शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

'सामना होऊ तर द्या, आत्ता टॉस झालाय'...; विदर्भ शिवसेनेत ‘ऑल इज वेल’ असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 19:33 IST

Nagpur News शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेचा संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत

नागपूर : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेण्याची घोषणा केली असून, त्यानंतर भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे सूचक वक्तव्य करत भाजप-सेनेचा संघर्ष आणखी तीव्र होईल, असे संकेतच दिले आहे. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

विदर्भात शिवसेना नेत्यांमध्ये एकी नसल्याचे याअगोदर अनेकदा दिसून आले आहे. नागपुरातदेखील अनेक जुन्या शिवसैनिकांमध्ये खदखद आहे. विशेषतः नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यापासून सेनेत अंतर्गत वाद वाढला आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनी मात्र पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेत कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. यासंबंधात प्रसारमाध्यमांकडूनच दावे-प्रतिदावे केले जातात. प्रत्यक्ष चित्र असे नाही, असे ठाकरे म्हणाले.

पर्यावरण वाचवून विकास व्हावा

राज्य शासन विकासाच्या विरोधात नाही. जर एखाद्या प्रकल्पात पर्यावरणाशी निगडीत अडथळा येत असेल, तर मूळ आराखड्यात बदल करण्यावर भर असला पाहिजे. विशेषतः जेथे असे शक्य आहे, तेथे तर असे पाऊल उचललेच पाहिजे. अजनीत आयएमएस प्रकल्प कोणालाच नको, असे नाही. पर्यावरण वाचवून विकास झाला पाहिजे. अजनीवनाच्याबाबतीत वादाची भूमिका न घेता सामंजस्याने मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे