शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 02:21 IST

वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे?

ठळक मुद्देराकेश सिन्हा : अखंड भारत संकल्प दिनानिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वंदेमातरम् म्हणजे मातृभूमीला वंदन करणे. यात काय वाईट गोष्ट आहे, वंदेमातरम्ला का विरोध केला जात आहे? जगभरातील २२ मुस्लीम देशांच्या राष्ट्रगीतात मातृभूमीला वंदन करण्यात आले आहे. मग भारतात वंदेमातरम् नाकारण्याचे कारण काय? जे असा विरोध करत असतील त्यांना वंदेमातरम् म्हणण्यास बाध्य करू, असे प्रखर विचार दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच संघ विचारांचे अभ्यासक डॉ. राकेश सिन्हा यांनी व्यक्त केले. संवेदना परिवार संस्थतर्फे अखंड भारत संकल्प दिनानिमित्त शनिवारी चिटणवीस सेंटर येथे ‘वर्तमान परिप्रेक्ष मे अखंड भारत की संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी मंचावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर, प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी उपस्थित होते. डॉ. सिन्हा पुढे म्हणाले, भारतात हिंदू हे बहुसंख्य असल्याचे सांगितले जाते. परंतु हा निकष भारत एकसंध असतानाचा आहे. पुढे पाकिस्तान, ब्रह्मदेश, बांगलादेश, श्रीलंका असे देशाचे अनेक तुकडे पडले. या फाळणीमुळे भारताचा भूभाग लहान झाला आणि परिणामी हिंदूंची संख्याही घटली. इतर समाजाची लोकसंख्या ज्या वेगाने वाढतेय ते बघितले तर एक दिवस भारतातील हिंदूच अल्पसंख्यांक ठरतील, अशी स्थिती आहे. त्यात भर घालण्यासाठी ‘लव्ह जिहाद’ सारखे प्रकार सुरूच आहेत आणि आज नाही तर १९११ पासून ‘लव्ह जिहाद’च्या आधारे धर्मांतर घडविले जात आहे. परंतु केंद्रात सत्तांतर झाल्यापासून चित्र बदलायला लागले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा वाढत आहेत.चाणक्य या देशात खूप झालेत आता चंद्रगुप्तांची गरज आहे. असे चंद्रगुप्त आता संघाच्या शाखांमधून तयार होत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. सुनील आंबेकर म्हणाले, भारताचा इतिहास पुरुषार्थाचा आहे. आज जगभरातील देश म्हणूनच भारताकडे आशेने पाहत आहेत. जगाचे अस्तित्व कायम ठेवायचे असेल तर भारत शाबूत राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.