटरमधून वनरक्षक सी.एस. बाेरकर, डी.बी. बाेरकर, वनपाल अनिरुद्ध खडसे, चेतन बारस्कर, आशिष महल्ले, ओमप्रकाश मंगर यांची टीम तातडीने घटनास्थळी पाेहोचली. विहिरीला सुरक्षा कडे नसल्यानेच सर्व रानडुकरे विहिरीत पडल्याचे दिसून येते. या कारणाने रेस्क्यू पथकालाही बचावकार्य करणे अडचणीचे हाेते. मात्र, पथकाने माेठ्या शिताफीने ऑपरेशन राबविले. दाेराच्या मदतीने पिंजरा विहिरीत साेडण्यात आला. ताे पाण्यात बुडवून दाेन दाेन जंगली वराहांना बाहेर काढण्यात आले. या ऑपरेशनमुळे दहाही वराहांना सुखरूप बाहेर काढता आले. उल्लेखनीय म्हणजे, दाेन दिवसांपूर्वी काटाेल वनपरिक्षेत्रालगत शिवरातील काेरड्या विहिरीत सहा नीलगाई पडल्या हाेत्या. टीटीसीच्या पथकाने कुठलीही इजा न हाेऊ देता सर्व प्राण्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे टीटीसीच्या टीमचे काैतुक केले जात आहे.
विहिरींना सुरक्षा कडे लावा
उन्हाळ्याच्या दिवसात माेठ्या संख्येने वन्यजीव पाण्याच्या शाेधात गावशिवारांकडे धाव घेत आहेत. मात्र, बहुतेक शिवारातील विहिरी या जमिनीला समांतर आहेत आणि त्यांना सुरक्षा कडे लावलेले नाहीत. त्यामुळे धावत येणारे प्राणी सहज विहिरीत पडतात. पाणी पिण्यासाठी धडपडतानाही त्यांचा ताेल जाताे. त्यामुळे प्राण्यांचा हकनाक बळी जाताे. शेतकऱ्यांनी अशा समांतर विहिरींना सुरक्षा कडे लावणे गरजेचे आहे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सल्लागार कुंदन हाते यांनी केले आहे.