शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; पंतप्रधान मोदींनीही केलं खासदाराचं कौतुक!
4
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
5
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
7
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
8
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
9
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
10
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?
11
२०० रूपये फी न दिल्यानं डॉक्टर संतापला; रुग्णावर कैचीने हल्ला करत केले गंभीर जखमी
12
टी-२० क्रिकेटमध्ये आता विराटआधी वॉर्नरचं नाव घेतलं जाईल; द हंड्रेड स्पर्धेत गाठला मोलाचा टप्पा!
13
कंगाल पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांची संपत्ती किती! कशी करतात कमाई?
14
१० हजार रुपयांत बँकॉकमध्ये काय काय करू शकता? भारतीय रुपयाची तिकडे किंमत किती?
15
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
16
Angaraki Chaturthi 2025: अंगारकी सहा महिन्यातून एकदा येते; आज 'हा' उपाय करायला विसरू नका!
17
विराट-रोहितचं काय होणार? ही चर्चा रंगत असताना BCCI नं आखली वैभव सूर्यवंशीच्या उज्वल भविष्याची योजना
18
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
19
Video - भयानक! भटक्या कुत्र्यांचा उच्छाद; घराबाहेर खेळणाऱ्या चिमुकल्याचे तोडले लचके
20
रागावल्यामुळे कुत्रा चिडला, थेट मालकावर हल्ला केला; कानाचा लचका तोडून पळाला...

बंदकाळातही शहरातील जनजीवन सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:06 IST

नागपूर : शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेला भारत बंद नागपूर शहरात शांततेत पार पडला. बंद काळात कसलीही अनुचित ...

नागपूर : शेतकरी कृषी कायद्याच्या विरोधात पुकारण्यात आलेला भारत बंद नागपूर शहरात शांततेत पार पडला. बंद काळात कसलीही अनुचित घटना घडली नाही, सर्व बाजारपेठाही सुरू होत्या. तसेच दैनंदिन व्यवहारही सुरळीत सुरू असल्याने शहरात बंदचा फारसा प्रभाव दिसला नाही.

या संपाला व्यापक प्रतिसाद मिळेल ही अपेक्षा गृहीत धरून पोलिसांचा तगडा बंदोबस्त शहरात ठेवण्यात आला होता. प्रशासनाने आणि पोलीस विभागाने यासाठी उत्तम नियोजन केले होते. बंद शांततेत पार पडावा यासाठी पोलीस आयुक्त स्वत: प्रयत्नशील होते. बंदच्या पूर्वसंध्येला त्यांनी वाहतूकदार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले होते. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राजकीय पक्ष, संघटना, आणि संपकर्त्या शेतकऱ्यांच्या समर्थकांनी हा बंद शांततेत पार पाडला.

बाजार समित्यांंचा संपूर्ण पाठिंबा या बंदला दर्शविण्यात आला होता. त्यामुळे त्याचा परिणाम पडला. वाहतूकदार संपात असल्याने मालाची आवक झाली नाही. शहरातील धान्य बाजारपेठा मात्र आज दुपारपर्यंत बंद होत्या. भाजीबाजार सुरळीत होता. बंदचे आवाहन करणाऱ्या संघटनांनी आणि प्रतिनिधींनी सामंजस्य दाखवत बंदसाठी शहरात बळजबरी केल्याच्या घटनांची नोंद नाही.

या बंदला अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता. नागपूर शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी अध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून बंदमध्ये शांततेत समर्थन करण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळच्या सुमारास संविधान चौकामध्ये बंद समर्थकांनी एकत्रित येण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाकडून बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले जात होते. त्याला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला. शहरातील बाजारपेठा दिवसभर सुरू होत्या.

कोराडी नाका चौकात एकत्रित झालेल्या कार्यकर्त्यांनी रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तो हाणून पाडला. वाहतूक सुरळीत सुरू होती. शहरातील ऑटोसेवाही रोजच्या प्रमाणेच सुरू असल्याने संपाचा दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम पडल्याचे जाणवले नाही.