शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

पत्रांनी वाढविला संभ्रम

By admin | Updated: March 23, 2017 02:13 IST

सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक सांभाळणार की सत्ताधाऱ्यांना मुदतवाढ मिळणार यावर जिल्हा परिषदेत तर्कवितर्क सुरू आहे.

नागपूर : सदस्यांचा कार्यकाळ संपल्याने जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासक सांभाळणार की सत्ताधाऱ्यांना मुदतवाढ मिळणार यावर जिल्हा परिषदेत तर्कवितर्क सुरू आहे. पदाधिकारी आपापल्या पदावर कायम असल्याचे बघता अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांना पाठबळ असल्याचे दिसते आहे. अशात उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शहीद दिनाच्या कार्यक्रमासाठी सभापतींच्या ‘पीए’ ला स्मरण पत्र दिले आहे. एरवी सभापतीच्या नावाने येणारे पत्र, त्यांच्या पीएच्या नावाने आल्याने जिल्हा परिषदेत संभ्रम वाढला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुकीबाबत अनिश्चितता आहे. अशात २० मार्च रोजी जिल्हा परिषदेतील सदस्यांचा कार्यकाळ संपला. त्यामुळे जिल्हा परिषदेवर प्रशासक बसणार की सत्ताधाऱ्यांना मुदतवाढ मिळणार याचा निर्णय मंत्रालयीन पातळीवर अडकला आहे. गेल्या दोन दिवसापासून निर्णय येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मंत्रालयातून येणाऱ्या निर्णयाच्या प्रतीक्षेत अख्खी जि.प. लागलेली आहे. सदस्यांपासून अध्यक्षांपर्यंत, कर्मचाऱ्यांपासून सीईओंपर्यंत या निर्णयाकडे डोळे लावून बसले आहे. पंचायत राजमध्ये मुदतवाढ मिळूच शकत नाही, परंतु शासन काही विशेषाधिकार वापरून मुदतवाढ देऊ शकते, असे तर्कवितर्क लावले जात आहे. कार्यकाळ संपल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या सेवा परत देण्यासंदर्भात विचारणा केल्यावर, जिल्हाधिकाऱ्यांनी काही निर्णय येईस्तव सेवा परत करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे काही सभापतींनी आपले कार्यालय गाठून आजही कामकाज सुरू ठेवले. परंतु बुधवारी सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अभियंता यांनी २३ मार्च रोजी होणाऱ्या शहीद दिनाच्या कार्यक्रमाचे स्मरण सभापतींना करून देण्यासाठी त्यांच्या ‘पीए’ ला पत्र दिले आहे. तर २७ मार्च रोजी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीचे पत्र २१ मार्च रोजी सभापतींच्या नावाने जिल्हा परिषद प्रशासनाने दिले आहे. २१ मार्चला मिळालेल्या पत्रातून अधिकाऱ्यांचे पदाधिकाऱ्यांना पाठबळ असल्याचे दिसून येत आहे. परंतु २२ मार्चच्या पत्रातून पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्याची जाणीव प्रशासनाने करून दिली आहे. विशेष म्हणजे जि.प. प्रशासन निर्णयाच्या प्रतीक्षेत रात्रीपर्यंत कार्यालयात स्थिरावले. विभागीय आयुक्तांनी लवकरच निर्णय येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यासंदर्भात समाजकल्याण सभापती दीपक गेडाम यांना विचारणा केली असता, आजपर्यंत कुठल्याही बैठकीचे कार्यक्रमाचे येणारे पत्र आमच्या नावाने यायचे. हे पहिले पत्र आहे जे पीए ला स्मरण करून द्यावे असे आले आहे. त्यामुळे काहीसा संभ्रम आहे. (प्रतिनिधी)