शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
4
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
5
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
6
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
7
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
8
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
9
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
10
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
11
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
12
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
13
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
14
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
15
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
16
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
17
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
18
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
19
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
20
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!

वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 02:21 IST

वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे?

ठळक मुद्देराकेश सिन्हा : अखंड भारत संकल्प दिनानिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे? जगभरातील २२ मुस्लीम देशांच्या राष्ट्रगीतात मातृभूमीला वंदन करण्यात आले आहे. मग भारतात वंदेमातरम् नाकारण्याचे कारण काय? जे असा विरोध करत असतील त्यांना वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू, असे प्रखर विचार दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच संघ विचारांचे अभ्यासक डॉ. राकेश सिन्हा यांनी व्यक्त केले. संवेदना परिवार संस्थतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी चिटणवीस सेंटर येथे ‘वर्तमान परिप्रेक्ष मे अखंड भारत की संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर, प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी उपस्थित होते. डॉ. सिन्हा पुढे म्हणाले, भारतात हिंदू हे बहुसंख्य असल्याचे सांगितले जाते. परंतु हा निकष भारत एकसंध असतानाचा आहे. पुढे पाकिस्तान, ब्रह्मदेश, बांगलादेश, श्रीलंका असे देशाचे अनेक तुकडे पडले. या फाळणीमुळे भारताचा भूभाग लहान झाला आणि परिणामी हिंदूंची संख्याही घटली. इतर समाजाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढतेय ते बघितले तर एक दिवस भारतातील हिंदूच अल्पसंख्यांक ठरतील, अशी स्थिती आहे. त्यात भर घालण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकार सुरूच आहेत आणि आज नाही तर १९११ पासून ‘लव्ह जिहाद’च्या आधारे धर्मांतर घडविले जात आहे. परंतु केंद्रात सत्तांतर झाल्यापासून चित्र बदलायला लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वाढत आहेत.चाणक्य या देशात खूप झालेत आता चंद्रगुप्तांची गरज आहे. असे चंद्रगुप्त आता संघाच्या शाखांमधून तयार होत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुनील आंबेकर म्हणाले, भारताचा इतिहास पुरुषार्थाचा आहे. आज जगभरातील देश म्हणूनच भारताकडे आशेने पाहत आहेत. जगाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर भारत शाबूत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.