शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 02:21 IST

वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे?

ठळक मुद्देराकेश सिन्हा : अखंड भारत संकल्प दिनानिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे? जगभरातील २२ मुस्लीम देशांच्या राष्ट्रगीतात मातृभूमीला वंदन करण्यात आले आहे. मग भारतात वंदेमातरम् नाकारण्याचे कारण काय? जे असा विरोध करत असतील त्यांना वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू, असे प्रखर विचार दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच संघ विचारांचे अभ्यासक डॉ. राकेश सिन्हा यांनी व्यक्त केले. संवेदना परिवार संस्थतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी चिटणवीस सेंटर येथे ‘वर्तमान परिप्रेक्ष मे अखंड भारत की संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर, प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी उपस्थित होते. डॉ. सिन्हा पुढे म्हणाले, भारतात हिंदू हे बहुसंख्य असल्याचे सांगितले जाते. परंतु हा निकष भारत एकसंध असतानाचा आहे. पुढे पाकिस्तान, ब्रह्मदेश, बांगलादेश, श्रीलंका असे देशाचे अनेक तुकडे पडले. या फाळणीमुळे भारताचा भूभाग लहान झाला आणि परिणामी हिंदूंची संख्याही घटली. इतर समाजाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढतेय ते बघितले तर एक दिवस भारतातील हिंदूच अल्पसंख्यांक ठरतील, अशी स्थिती आहे. त्यात भर घालण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकार सुरूच आहेत आणि आज नाही तर १९११ पासून ‘लव्ह जिहाद’च्या आधारे धर्मांतर घडविले जात आहे. परंतु केंद्रात सत्तांतर झाल्यापासून चित्र बदलायला लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वाढत आहेत.चाणक्य या देशात खूप झालेत आता चंद्रगुप्तांची गरज आहे. असे चंद्रगुप्त आता संघाच्या शाखांमधून तयार होत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुनील आंबेकर म्हणाले, भारताचा इतिहास पुरुषार्थाचा आहे. आज जगभरातील देश म्हणूनच भारताकडे आशेने पाहत आहेत. जगाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर भारत शाबूत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.