शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

एक पत्र बाबासाहेबांना....()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा चैत्यभूमीवर प्रत्यक्ष न जाता चैत्यभूमीच्या पत्त्यावर पत्र पाठवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे अनुयायांना आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चैत्यभूमीच्या पत्त्यावर आतापर्यंत हजारो पत्रांचा पाऊस पडलाय. चैत्यभूमीवर हजारोपेक्षा जास्त तर दादर पोस्ट ऑफिस येथेही दररोज हजारो पत्रे येत आहेत.

महापरिनिर्वाणदिनानिमित्त दरवर्षी ६ डिसेंबर रोजी लाखोंच्या संख्येने अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर येतात. यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकरचा ६४ वा महापरिनिर्वाण दिन आहे. वर्षानुवर्षे या दिवशी न चुकता चैत्यभूमीवर जाणारे हजारो अनुयायी या वेळी कोरोनाच्या सावटामुळे मात्र जाऊ शकणार नाहीत. मात्र, अनुयायी आपल्या मनातील भावना अनोख्या पद्धतीने-पत्राद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत पोहोचवत आहेत.

महाराष्ट्र आणि देशभरातून जे अनुयायी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ शकणार नाहीत अशांचे चैत्यभूमीच्या पत्त्यावर हजारोंच्या संख्येने पत्रे येत आहेत. या पत्रांपैकी अनेक पत्रे लहान मुलांनी लिहिली आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या भाषेतली पत्रे चैत्यभूमीच्या पत्त्यावर पाठवली जातायेत. उर्दू, हिंदी, मराठी, इंग्रजी, तेलुगू अशा अनेक भाषांमधून ही पत्रे पाठवली जात आहेत.

बॉक्स

नागपुरातूनही दररोज हजारो पत्रे

नागपुरात समता सैनिक दलाचे प्रदीप गणवीर आणि तरुण सामाजिक कार्यकर्ते अनिकेत कुत्तरमारे हे अभियान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.

त्यांनी सांगितले की, ज्यांना कोरोना महामारीच्या काळात चैत्यभूमी येथे येऊन आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करता येणे शक्य नाही, त्यांच्याकरिता हा उपक्रम राबविण्यात येत आहे. बाबासाहेबांप्रति असलेल्या आपल्या कर्तव्य भावनेतून हा उपक्रम राबवत आहे. आपण फक्त एवढेच करायचे आहे. कुटुंबातील प्रत्येक एका व्यक्तीने आपल्या नावे "अभिवादन महामानवाला" हा संदेश आणि स्वतःचे नाव तसेच स्वतःचा पत्ता लिहून एक पोस्टकार्ड चैत्यभूमी_स्मारक_दादर_पश्चिम_मुंबई_४०००२८ या पत्त्यावर पाठवावे." कोरोनाचा प्रादुर्भाव आणि चैत्यभूमीवरची गर्दी टाळण्यासाठी अनुयायांनी चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येऊ नये, त्याऐवजी अभिवादन करणारे पत्र पाठवावे असेही आवाहन प्रशासनाकडून केले जातेय. याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. नागपुरातूनही दररोज हजारो पोस्टकार्ड पाठवली जात आहेत. यातून डाक विभागालाही आर्थिक बळ मिळत आहे.