शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

'सामना होऊ तर द्या, आत्ता टॉस झालाय'...; विदर्भ शिवसेनेत ‘ऑल इज वेल’ असल्याचा आदित्य ठाकरेंचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 19:33 IST

Nagpur News शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देभाजप-सेनेचा संघर्ष आणखी तीव्र होण्याचे संकेत

नागपूर : शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रपरिषद घेण्याची घोषणा केली असून, त्यानंतर भाजपचे साडेतीन नेते तुरुंगात राहतील, असा दावा केला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावर ‘सामना होऊ द्या, आत्ता तर टॉस झाला आहे’, असे सूचक वक्तव्य करत भाजप-सेनेचा संघर्ष आणखी तीव्र होईल, असे संकेतच दिले आहे. नागपूर दौऱ्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

विदर्भात शिवसेना नेत्यांमध्ये एकी नसल्याचे याअगोदर अनेकदा दिसून आले आहे. नागपुरातदेखील अनेक जुन्या शिवसैनिकांमध्ये खदखद आहे. विशेषतः नवीन कार्यकारिणी घोषित झाल्यापासून सेनेत अंतर्गत वाद वाढला आहे. परंतु आदित्य ठाकरे यांनी मात्र पक्षात सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. शिवसेनेत कुठलीही अंतर्गत नाराजी नाही. यासंबंधात प्रसारमाध्यमांकडूनच दावे-प्रतिदावे केले जातात. प्रत्यक्ष चित्र असे नाही, असे ठाकरे म्हणाले.

पर्यावरण वाचवून विकास व्हावा

राज्य शासन विकासाच्या विरोधात नाही. जर एखाद्या प्रकल्पात पर्यावरणाशी निगडीत अडथळा येत असेल, तर मूळ आराखड्यात बदल करण्यावर भर असला पाहिजे. विशेषतः जेथे असे शक्य आहे, तेथे तर असे पाऊल उचललेच पाहिजे. अजनीत आयएमएस प्रकल्प कोणालाच नको, असे नाही. पर्यावरण वाचवून विकास झाला पाहिजे. अजनीवनाच्याबाबतीत वादाची भूमिका न घेता सामंजस्याने मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे